शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

जनतेचा विश्वास संपादन करून कायद्याची कठोर अंमलबजावणी करा : विशेष पोलीस महानिरीक्षक पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 18:13 IST

जनतेचा विश्वास संपादन करून कायद्याची कठोर अंमलबजावणी केली पाहिजे असे प्रतिपादन नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील यांनी आज येथे केले.

 आखाडा बाळापुर (हिंगोली) : पोलीस आणि जनता यांच्यातील दरी कमी करण्याकरता पोलिसांनी प्रयत्न करावेत. पोलिसांनी माणुसकी जपली पाहिजे. तसेच जनतेचा विश्वास संपादन करून कायद्याची कठोर अंमलबजावणी केली पाहिजे असे प्रतिपादन नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील यांनी आज येथे केले.

जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार व नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील यांनी आज आखाडा बाळापुर ठाण्याला भेट दिली. यावेळी तंटामुक्ती भवनात शांतता समितीचीही बैठक आयोजित करण्यात आली होती. यात मार्गदर्शन करताना फत्तेसिंह पाटील म्हणाले की, पोलिस हे जनतेचे सेवक आहेत. पोलिसांनी जनतेशी सुसंवाद ठेवला पाहिजे. तसेच त्यांनी कायम सजग राहत कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करावी. जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी नागरिकांच्या सकारात्मक कामात पोलीस सदैव मदत करतील असे आश्वासन दिले.

बैठकीत संजय बोंढारे ,जकी कुरेशी, विठ्ठल पंडित, धनंजय सूर्यवंशी, ठाकूरसिंग बावरी, डॉ. कृष्णराव पाटील जरोडेकर, डॉ.उषा कदम यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जि. प. सदस्य दिलीप देसाई ,उपसभापती अजय सावंत ,बी.बी.पतंगे ,आनंदराव कदम, भारत कदम ,चांदु भिसे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी केले.

टॅग्स :Hingoli policeहिंगोली पोलीसNanded special igविशेष पोलीस महानिरीक्षक नांदेडHingoli S Pपोलीस अधीक्षक, हिंगोली