शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

हळदीचा माल आला पण भाव पडला; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर निराशा

By रमेश वाबळे | Updated: October 4, 2023 16:19 IST

पाच दिवसानंतर हळद मार्केट यार्ड सुरू

हिंगोली : येथील बाजार समितीच्या मार्केट यार्डातील व्यवहार मागील पाच दिवसांच्या बंदनंतर ३ ऑक्टोबरपासून सुरू झाले. या दिवशी १ हजार ८०० क्विंटल हळद विक्रीसाठी आली होती. आवक वाढल्यामुळे मात्र भावात घसरण झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर निराशा दिसून आली.

यंदा हळदीला ऑगस्टमध्ये मागील तेरा वर्षातील उच्चांकी दर मिळाला. सरासरी १५ ते १७ हजार रूपये क्विंटलने हळद विक्री झाली. आणखी दर वधारतील किंवा स्थिर तरी राहतील अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु, सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून भावात घसरण सुरू झाली. जुलै, ऑगस्टच्या तुलनेत आवक कमी होत असली तरी भावात घसरण होत गेल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली. त्यातच २८ सप्टेंबर गणेश विसर्जनापासून मार्केट यार्ड बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर ३ ऑक्टोबर रोजी आवक १ हजार ८०० क्विंटल झाली होती. या दिवशी भाव समाधानकारक मिळेल अशी आशा होती. परंतु, किमान १० हजार ८०० ते १२ हजार ८५० रूपये दर मिळाला. ऑगस्टच्या तुलनेत तब्बल तीन ते चार हजारांनी भाव घसरल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत होती.

मूगाला मिळाला सरासरी ११ हजार ६०० चा भाव...येथील बाजार समितीच्या मोंढ्यात मंगळवारी २० क्विंटल मूगाची आवक झाली होती. किमान १० हजार ३०० ते कमाल १३ हजार रूपये भाव मिळाला. यंदा मूगाला समाधानकारक भाव मिळत असला तरी उत्पादन कमी आहे. त्यामुळे भाववाढीचा फायदा शेतकऱ्यांना होत नसल्याचे चित्र आहे.

सोयाबीनची आवक वाढली...भाववाढीच्या प्रतीक्षेत मागील आठ ते नऊ महिन्यांपासून काही शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीविना ठेवले. आता आठवड्यापासून बाजारात नवे सोयाबीन आले आहे. त्यामुळे आवक वाढली आहे. ३ ऑक्टोबरला ८०० क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आले होते. नवे सोयाबीन आले तरी भाव मात्र पडतेच आहेत. त्यामुळे यंदाही सोयाबीन उत्पादकांच्या पदरी निराशाच येण्याची चिन्हे आहेत. जुने आणि नवे एकाच भावात जात असल्यामुळे इतक्या दिवस सोयाबीन विक्रीविना ठेवून काहीच फायदा झाला नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीHingoliहिंगोली