शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

किन्होळा येथे २ एकरांमधील उसाला आग; अडीच लाख रूपयांचे झाले नुकसान

By यशवंत भीमराव परांडकर | Updated: January 26, 2024 21:19 IST

घटनेची माहिती मिळताच किन्होंळा सज्जाच्या तलाठी यू.बी. मैड यांनी सदरील नुकसानीची पाहणी करून पंचनामा केला आहे. 

बालय्या स्वामी, कौठा (जि. हिंगोली): वसमत तालुक्यातील किन्होळा शिवारातील दोन एकरांतील उभ्या उसाला शॉर्टसर्किटने आग लागली‌. या आगीत शेतकऱ्याचे जवळपास अडीच लाख  रूपयांचे नुकसान झाले.  सदर घटना २६ जानेवारी रोजी दुपारी घडली.

किन्होळा येथील शेतात अचानक विजेचा शॉर्टसर्किट झाला असल्यामुळे ही आग लागण्याचे सांगण्यात येत आहे. खरीप हंगामात सोयाबीन, कापसाचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी आधीच चिंताग्रस्त आहे. त्यात आता दोन एकरांवरील ऊस पूर्णतः जळाल्यामुळे शेतकऱ्यावर पुन्हा रब्बी हंगामात मोठे संकट आले आहे. किन्होळा शिवारात  कलावतीबाई शंकरराव जिंतूरकर यांचे गट नंबर २२ मध्ये शेती आहे. त्यांनी त्या दोन एकरांवर उसाची लागवड केली होती. सदरील शेतातून विद्युत वाहिनीची तार गेली आहे. त्यात अचानक शॉर्टसर्किट झाल्याने उभ्या उसाला आग लागल्याचे शेतकऱ्याने सांगितले. दुपारी  आग लागली आणि पाहता पाहता आगीने एकदम रौद्ररूप धारण केले. हे पाहून परिसरातील शेतकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. परंतु आग आटोक्यात आली नाही. त्यामुळे आगीत ऊस जळून खाक झाला. सदरील घटनेची माहिती मिळताच किन्होंळा सज्जाच्या तलाठी यू.बी. मैड यांनी सदरील नुकसानीची पाहणी करून पंचनामा केला आहे. 

आगीमुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शासनाने याची भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेजारील  शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोली