शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

झाडाचा आधार, चारही बाजूला पाणीच पाणी; जिवाची पर्वा न करता पुरात अडकलेल्या तिघांची केली सुटका

By रमेश वाबळे | Updated: September 1, 2024 22:27 IST

शेतकऱ्याने दाखवलेल्या धाडसाचे आणि हिमतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

रमेश वाबळे, हिंगोली :  जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्रीपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील जडगाव शिवारातून वाहणाऱ्या मधोमती नदीला रविवारी सकाळी पूर आला होता. या पुरात अडकलेल्या तिघा शेतकऱ्यांचा जीव जडगाव येथीलच बाबाराव पडोळे या शेतकऱ्याने वाचविला. पडोळे यांनी दाखविलेल्या हिमतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जडगाव भागात शनिवारपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण परिसर जलमय झाला.  गावातील अनेकांच्या घरांमध्ये पुराचे पाणी घुसले होते. शेतशिवारात शिरलेल्या पुराच्या पाण्यात आखाड्यावर बांधलेली जनावरेही अडकली होती. यात जडगाव येथील शेतकरी लव्हेकर यांचे बैल शेतात बांधलेले होते. बैलांची सुटका करण्यासाठी शिवाजी लव्हेकर पुराच्या पाण्यात उतरले आणि त्यांनी बैलांची सुटका केली. त्यांना मात्र पुरातून बाहेर येता येत नव्हते. त्यामुळे प्रवीण लव्हेकर आणि सोपान लव्हेकर यांनी त्यांना वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली; परंतु तिघेही पुरात अडकले, तर दुसरीकडे क्षणाक्षणाला पुराचे पाणी वाढत होते. जीव वाचविण्यासाठी तिघाही शेतकऱ्यांनी झाडाचा आधार घेतला होता;  परंतु पुराचे पाणी कमी होताना दिसत नव्हते. या कालावधीमध्ये औंढा येथील तहसीलदारांशी संपर्क केला असता एनडीआरएफची टीम नांदेडवरून येत असल्याचे त्यांनी सांगितले; परंतु पाऊस परत खूप जोरात सुरू झाल्यामुळे वाट पाहणे म्हणजे जीविताला धोका असल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात येत होते. तेव्हा जडगाव येथीलच बाबाराव पडोळे यांनी हिंमत करून दोरीच्या साह्याने पुरामध्ये उडी घेतली. झाडावर अडकलेल्या तीन शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचले. त्यानंतर जवळपास तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पुरात अडकलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्यात आले. शेतकरी बाबाराव पडोळे यांनी दाखविलेल्या हिमतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

‘एनडीआरएफ’ पथक येणार म्हणताच आनंद मायेना....

पुराचे पाणी वरचेवर वाढत होते. त्यामुळे आपण पाण्यात वाहून जातो की काय, अशी भीती वाटू लागली होती. परंतु ‘एनडीआरएफ’ पथक नांदेडवरुन येणार असे गावकऱ्यांनी सांगताच आनंद झाला.  परंतु पथकही येईना आणि कोणीच धावून जाईना म्हणून जडगाव येथील बाबाराव पडोळे यांनी हिंमत दाखवून दोरीच्या साह्याने उडी घेतली.  त्यामुळे तर आमच्या जीवात जीव आल्याचे पाण्यात आडकलेल्या नागरिकांनी सांगितले.

टॅग्स :RainपाऊसfloodपूरHingoliहिंगोली