शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

औंढ्यात कयाधूचा तीन गावांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 00:26 IST

तालुक्यात पाच दिवसांत दोनदा अतिवृष्टी झाल्याने लघु व मध्यम तलाव जवळपास भरले आहेत. पूर, कंजारा, मेथा ,फुलदाभा, दरेंगाव, केळी, गोजेगाव गावाजवळून वाहणाऱ्या ओढ्यामुळे काही तास संपर्क तुटला होता. तर पूर, कंजारा परिसरात वाहणाºया कयाधू नदीचे पाणी ओसंडून वाहत असल्याने शेकडो हेक्टर जमिनी खरडून गेल्या आहेत. पाणी शेतामध्ये साचल्याने ाअनेक पिके धोक्यात आली असून ती पिवळी पडत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : तालुक्यात पाच दिवसांत दोनदा अतिवृष्टी झाल्याने लघु व मध्यम तलाव जवळपास भरले आहेत. पूर, कंजारा, मेथा ,फुलदाभा, दरेंगाव, केळी, गोजेगाव गावाजवळून वाहणाऱ्या ओढ्यामुळे काही तास संपर्क तुटला होता. तर पूर, कंजारा परिसरात वाहणाºया कयाधू नदीचे पाणी ओसंडून वाहत असल्याने शेकडो हेक्टर जमिनी खरडून गेल्या आहेत. पाणी शेतामध्ये साचल्याने ाअनेक पिके धोक्यात आली असून ती पिवळी पडत आहेत.औंढा तालुक्यातील औंढा नागनाथ, नागेश्वडी, वाळकी, पिपलदरी, सुरेगाव, येळी, केळी व काही छोटे तलाव सततच्या पावसामुळे भरण्याच्या उंबरठ्यावर आहेत. पावसामुळे सर्वच ओढे व नद्यांना पाणी आले आहे. यामुळे गोळेगावमार्गे कोंडशी, दरेगाव, नांदापूर, टाकळगव्हाण आदी गावांचे मार्ग काही काळ बंद झाले होते. या पाण्यामुळे शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. हळद, सोयाबीन, कापूस तूर आदी पिके पाण्याखाली आले आहेत.केळी जलाशय ९0 टक्क्यांवरकेळी जलाशय ९० टक्के भरला. तो परिसरात सर्वांत मोठा असून तीन वर्षांनंतर हे चित्र दिसत आहे. त्यामुळे या भागातील सिंचनाचा प्रश्न मिटला आहे. पार्डी, सावळी, येळी, केळी, हिवरखेडा साळणा ई गावाना याचा फायदा होणार आहे..४हिवरखेडा येथील शेतकरी पंढरी गिते यांचा दीड एकर कापूस उन्मळला. तर देवीदास गिते, संतोष गिते, विलास गिते, भास्कर गिते आदींच्या कापसाची हीच अवस्था आहे.केळी ते येळी फाटा मध्यभागी असलेल्या ओढ्याला मोठा पूर आल्याने केळी गावकºयांचा संपर्क तुटला. या भागातील नागरिकांना हा प्रश्न नेहमीच भेडसावतो.४काठोडा, अंजनवाडा, अनखळी या चार गावात पावसामुळे सुमारे १५ जणांची घरे पडली आहेत. तलाठ्यांनी तसा पंचनामा केले असून अहवाल जिल्हाधिकाºयांना कळविण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी दिली आहे

टॅग्स :Rainपाऊसriverनदी