शहरं
Join us  
Trending Stories
1
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
2
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
3
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
4
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
5
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
6
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
7
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
8
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
9
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
10
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
11
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
12
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
14
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
15
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
16
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
17
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
18
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
19
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
20
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न

अजूनही ५४ कोटी वर्ग करणे बाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 01:00 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेतील लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर ग्रीनलिस्टनुसार आतापर्यंत ३३८.९७ एवढी रक्कम जमा केली आहे. विविध निकषात पात्र असलेल्या ६८ हजार ४०४ लाभार्थ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला.

ठळक मुद्देकर्जमाफी : तीन वर्षांपासून सुरू आहे नुसते गु-हाळ

हिंगोली : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेतील लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर ग्रीनलिस्टनुसार आतापर्यंत ३३८.९७ एवढी रक्कम जमा केली आहे. विविध निकषात पात्र असलेल्या ६८ हजार ४०४ लाभार्थ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला. तर ६ हजार १२५ शेतकऱ्यांच्या खात्यावर ५४ कोटी रुपयांची रक्कम वर्ग करणे बाकीच आहे.शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शासनाकडून नियोजन केले जात असले तरी अजूनही अनेक लाभार्थी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कर्जमाफीच्या अनुदानापासून वंचित आहेत. परंतु संथगतीने का होईना लाभार्थी शेतकºयांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम वर्ग केली जात आहे. आतापर्यंत शासनाने जिल्ह्यातील विविध निकषामधील ६८४०४ लाभार्थी शेतकºयांच्या बँक खात्यावर ३३८.९७ कोटीं एवढी रक्कम वर्ग केली आहे. कर्जमाफीचा अद्याप ज्यांना लाभ मिळाला नाही, असे लाभार्थी मात्र संताप व्यक्त करीत आहेत. परंतु अनेकदा त्रुटींची पूर्तता करूनही कर्जमाफीचा लाभ न मिळाल्याने असे काही शेतकरी अजूनही शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेतच आहेत.दीड लाखांच्या आतमध्ये असलेल्या ४७५३५ लाभार्थ्यांपैकी आतापर्र्यंत ४५४२६ जणांच्या बँक खात्यावर २६३.१२ कोटी जमा करण्यात आले आहेत. तर एक रक्कमी परतफेड करणाºया ५८५२ लाभार्थ्यांपैकी ३१६१ जणांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची ४८.९२ कोटी रक्कम वर्ग करण्यात आली आहे. तसेच सतत दोन वर्ष ज्या शेतकरी सभासदांनी कर्जफेड केली आहे त्यांना प्रोत्साहन म्हणून अनुदान दिले जाते. जिल्ह्यातील प्रोत्साहन दिल्या जाणाºया कर्ज खातेदारांची संख्या २११४२ असून त्यापैकी आतापर्यंत १९८१७ जणांच्या खात्यावर आतापर्यंत प्रोत्साहन म्हणून २६.९२ कोटी रक्कम जमा करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शासनाच्या विविध निकषातील शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे.विविध निकषामध्ये असलेल्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांची संख्या ६८ हजार ४०४ असून या सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर आतापर्यंत शासनाकडून ३३८.९७ कोटी रूपये जमा करण्यात आले आहेत.प्रोत्साहन अनुदानसुद्धा खात्यावर वर्ग नाहीशासनाकडून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना कर्जमाफीची रक्कम संबधित बँकेत जमा केली. त्या अनुषंगाने सदर योजनेअंतर्गत बँकेत ३१ मे २०१९ अखेर जमा झालेल्या रक्कम संबधितांना वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.ग्रीन लिस्टनुसार कर्जमाफीसाठी पात्र असणाºया लाभार्थ्यांची संख्या ४७ हजार ५३५ एवढी होती. त्यांना २६७ कोटी रुपयांची माफी देणे अपेक्षित होते. यात राष्ट्रीयीकृत बँकांचे सर्वाधिक ३६ हजार ८९२, मध्यवर्तीचे ४८६१ तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे ५७८२ लाभार्थी होते. एकरकमी परतफेडीसाठी पात्र लाभार्थी ५८५२ होते. मात्र लाभ ३१६१ जणांनीच घेतला.या सर्व बाबींमध्ये प्रोत्साहन अनुदानाचे लाभार्थी ग्रीनलिस्टनुसार २१ हजार १४२ होते. मात्र त्यापैकी १९ हजार ८१७ लाभार्थ्यांनाच ते अदा केले. सतत दोन वर्षे कर्जफेड करणाºयांसाठीचे हे अनुदान का दिले नाही, हा प्रश्न आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीFarmerशेतकरीMONEYपैसा