शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
3
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
4
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
5
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
7
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
8
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
9
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
10
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
11
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
12
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
13
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
14
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
15
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
16
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
17
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
18
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
19
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
20
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

८३ कॉपीबहाद्दरांवर पथकाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 00:40 IST

औरंगाबाद बोर्डातर्फे दहावी व बारावी प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात आली. दहावीची परीक्षा जिल्ह्यातील ५३ तर बारावीची केंद्रावरून परीक्षा केंद्रावरून पार पडली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : औरंगाबाद बोर्डातर्फे दहावी व बारावी प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात आली. दहावीची परीक्षा जिल्ह्यातील ५३ तर बारावीची केंद्रावरून परीक्षा केंद्रावरून पार पडली. कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासकीय यंत्रणा व शिक्षण विभागातर्फे नियोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत नक्कला केल्या त्यांच्याविरूद्ध कारवाई करण्यात आली. या कार्यवाहीदरम्यान बारावीचे ७१ तर दहावीतील १२ परीक्षार्थी कॉपी प्रकरणात अडकले.जिल्ह्यात उच्च माध्यमिक बारावी प्रमाणपत्र परीक्षा २०१९ दिनांक २१ फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत तर माध्यमिक शालांत इयत्ता दहावी प्रमाणपत्र परीक्षा १ ते २२ मार्च या कालावधीत घेण्यात आली. सदर परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी व परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हा दक्षता समितीची बैठक जिल्हाधिकारी हिंगोली यांच्या अध्यक्षतेखाली ७ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली. परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्राना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड यांनी भेटी दिल्या. तसेच परीक्षा केंद्राना भेटी देण्यासाठी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांना आदेशीत करण्यात आले होते. परीक्षा केंद्रांना भेटी देण्यासाठी जिल्हास्तरावर डायटचे प्राचार्य गणेश शिंदे, शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के, उपशिक्षणाधिकारी डी.के. इंगोले, उपशिक्षणाधिकारी तान्हाजी भोसले, शोभा मोकळे असे पाच भरारी पथकाची स्थापना करण्यात आली होती. १२ वीच्या ३४ परीक्षा केंद्रावर ३४ बैठे पथक व इ. १० वी च्या ५३ परीक्षा केंद्रावर ५३ बैठे पथक परीक्षा कालावधीत नियुक्त करण्यात आले होते. १२ वी परीक्षेसाठी ३४ परीक्षा केंद्रावर १३२७५ विद्यार्थी व इ. १० वी परीक्षेसाठी ५३ परीक्षा केंद्रावर १७४४५ विद्यार्थीसंख्या होती. सदर परीक्षा करीता १२ वीस ६७५ व ई. १० वीस ९१६ पर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच परीक्षेच्या कामाकरिता मंडळाकडून जिल्ह्यात ७ परीक्षक कार्यालयाची नियुक्ती करण्यात आली होती. परीक्षेचे तालुक्यात संचलन सुव्यवस्थित होण्यासाठी गटशिक्षणाधिकारी डी.सी. नांदे, आर.आर. पातळे, एन.बी. थोरात, एस.एस. बगाटे, उमेश राऊत यांनी कार्य केले. दहावी व बारावीतील एकूण उपस्थित विद्यार्थी संख्या, तसेच अनुपस्थिती असा दैनंदिन अहवाल शिक्षण विभागातील संबधितांनी सादर केला. तसेच कॉपी प्रकरण असल्यास तात्काळ माहिती अद्ययावत केली जात होती.एकंदरीत १२ वी व १० वी परीक्षेकरीता २१०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. शिक्षणाधिकारी सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील परीक्षेचे नियोजन संतोष वडकुते, पुष्पराज कटके, एम.ए.सय्यद, गजानन पळसकर, विनोद करंडे यांनी केले. परीक्षा कालावधीत १२ वी चे ७१ कॉपी प्रकरण व इयत्ता १० वीचे १२ कॉपी प्रकरणे झाली. १२ वी व इयत्ता १० वी परीक्षा हिंगोली जिल्ह्यात शांततेत व सुरळीत संपन्न झाल्या. परीक्षे दरम्यान प्रशासकीय यंत्रणा व शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कामकाज पाहिले. तसेच परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या.

 

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थी