शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अजूनही दावे-प्रतिदावेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 23:26 IST

कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर बाजार समितीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला १0 तर भाजप-शिवसेना युतीला ८ जागा मिळाल्या आहेत. मात्र तरीही युतीकडून सत्तास्थापनेचा दावा केला जात असून आता यात भाजप जिल्हाध्यक्ष तथा आ.तान्हाजी मुटकुळेही सभापती युतीचाच होणार असल्याचे म्हणू लागले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर बाजार समितीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला १0 तर भाजप-शिवसेना युतीला ८ जागा मिळाल्या आहेत. मात्र तरीही युतीकडून सत्तास्थापनेचा दावा केला जात असून आता यात भाजप जिल्हाध्यक्ष तथा आ.तान्हाजी मुटकुळेही सभापती युतीचाच होणार असल्याचे म्हणू लागले आहेत.तसे या निवडणुकीपासून आ.मुटकुळे दूरच राहिल्याचे चित्र होते. त्यांनी या रणांगणात थेट न उतरता बाहेरूनच आढावा घेतला. याचप्रमाणे खा.राजीव सातव यांनीही शिलेदारांच्या खांद्यावर धुरा सोपवून शेवटच्या टप्प्यात काही गावांचा दौरा तेवढा केला. मात्र आता खा.सातव सक्रिय झाले आहेत. विरोधकांच्या आक्रमकतेला प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांनी पक्षीय मंडळीला सावध राहण्याचा सल्ला दिला. तसेच निवडणुकीप्रमाणे आता निवडीची बैठक हलक्याने घेऊ नका. यात गांभिर्याने सामोरे जाण्यास सांगितले. दुसरीकडे आ.मुटकुळे यांनीही बाजार समितीत युतीचाच सभापती होणार असल्याचे छातीठोकपणे सांगत वेगळाच रंग भरण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे काँग्रेस-राकाँने बहुतांश जणांना सुरक्षितस्थळी हलविण्याची तयारीही केली. काहींना तर हलविलेही आहे. या निवडणुकीत भाजपचे खा.शिवाजी माने यांची भूमिकाही तेवढीच महत्त्वाची राहणार आहे. पुतणे दत्ता माने यांच्यासाठी त्यांचा फोडाफोडीचा प्रयत्न राहणार आहे. मात्र काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांनी मुलगा दत्ता बोंढारे यांच्यासाठी टाईट फिल्डिंग लावल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकीत भाजपकडून माजी आ.गजानन घुगे यांनी तर सेनेकडून जिल्हाप्रमुख संतोष बांगर, राजेंद्र शिखरे आदींनी रणनीती आखली होती. राकाँचे आ.रामराव वडकुते, मनीष आखरे, कदम आदींनी मेहनत घेतली. मात्र या सर्वच पक्षांना अंतर्गत गटबाजीत काही जागा गमवाव्या लागल्या. तर काही अनपेक्षित मिळाल्या.निवडणुकीपूर्वीच्या समीकरणांपेक्षा नंतरची समीकरणे जुळविणे युतीला अवघड जाणार आहे. जसा युतीच्या नेत्यांना आपल्याच पक्षाच्या लोकांनी धोका दिला. त्यापेक्षा जास्त आघाडीच्या मुळावर ही बाब उठली. आगामी निवडणुकांची ही नांदी असल्याचे चित्र आहे. जो-तो पोखरायला निघाला असला तरीही आघाडीला वर्चस्व राखता आले, हेही तेवढेच खरे. मात्र यामुळे सावध होण्यास वेळही मिळाला असून आगामी काळात याचे राजकीय पडसाद दिसल्यास नवल नाही. सगळेच आलबेल नसल्याचे चित्रही यामुळे समोर आले.या निवडणुकीत सभापती निवडीचा कार्यक्रमही अजून जाहीर झाला नाही. तरीही एकमेकांवर नजर ठेवणे सुरू आहे. तर आतापासून संचालक सहलीवर पाठवणेही खर्चिक ठरणार आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकMarket Yardमार्केट यार्ड