शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

अवयव विक्रीस गेलेल्या हिंगोलीच्या शेतकऱ्यांना मुंबईत पोलिसांनी घेतले ताब्यात

By विजय पाटील | Updated: November 30, 2023 19:16 IST

शेतकऱ्यांनी समुद्रात जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

हिंगोली : नापिकीमुळे कर्जबाजारी झाल्याने पीककर्ज फेडण्यासाठी शरीराचे अवयव विक्री काढलेल्या शेतकऱ्यांना मुंबईत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिल्याने पोलिसांनी ही कार्यवाही केली.

मागील आठ दिवसांपासून सेनगाव तालुक्यातील या शेतकऱ्यांचा हा मुद्दा गाजत आहे. यासाठी त्यांनी आधी स्थानिक पातळीवर निवेदन दिले होते. त्यानंतर त्यांनी थेट मुंबई गाठून सरकारनेच आमच्या अवयवयांची खरेदी करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनीही या शेतकऱ्यांचे अवयव सरकारने विकत घेतल्यावर त्यांच्याशिवाय आम्ही कसे जगायचे म्हणून आमचे अवयवही घ्या, अशी मागणी केली होती.

दोन दिवसांच्या सुट्यांमुळे शेतकऱ्यांना कुणालाच भेटता आले नाही. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची सरकारकडून दखल घेतली जात नव्हती. यामुळे त्यांनी शेवटी ३० नोव्हेंबर रोजी मुंबईत समुद्रात जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

हे शेतकरी दुपारी २ च्या सुमारास माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर गेले होते. तेथे खा. विनायक राऊत यांची भेट झाली. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना भेटण्यास सांगितले. मात्र हे शेतकरी मातोश्रीच्या बाहेर आल्यानंतर त्यांना खैरवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले.

टॅग्स :FarmerशेतकरीHingoliहिंगोली