शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

लॉकडाऊनने मरण्यापेक्षा जेलमध्ये राहू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:30 IST

हिंगोली : लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांसह कामगार, छोटे-मोठे व्यापारी, शेतकरी देशोधडीला लागायची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने दोन दिवसांत लॉकडाऊनचा निर्णय ...

हिंगोली : लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांसह कामगार, छोटे-मोठे व्यापारी, शेतकरी देशोधडीला लागायची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने दोन दिवसांत लॉकडाऊनचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा प्रशासनाचे आदेश झुंगारून प्रतिष्ठाणे उघडण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. लॉकडाऊनने मरण्यापेक्षा कायदेभंग करून जेलमध्ये राहू, अशी संतप्त भूमिका घेत ७ एप्रिल रोजी शहरातील व्यापाऱ्यांनी लॉकडाऊनच्या निषेधाचे फलक फडकावून आंदोलन केले.

शहरातील जवाहर रोडवरील बंद दुकानांसमोर निषेधाचे फलक हातात घेऊन जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी आ. तान्हाजी मुटकुळे, हिंगोलीचे नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, कॅटचे राज्य उपाध्यक्ष अनिल नैनवाणी, जिल्हाध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल, शहर अध्यक्ष सुमीत चौधरी, हमीद प्यारेवाले आदी व्यापारी उपस्थित होते. यावेळी लॉकडाऊनचा विरोध करून निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. राज्यात कुठेही संचारबंदी नसताना हिंगोली जिल्ह्यात सात दिवसांची संचारबंदी लागू केली होती. तसेच वेळोवेळी घातलेले निर्बंध व संचारबंदीस व्यापाऱ्यांनी प्रशासनास सहकार्य केले आहे. मागील वर्षभरापासून कोरोना संकटामुळे व्यापारी, कारखानदार, मजूरदार अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत. लॉकडाऊनच्या काळात बहुतांश वर्गाला काही ना काही साहायता मिळाली. व्यापाऱ्यांना मात्र कोणताही दिलासा मिळालेला नाही. उलट व्यापाऱ्यांना प्रत्येक प्रकारचे कर, वीज बिलाचा भरणा करावा लागत आहे. गाळ्यांचे भाडे माफ करण्याच्या विनंतीचीही दखल घेतलेली नाही. कराचा भरणा केला नसल्याने प्रशासनाच्या कठोर कार्यवाहीस सामोरे जावे लागले आहे. व्यापाऱ्यांमुळेच कोरोना होतो, अशी समजूत शासन व प्रशासनाने करून घेल्यामुळे सर्व निर्बंध व्यापाऱ्यांवरच लावले जात आहेत. व्यापाऱ्यांना कुटुंब, घर आहे. त्यांच्यावर अनेक कुटुंब अवलंबवून आहेत. यापूर्वी व्यापार, व्यवसाय बंद असतानाही हजारो प्रवासी, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंची मदत केली आहे. तरीही व्यापाऱ्यांना शासकीय यंत्रणेकडून प्रचंड मानसिक व आर्थिक त्रास होत आहे. आता पुन्हा लॉकडाऊनचा घेतलेला निर्णय व्यापाऱ्याच्या मुळावर उठला आहे. लॉकडाऊमुळेच व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडत असल्याचा आरोपही या निवेदनात केला आहे.

विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करा.

कोरोना आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी विनाकारण फिरणाऱ्यांची जागेवरच सक्तीने चाचणी करावी, त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांची संख्याही कमी होईल आणि व्यापाऱ्यांच्या समस्या सुटून प्रशासनास सहकार्य होईल.

६ एप्रिल रोजी काढलेल्या आदेशामुळे व्यापाऱ्यांवर मोठा अन्याय झाला आहे. प्रचंड आर्थिक व मानसिक तणाव निर्माण होत आहे. आर्थिक व मानसिक तणावाने मरण्यापेक्षा कायदेभंग केल्याबद्दल जेलमध्ये राहिलेले बरे, ह्या निर्णयाप्रत व्यापारी आलेले आहेत.

फोटो : ०२