शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

भावी तलाठ्यांसाठी हिंगोली आगाराची विशेष बससेवा; पहाटे ५ वाजता अमरावतीकडे होणार रवाना

By रमेश वाबळे | Updated: August 18, 2023 18:05 IST

पुढील पंधरा दिवस सुरू राहणार बसफेरी

हिंगोली : शासनाच्यावतीने जिल्हा परिषद, महसूल विभागातंर्गत विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. प्रामुख्याने तलाठी पदासाठी लेखी परीक्षेकरिता हिंगोली जिल्ह्यातील बहुतांश उमेदवारांचे परीक्षा केंद्र अमरावती येथे आले आहे. या उमेदवारांना परीक्षा केंद्रावर पोहोचणे सोयीचे व्हावे यासाठी येथील एसटी आगाराच्या वतीने विशेष बस सुरू केली आहे. जवळपास पंधरा दिवस दररोज पहाटे ५:३० वाजता ही बस हिंगोली बसस्थानकातून रवाना होणार असून, ९:३० वाजता अमरावतीत पोहोचणार आहे.

महसूल विभागात कोतवाल, तलाठी तसेच जिल्हा परिषदांमध्येही नोकर भरती प्रक्रिया सुरू आहे. १६ ऑगस्ट रोजी सहकार विभागातील पदासाठी लेखी परीक्षा झाली. या परीक्षेसाठी हिंगोली जिल्ह्यातून अनेक परीक्षार्थी अमरावतीला गेले होते. या दिवशी अनेकांना अमरावती गाठण्यासाठी धावपळ करावी लागली. बस, रेल्वे, तसेच मिळेल त्या खासगी वाहनाने परीक्षा केंद्र गाठावे लागले. येणाऱ्या दिवसात तलाठी पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. उमेदवारांना परीक्षा केंद्रावर पोहोचणे सोयीचे व्हावे यासाठी नोकर भरती लेखी परीक्षेदरम्यान हिंगोली आगारातून अमरावतीसाठी विशेष बस सुरू करण्याची मागणी पुढे येत होती. त्यानुसार एसटी आगाराच्या वतीने पहाटे ५:३० वाजता अमरावतीसाठी बस सोडण्यात येत आहे. १७ ऑगस्टपासून ही बस सुरू करण्यात आली असून, जवळपास पंधरा ते वीस दिवस ही बस सोडण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक निरीक्षक एफ.एम. शेख यांनी दिली.

सकाळच्या सत्रातील परीक्षार्थींनी कशी गाठायची अमरावती?...तलाठी पदासाठी तीन सत्रात लेखी परीक्षा होणार आहे. सकाळी ७ वाजता पहिल्या सत्रात, त्यानंतर ११ वाजता दुसरे सत्र ते तिसऱ्या सत्रातील लेखी परीक्षा दुपारी ३ वाजता सुरू होणार आहे. हिंगोली आगाराच्या वतीने सकाळी ११ आणि दुपारी ३ वाजता लेखी परीक्षेसाठी जाणाऱ्या उमेदवारांकरीता बस उपयोगी पडणार आहे. परंतु, ज्यांची परीक्षा सकाळी ७ वाजता आहे, त्यांना परीक्षेच्या आदल्या दिवशीच अमरावती गाठावी लागणार आहे. त्यासाठी सकाळी ६:३० वाजता अमरावती येथे पोहोचेल अशी बस सुरू करण्याची मागणी परीक्षार्थींतून होत आहे.

उमेदवारांच्या सोयीसाठी बससेवा...सध्या नोकर भरती सुरू असून अमरावती, अकोला येथे लेखी परीक्षा देण्यासाठी जाणाऱ्या परीक्षार्थींची संख्या वाढली आहे. वेळेत बस किंवा इतर वाहन उपलब्ध झाले नाही तर उमेदवारांवर धावपळ करण्याची वेळ येते. परीक्षार्थींना केंद्र गाठणे सोयीचे व्हावे यासाठी हिंगोली आगाराच्या वतीने विशेष बस सोडण्यात येत आहे. दररोज पहाटे ५ वाजता हिंगोली ते अमरावती ही बस सोडण्यात येत आहे. या बससेवेचा उमेदवारांनी लाभ घ्यावा.- सूर्यकांत थोरबोले, आगार प्रमुख, हिंगोली

टॅग्स :Hingoliहिंगोलीstate transportएसटी