शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

...तर हिंगोली जिल्ह्याचे वाळवंट होईल; कयाधूचे पाणी इसापूर धरणात वळविण्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 13:04 IST

गोदावरी खोरे महामंडळाकडून आणला जात आहे प्रस्ताव

ठळक मुद्देनदीच वळविली तर खरबीपासून खालच्या भागातील १00 ते १५0 गावांवर परिणाम १४ किमीचा बोगदा खोदून प्रवाही पद्धतीने पाणी इसापूर धरणात वळविण्याचा प्रस्ताव

हिंगोली : तालुक्यातील खरबी येथून बोगद्याद्वारे कयाधू नदीचेपाणी पैनंगगा नदीत सोडण्याचा प्रस्ताव गोदावरी खोरे विकास महामंडळाकडून आणला जात आहे. त्यास हिंगोली जिल्ह्याचा विरोध असून हा प्रकार म्हणजे हिंगोली जिल्ह्याचे वाळवंट करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप माजी खा. अ‍ॅड. शिवाजी माने यांनी केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे औरंगाबाद येथे बैठकीला येत आहेत. त्या पार्श्वभूमिवर हा प्रस्ताव मंजुरीसाठी आणला जात आहे. याद्वारे १0९ दलघमी पाणी कयाधूतून इसापूर धरणात सोडले जाणार आहे. इसापूर धरणाचा हिंगोली जिल्ह्याला काहीच फायदा होणार नाही. १४ किमीचा बोगदा खोदून प्रवाही पद्धतीने पाणी इसापूर धरणात वळविण्याचा आता महामंडळाचा प्रस्ताव आहे. त्याची किंमत ५१३ कोटी रुपये आहे. पूर्वी इसापूर व सापळी धरणाला १९६८ मध्ये एकत्रित मंजुरी दिली होती. तेव्हा ३५ कोटीत होणारा हा प्रकल्प २00५ मध्ये ३५५0 कोटींचा झाला होता. आता तो कोणत्याही परिस्थितीत रास्त नाही. मात्र कयाधू नदीच वळविली तर खरबीपासून खालच्या भागातील १00 ते १५0 गावांवर त्याचा परिणाम होईल. हे पात्र कोरडे होईल. या भागातील नियोजित बंधाऱ्यांना पाणी मिळणार नाही. आधीच पाच उच्च पातळी बंधारे प्रस्तावित असून हिंगोली जिल्ह्याचा वेगळा अनुशेष मंजूर झाला तरीही त्यांचा प्रश्न सुटला नाही.

यापूर्वी मेंढेगिरी लवादानेही जिल्ह्यासाठी १0८ दलघमी पाणी आरक्षित केले असून त्याचेही कोणतेच नियोजन महामंडळाने केलेले नाही. मात्र हा नवा प्रस्ताव आणून महामंडळ हिंगोली जिल्ह्याच्या विरोधात भूमिका घेत असल्याचेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.  

टॅग्स :riverनदीHingoliहिंगोलीWaterपाणी