शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

दहा लाख वीज ग्राहकांकडे १,८७१ कोटींची थकबाकी; ग्राहकांसाठी सवलतीची अभय योजना आली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 14:31 IST

अभय योजनेत ग्राहकांना व्याज, विलंब आकार माफीची सवलत मिळत आहे

हिंगोली : मराठवाड्यातील १० लाख २४ हजार ग्राहकांकडे वीज बिलाची १,८७१ कोटी ५१ लाख रुपयांची थकबाकी आहे. या ग्राहकांसाठी अभय योजना सुरु असून, त्यास ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली असल्याची माहिती महावितरणने दिली.

वीज बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या ग्राहकांसाठी अभय योजना सुरु आहे. मराठवाड्यातील १० लाख २४ हजार ४०० ग्राहकांकडे १,८७१ कोटी ५१ लाख ५८ हजार रूपये थकबाकी आहे. घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांनी या योजनेंतर्गत वीजबिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकार माफीच्या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन महावितरण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता यांनी केले आहे.

थकीत बिलामुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या (पीडी) घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांना अभय योजनेचा लाभ घेता येणार आहे. थकीत बिलांच्या योजनेत कृषी ग्राहकांचा समावेश नाही. योजनेचा कालावधी १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत होता. त्याला आता ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. मूळ बिलाच्या ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम सहा हप्त्यात भरायची सवलत ग्राहकांना मिळणार आहे, असे महावितरणने स्पष्ट केले.

आतापर्यंत झालेली वसुलीमराठवाड्यात १,८७१ कोटी रुपयांची थकबाकी असून, त्यात आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर परिमंडळाने ५ कोटी ६८ लाख, लातूर परिमंडळाने ४ कोटी ८१ लाख, नांदेड परिमंडळाने २ कोटी ५१ लाख असे १३ कोटी रूपये वसूल केले आहेत.

टॅग्स :Hingoliहिंगोलीmahavitaranमहावितरण