शहरं
Join us  
Trending Stories
1
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
2
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
3
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
4
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
5
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
6
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
7
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
8
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
9
छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत का? विधानपरिषदेत सदस्यांचा सवाल : कन्टेंट हटवा
10
इंडिगो घोळाचा फटका मुंबई, नागपूरलाही; इतर कंपन्यांची विमानेही उडताहेत उशिराने
11
मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा
12
निष्कलंक, सुसंस्कृत नेतृत्व हरपले; माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचे निधन
13
चांदीसाठी किलोला ‘जीएसटी’सह मोजा दोन लाख रुपये ! दोन हजारांच्या वाढीसह पोहोचली १,९४,००० रुपयांवर
14
इंडिगोला दणका; ४ फ्लाइट ऑपरेशन इन्स्पेक्टर निलंबित, सीईओ पीटर एल्बर्स यांची सलग दुसऱ्या दिवशी डीजीसीएने चौकशी केली
15
भाजप आमदारांनी आरोप केलेले तुकाराम मुंढे यांना ‘क्लीन चिट’,ईओडब्ल्यू व पोलिसांच्या चौकशीत काहीच आढळले नाही
16
विमा क्षेत्रात १०० टक्के ‘एफडीआय’ला मंजुरी; आतापर्यंत एफडीआयमार्फत ८२,००० कोटींची परकीय गुंतवणूक
17
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
18
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
19
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
20
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीच्या तडाख्यात महावितरण गार; आठवड्यात विजेचे २० खांब जमीनदोस्त

By रमेश वाबळे | Updated: April 23, 2024 18:29 IST

शहरासह ग्रामीण भागातील वीज पुरवठ्यावर परिणाम

हिंगोली : मागील पंधरवड्यापासून अवकाळी संकट जिल्हावासीयांची पाठ सोडत नसून, अवकाळीच्या माऱ्यात आठवडाभरात विजेचे २० खांब कोसळले असून, वाहिन्याही तुटल्या. या नुकसानीमुळे महावितरण गार झाले असून, वीज पुरवठ्यावर परिणाम होत आहे.

जिल्ह्यात अधूनमधून अवकाळी पावसासह वादळी वारा सुटत आहे. या संकटात महावितरणला फटका बसत असून, गत आठवड्यात हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे, गांगलवाडी, सिद्धेश्वर भागात वीज वाहिन्यांचे नुकसान झाले होते. ती दुरुस्ती होते न होते तोच २२ एप्रिल रोजी रात्री हिंगोली शहरासह डिग्रस कऱ्हाळे, गांगलवाडी, सिद्धेश्वर भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे काही भागात झाड्यांच्या फांद्या तुटून वीज वाहिन्यांवर पडल्या. त्यामुळे वीज वाहिन्या तुटल्या. तर गांगलवाडी शिवारात लोखंडी खांब वाकून जमिनीला टेकल्यामुळे सिद्धेश्वर, डिग्रस कऱ्हाळे येथील जलशुद्धीकरण केंद्राची वीज खंडित झाली. नर्सी नामदेव, पहेणी, कडती, हनवतखेडा, देऊळगाव जहांगीर, गांगलवाडी, डिग्रस कऱ्हाळे भागात सर्वाधिक नुकसान झाले.

मागील पंधरवड्यापासून या अवकाळी संकटात महावितरणला मोठा फटका बसत आहे. एकीकडे नुकसान होत असताना दुसरीकडे दुरुस्तीसाठी मनुष्यबळ आणि साहित्य लागत आहे. त्यामुळे महावितरणचे दुहेरी नुकसान होत आहे. त्यातच वीज खंडित होत असल्याने ग्राहकांच्या नाराजीलाही सामोरे जावे लागत आहे.

पाणीपुरवठ्यास व्यत्यय...२२ एप्रिल रोजी रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा मारा झाल्याने डिग्रस कऱ्हाळे, सिद्धेश्वर भागात वीज वाहिन्यांसह खांब वाकले. यात गांगलवाडी शिवारात लोखंडी खांब वाकून पार जमिनीवर टेकला. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. परिणामी, हिंगोली शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार असल्याचे नगर पालिकेच्या वतीने सांगण्यात आले असून, एक दिवस उशिराने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

वीजपुरवठ्यावर परिणाम...वादळी वाऱ्याच्या तडाख्यात वीज खांब वाकणे, वाहिन्या तुटण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हिंगोली शहरासह ग्रामीण भागात वीज पुरवठ्यावर परिणाम होत आहे. हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथे २२ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास गूल झालेला वीजपुरवठा मध्यरात्री २ वाजता सुरळीत झाला. तर हिंगोली शहरात रात्री ११ वाजेच्या सुमारास वीज गूल झाली होती. जवळपास तासभर वीजपुरवठा गूल होता.

टॅग्स :mahavitaranमहावितरणHingoliहिंगोलीRainपाऊस