शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

तपासणीशिवाय उपाययोजना नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 16:36 IST

ज्या गावास खरोखरच टंचाईच्या झळा बसताहेत अशी गावेही भरगच्च प्रस्तावांच्या गर्दीत अडकून पडतात. त्यामुळे प्रत्यक्ष तपासणीशिवाय यापुढे एकही प्रस्ताव पाठवू नये, असा आदेश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिला असून तूर्त आलेल्या ४८ पाणीपुरवठा दुरुस्तीच्या प्रस्तावांची तपासणी सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : ज्या गावास खरोखरच टंचाईच्या झळा बसताहेत अशी गावेही भरगच्च प्रस्तावांच्या गर्दीत अडकून पडतात. त्यामुळे प्रत्यक्ष तपासणीशिवाय यापुढे एकही प्रस्ताव पाठवू नये, असा आदेश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिला असून तूर्त आलेल्या ४८ पाणीपुरवठा दुरुस्तीच्या प्रस्तावांची तपासणी सुरू आहे.मागील काही दिवसांपासून पाणीटंचाई उपाययोजनांचे भरमसाठ प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात येत आहेत. त्यातच दुरुस्तीच्या प्रस्तावांवरच भर असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करण्याचा आदेश दिला. यात झालेल्या तपासणीत हिंगोली तालुक्यातील नळयोजना विशेष दुरुस्तीचे १२ पैकी ८ प्रस्ताव बोगस असल्याचे आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच गावांचे आलेले प्रस्ताव तपासून २ एप्रिलला त्याचा अंतिम अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. तर वेळेचे बंधन पाळण्यासही बजावले आहे.जिल्ह्यातील एकूण ४८ प्रस्तावांची तपासणी होणार आहे. यात नळयोजना विशेष दुरुस्तीमध्ये कळमनुरी तालुक्यातील झुनझुनवाडी, कुंभारवाडी त.चा., दाती, नवखा, खरवड, डिग्गी, तरोडा, सिंदगी, कुर्तडी, पेठवडगाव, बोल्डा, कवठा, सेलसुरा, भाटेगाव बु., शिवणी खु., हिंगोली तालुक्यातील राहोली खु., पांगरी, मौजा, इडोळी, लिंबी, हिरडी, वडद, आडगाव, बोडखी, सेनगाव तालुक्यातील गणेशपूर, शिंदेफळ, पानकन्हेरगाव, कहाकर बु., आजेगव, धनगरवाडी, धानोरा बंजारा, खडकी, धोतराव, भगवती, कडोळी, औंढा ना. तालुक्यातील दरेगाव, सारंगवाडी, गवळेवाडी, सोनवाडी, संघनाईक तांडा, येडूत, सेंदूरसना, सुकापूर, तपोवन, ब्राह्मणवाडा, वसमत तालुक्यातील पुयनी बु. या गावांचा समावेश आहे. तर तात्पुरती पूरक नळयोजनेचे हिंगोली तालुक्यातील खेड, जामठी खु., हºयतखेडा, महालिंगी तांडा, खानापूर चित्ता या गावांचा समावेश आहे. आता या सर्व गावांतील तपासणी होणार असून त्यानंतरच कामे होतील.टंचाई आराखड्यातील गावांचे नळ योजना विशेष दुरुस्ती, पूरक योजनेचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेस आले आहेत. मात्र त्यापूर्वी संबंधित तहसीलदारांच्या नेतृत्वातील पथकाचे नायब तहसीलदार, पापु अभियंता, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांनी स्थळ पाहणी करावी.यात ३ फेब्रुवारी १९९९ च्या शासन निर्णयानुसार प्रस्तावास टंचाईत मंजुरी देणे योग्य आहे का? अंदाजपत्रकातील बाबनिहाय कामाची आवश्यकता आहे का? दर योग्य आहेत का? उपायानंतर पिण्याच्या पाण्याची सोय होईल का, याचा अहवाल मागविला आहे.यापुढे चुकीचे प्रस्ताव पाठविल्यास यातील सर्व संबंधित यंत्रणांना नोटिसा देण्यात येणार असल्याचा इशराही देण्यात आलेला आहे. तर योग्य प्रस्तावास विलंब करू नये, असेही बजावण्यात आले आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीHingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीWaterपाणीcollectorतहसीलदारFarmerशेतकरी