शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

भावी तलाठ्यांसाठी हिंगोली आगाराची विशेष बससेवा; पहाटे ५ वाजता अमरावतीकडे होणार रवाना

By रमेश वाबळे | Updated: August 18, 2023 18:05 IST

पुढील पंधरा दिवस सुरू राहणार बसफेरी

हिंगोली : शासनाच्यावतीने जिल्हा परिषद, महसूल विभागातंर्गत विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. प्रामुख्याने तलाठी पदासाठी लेखी परीक्षेकरिता हिंगोली जिल्ह्यातील बहुतांश उमेदवारांचे परीक्षा केंद्र अमरावती येथे आले आहे. या उमेदवारांना परीक्षा केंद्रावर पोहोचणे सोयीचे व्हावे यासाठी येथील एसटी आगाराच्या वतीने विशेष बस सुरू केली आहे. जवळपास पंधरा दिवस दररोज पहाटे ५:३० वाजता ही बस हिंगोली बसस्थानकातून रवाना होणार असून, ९:३० वाजता अमरावतीत पोहोचणार आहे.

महसूल विभागात कोतवाल, तलाठी तसेच जिल्हा परिषदांमध्येही नोकर भरती प्रक्रिया सुरू आहे. १६ ऑगस्ट रोजी सहकार विभागातील पदासाठी लेखी परीक्षा झाली. या परीक्षेसाठी हिंगोली जिल्ह्यातून अनेक परीक्षार्थी अमरावतीला गेले होते. या दिवशी अनेकांना अमरावती गाठण्यासाठी धावपळ करावी लागली. बस, रेल्वे, तसेच मिळेल त्या खासगी वाहनाने परीक्षा केंद्र गाठावे लागले. येणाऱ्या दिवसात तलाठी पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. उमेदवारांना परीक्षा केंद्रावर पोहोचणे सोयीचे व्हावे यासाठी नोकर भरती लेखी परीक्षेदरम्यान हिंगोली आगारातून अमरावतीसाठी विशेष बस सुरू करण्याची मागणी पुढे येत होती. त्यानुसार एसटी आगाराच्या वतीने पहाटे ५:३० वाजता अमरावतीसाठी बस सोडण्यात येत आहे. १७ ऑगस्टपासून ही बस सुरू करण्यात आली असून, जवळपास पंधरा ते वीस दिवस ही बस सोडण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक निरीक्षक एफ.एम. शेख यांनी दिली.

सकाळच्या सत्रातील परीक्षार्थींनी कशी गाठायची अमरावती?...तलाठी पदासाठी तीन सत्रात लेखी परीक्षा होणार आहे. सकाळी ७ वाजता पहिल्या सत्रात, त्यानंतर ११ वाजता दुसरे सत्र ते तिसऱ्या सत्रातील लेखी परीक्षा दुपारी ३ वाजता सुरू होणार आहे. हिंगोली आगाराच्या वतीने सकाळी ११ आणि दुपारी ३ वाजता लेखी परीक्षेसाठी जाणाऱ्या उमेदवारांकरीता बस उपयोगी पडणार आहे. परंतु, ज्यांची परीक्षा सकाळी ७ वाजता आहे, त्यांना परीक्षेच्या आदल्या दिवशीच अमरावती गाठावी लागणार आहे. त्यासाठी सकाळी ६:३० वाजता अमरावती येथे पोहोचेल अशी बस सुरू करण्याची मागणी परीक्षार्थींतून होत आहे.

उमेदवारांच्या सोयीसाठी बससेवा...सध्या नोकर भरती सुरू असून अमरावती, अकोला येथे लेखी परीक्षा देण्यासाठी जाणाऱ्या परीक्षार्थींची संख्या वाढली आहे. वेळेत बस किंवा इतर वाहन उपलब्ध झाले नाही तर उमेदवारांवर धावपळ करण्याची वेळ येते. परीक्षार्थींना केंद्र गाठणे सोयीचे व्हावे यासाठी हिंगोली आगाराच्या वतीने विशेष बस सोडण्यात येत आहे. दररोज पहाटे ५ वाजता हिंगोली ते अमरावती ही बस सोडण्यात येत आहे. या बससेवेचा उमेदवारांनी लाभ घ्यावा.- सूर्यकांत थोरबोले, आगार प्रमुख, हिंगोली

टॅग्स :Hingoliहिंगोलीstate transportएसटी