शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

८३ कॉपीबहाद्दरांवर पथकाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 00:40 IST

औरंगाबाद बोर्डातर्फे दहावी व बारावी प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात आली. दहावीची परीक्षा जिल्ह्यातील ५३ तर बारावीची केंद्रावरून परीक्षा केंद्रावरून पार पडली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : औरंगाबाद बोर्डातर्फे दहावी व बारावी प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात आली. दहावीची परीक्षा जिल्ह्यातील ५३ तर बारावीची केंद्रावरून परीक्षा केंद्रावरून पार पडली. कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासकीय यंत्रणा व शिक्षण विभागातर्फे नियोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत नक्कला केल्या त्यांच्याविरूद्ध कारवाई करण्यात आली. या कार्यवाहीदरम्यान बारावीचे ७१ तर दहावीतील १२ परीक्षार्थी कॉपी प्रकरणात अडकले.जिल्ह्यात उच्च माध्यमिक बारावी प्रमाणपत्र परीक्षा २०१९ दिनांक २१ फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत तर माध्यमिक शालांत इयत्ता दहावी प्रमाणपत्र परीक्षा १ ते २२ मार्च या कालावधीत घेण्यात आली. सदर परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी व परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हा दक्षता समितीची बैठक जिल्हाधिकारी हिंगोली यांच्या अध्यक्षतेखाली ७ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली. परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्राना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड यांनी भेटी दिल्या. तसेच परीक्षा केंद्राना भेटी देण्यासाठी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांना आदेशीत करण्यात आले होते. परीक्षा केंद्रांना भेटी देण्यासाठी जिल्हास्तरावर डायटचे प्राचार्य गणेश शिंदे, शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के, उपशिक्षणाधिकारी डी.के. इंगोले, उपशिक्षणाधिकारी तान्हाजी भोसले, शोभा मोकळे असे पाच भरारी पथकाची स्थापना करण्यात आली होती. १२ वीच्या ३४ परीक्षा केंद्रावर ३४ बैठे पथक व इ. १० वी च्या ५३ परीक्षा केंद्रावर ५३ बैठे पथक परीक्षा कालावधीत नियुक्त करण्यात आले होते. १२ वी परीक्षेसाठी ३४ परीक्षा केंद्रावर १३२७५ विद्यार्थी व इ. १० वी परीक्षेसाठी ५३ परीक्षा केंद्रावर १७४४५ विद्यार्थीसंख्या होती. सदर परीक्षा करीता १२ वीस ६७५ व ई. १० वीस ९१६ पर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच परीक्षेच्या कामाकरिता मंडळाकडून जिल्ह्यात ७ परीक्षक कार्यालयाची नियुक्ती करण्यात आली होती. परीक्षेचे तालुक्यात संचलन सुव्यवस्थित होण्यासाठी गटशिक्षणाधिकारी डी.सी. नांदे, आर.आर. पातळे, एन.बी. थोरात, एस.एस. बगाटे, उमेश राऊत यांनी कार्य केले. दहावी व बारावीतील एकूण उपस्थित विद्यार्थी संख्या, तसेच अनुपस्थिती असा दैनंदिन अहवाल शिक्षण विभागातील संबधितांनी सादर केला. तसेच कॉपी प्रकरण असल्यास तात्काळ माहिती अद्ययावत केली जात होती.एकंदरीत १२ वी व १० वी परीक्षेकरीता २१०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. शिक्षणाधिकारी सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील परीक्षेचे नियोजन संतोष वडकुते, पुष्पराज कटके, एम.ए.सय्यद, गजानन पळसकर, विनोद करंडे यांनी केले. परीक्षा कालावधीत १२ वी चे ७१ कॉपी प्रकरण व इयत्ता १० वीचे १२ कॉपी प्रकरणे झाली. १२ वी व इयत्ता १० वी परीक्षा हिंगोली जिल्ह्यात शांततेत व सुरळीत संपन्न झाल्या. परीक्षे दरम्यान प्रशासकीय यंत्रणा व शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कामकाज पाहिले. तसेच परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या.

 

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थी