शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत दोन गटाच्या वादातून तुफान दगडफेक; तणावसदृश्य स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 12:21 IST

जमावाने शहरातील दुकाने, वाहनांवर दगडफेक केल्याने मोठे झाले आहे

हिंगोली : शहरातील औंढा मार्गावर दोन गटांत वाद निर्माण झाल्यानंतर हजारोंच्या जमावाने शहरातील दुकाने, वाहनांवर दगडफेक केल्याने मोठे नुकसान झाले असून नागरिकांमध्ये दहशतिचे वातावरण आहे. शहरात संचारबंदीसदृश्य वातावरण असून परिस्थिती नियंत्रणात आहे.

सकाळी साडेनऊ ते दहा वाजेच्या दरम्यान दोन समाजाचे नियोजित कार्यक्रम त्यांच्या-त्यांच्या नियोजनप्रमाणे चालत होती. यासाठी जाणाऱ्या वाहनांवर अचानक दगडफेक झाली. कोणीतरी आक्षेपार्ह घोषणा दिल्याचा आरोप होता. त्यानंतर जमावाने या भागातील शेकडो दुकाने व वाहनांवर दगडफेक केली. गांधी चौक ते जिल्हा कचेरीच्या कोपऱ्यापर्यंत, एनटीसी भागात अशी तोडफोड झाली. यात लाखोंचे नुकसान झाले. यात अनेकजण जखमीही झाले असून काहींना गंभीर दुखापत झालेली आहे.

पोलिसांना  या दोन्ही कार्यक्रमांबाबत माहिती असताना त्यांनी पुरेसे नियोजन केले नसल्याचे दिसून आले. त्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप होत आहे. घटनेनंतर मात्र पोलिसांनी जागोजाग नाकेबंदी केली. या घटनेमुळे मात्र शहरात संचारबंदीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्य रस्ते निर्जन दिसत असून ग्रामीण भागातून आलेली मंडळी गावाकडे परतत होती. तर शहरातील अनेक भागात दुकानेही बंद ठेवली होती. दरम्यान, पोलीस अधीक्षक योगेशकुमार, अति.पोलीस अधीक्षक यशवंत काळे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, अतुल चोरमारे, सुधाकर रेड्डी आदींनी घटनास्थळी भेट दिली.

या घटनेनंतर कावड यात्रेलाही परवानगी नाकारली होती. मात्र संयोजक तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी शांततेत ही यात्रा काढण्याचे आश्वासन दिल्याने कावड यात्रेला परवानगी दिली. साडेअकराच्या सुमारास जत्थे पुन्हा कळमनुरीकडे रवाना झाले.

टॅग्स :HingoliहिंगोलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस