शहरं
Join us  
Trending Stories
1
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
2
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
3
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
4
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
5
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
6
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
7
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
8
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
9
छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत का? विधानपरिषदेत सदस्यांचा सवाल : कन्टेंट हटवा
10
इंडिगो घोळाचा फटका मुंबई, नागपूरलाही; इतर कंपन्यांची विमानेही उडताहेत उशिराने
11
मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा
12
निष्कलंक, सुसंस्कृत नेतृत्व हरपले; माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचे निधन
13
चांदीसाठी किलोला ‘जीएसटी’सह मोजा दोन लाख रुपये ! दोन हजारांच्या वाढीसह पोहोचली १,९४,००० रुपयांवर
14
इंडिगोला दणका; ४ फ्लाइट ऑपरेशन इन्स्पेक्टर निलंबित, सीईओ पीटर एल्बर्स यांची सलग दुसऱ्या दिवशी डीजीसीएने चौकशी केली
15
भाजप आमदारांनी आरोप केलेले तुकाराम मुंढे यांना ‘क्लीन चिट’,ईओडब्ल्यू व पोलिसांच्या चौकशीत काहीच आढळले नाही
16
विमा क्षेत्रात १०० टक्के ‘एफडीआय’ला मंजुरी; आतापर्यंत एफडीआयमार्फत ८२,००० कोटींची परकीय गुंतवणूक
17
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
18
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
19
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
20
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

झाडाचा आधार, चारही बाजूला पाणीच पाणी; जिवाची पर्वा न करता पुरात अडकलेल्या तिघांची केली सुटका

By रमेश वाबळे | Updated: September 1, 2024 22:27 IST

शेतकऱ्याने दाखवलेल्या धाडसाचे आणि हिमतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

रमेश वाबळे, हिंगोली :  जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्रीपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील जडगाव शिवारातून वाहणाऱ्या मधोमती नदीला रविवारी सकाळी पूर आला होता. या पुरात अडकलेल्या तिघा शेतकऱ्यांचा जीव जडगाव येथीलच बाबाराव पडोळे या शेतकऱ्याने वाचविला. पडोळे यांनी दाखविलेल्या हिमतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जडगाव भागात शनिवारपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण परिसर जलमय झाला.  गावातील अनेकांच्या घरांमध्ये पुराचे पाणी घुसले होते. शेतशिवारात शिरलेल्या पुराच्या पाण्यात आखाड्यावर बांधलेली जनावरेही अडकली होती. यात जडगाव येथील शेतकरी लव्हेकर यांचे बैल शेतात बांधलेले होते. बैलांची सुटका करण्यासाठी शिवाजी लव्हेकर पुराच्या पाण्यात उतरले आणि त्यांनी बैलांची सुटका केली. त्यांना मात्र पुरातून बाहेर येता येत नव्हते. त्यामुळे प्रवीण लव्हेकर आणि सोपान लव्हेकर यांनी त्यांना वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली; परंतु तिघेही पुरात अडकले, तर दुसरीकडे क्षणाक्षणाला पुराचे पाणी वाढत होते. जीव वाचविण्यासाठी तिघाही शेतकऱ्यांनी झाडाचा आधार घेतला होता;  परंतु पुराचे पाणी कमी होताना दिसत नव्हते. या कालावधीमध्ये औंढा येथील तहसीलदारांशी संपर्क केला असता एनडीआरएफची टीम नांदेडवरून येत असल्याचे त्यांनी सांगितले; परंतु पाऊस परत खूप जोरात सुरू झाल्यामुळे वाट पाहणे म्हणजे जीविताला धोका असल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात येत होते. तेव्हा जडगाव येथीलच बाबाराव पडोळे यांनी हिंमत करून दोरीच्या साह्याने पुरामध्ये उडी घेतली. झाडावर अडकलेल्या तीन शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचले. त्यानंतर जवळपास तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पुरात अडकलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्यात आले. शेतकरी बाबाराव पडोळे यांनी दाखविलेल्या हिमतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

‘एनडीआरएफ’ पथक येणार म्हणताच आनंद मायेना....

पुराचे पाणी वरचेवर वाढत होते. त्यामुळे आपण पाण्यात वाहून जातो की काय, अशी भीती वाटू लागली होती. परंतु ‘एनडीआरएफ’ पथक नांदेडवरुन येणार असे गावकऱ्यांनी सांगताच आनंद झाला.  परंतु पथकही येईना आणि कोणीच धावून जाईना म्हणून जडगाव येथील बाबाराव पडोळे यांनी हिंमत दाखवून दोरीच्या साह्याने उडी घेतली.  त्यामुळे तर आमच्या जीवात जीव आल्याचे पाण्यात आडकलेल्या नागरिकांनी सांगितले.

टॅग्स :RainपाऊसfloodपूरHingoliहिंगोली