शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

...तर हिंगोली जिल्ह्याचे वाळवंट होईल; कयाधूचे पाणी इसापूर धरणात वळविण्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 13:04 IST

गोदावरी खोरे महामंडळाकडून आणला जात आहे प्रस्ताव

ठळक मुद्देनदीच वळविली तर खरबीपासून खालच्या भागातील १00 ते १५0 गावांवर परिणाम १४ किमीचा बोगदा खोदून प्रवाही पद्धतीने पाणी इसापूर धरणात वळविण्याचा प्रस्ताव

हिंगोली : तालुक्यातील खरबी येथून बोगद्याद्वारे कयाधू नदीचेपाणी पैनंगगा नदीत सोडण्याचा प्रस्ताव गोदावरी खोरे विकास महामंडळाकडून आणला जात आहे. त्यास हिंगोली जिल्ह्याचा विरोध असून हा प्रकार म्हणजे हिंगोली जिल्ह्याचे वाळवंट करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप माजी खा. अ‍ॅड. शिवाजी माने यांनी केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे औरंगाबाद येथे बैठकीला येत आहेत. त्या पार्श्वभूमिवर हा प्रस्ताव मंजुरीसाठी आणला जात आहे. याद्वारे १0९ दलघमी पाणी कयाधूतून इसापूर धरणात सोडले जाणार आहे. इसापूर धरणाचा हिंगोली जिल्ह्याला काहीच फायदा होणार नाही. १४ किमीचा बोगदा खोदून प्रवाही पद्धतीने पाणी इसापूर धरणात वळविण्याचा आता महामंडळाचा प्रस्ताव आहे. त्याची किंमत ५१३ कोटी रुपये आहे. पूर्वी इसापूर व सापळी धरणाला १९६८ मध्ये एकत्रित मंजुरी दिली होती. तेव्हा ३५ कोटीत होणारा हा प्रकल्प २00५ मध्ये ३५५0 कोटींचा झाला होता. आता तो कोणत्याही परिस्थितीत रास्त नाही. मात्र कयाधू नदीच वळविली तर खरबीपासून खालच्या भागातील १00 ते १५0 गावांवर त्याचा परिणाम होईल. हे पात्र कोरडे होईल. या भागातील नियोजित बंधाऱ्यांना पाणी मिळणार नाही. आधीच पाच उच्च पातळी बंधारे प्रस्तावित असून हिंगोली जिल्ह्याचा वेगळा अनुशेष मंजूर झाला तरीही त्यांचा प्रश्न सुटला नाही.

यापूर्वी मेंढेगिरी लवादानेही जिल्ह्यासाठी १0८ दलघमी पाणी आरक्षित केले असून त्याचेही कोणतेच नियोजन महामंडळाने केलेले नाही. मात्र हा नवा प्रस्ताव आणून महामंडळ हिंगोली जिल्ह्याच्या विरोधात भूमिका घेत असल्याचेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.  

टॅग्स :riverनदीHingoliहिंगोलीWaterपाणी