शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
2
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
3
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
4
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
5
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
6
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
7
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोड्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
8
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
9
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
10
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
11
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
12
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
13
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
15
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
16
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
17
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
18
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
19
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
20
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
Daily Top 2Weekly Top 5

भावी तलाठ्यांसाठी हिंगोली आगाराची विशेष बससेवा; पहाटे ५ वाजता अमरावतीकडे होणार रवाना

By रमेश वाबळे | Updated: August 18, 2023 18:05 IST

पुढील पंधरा दिवस सुरू राहणार बसफेरी

हिंगोली : शासनाच्यावतीने जिल्हा परिषद, महसूल विभागातंर्गत विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. प्रामुख्याने तलाठी पदासाठी लेखी परीक्षेकरिता हिंगोली जिल्ह्यातील बहुतांश उमेदवारांचे परीक्षा केंद्र अमरावती येथे आले आहे. या उमेदवारांना परीक्षा केंद्रावर पोहोचणे सोयीचे व्हावे यासाठी येथील एसटी आगाराच्या वतीने विशेष बस सुरू केली आहे. जवळपास पंधरा दिवस दररोज पहाटे ५:३० वाजता ही बस हिंगोली बसस्थानकातून रवाना होणार असून, ९:३० वाजता अमरावतीत पोहोचणार आहे.

महसूल विभागात कोतवाल, तलाठी तसेच जिल्हा परिषदांमध्येही नोकर भरती प्रक्रिया सुरू आहे. १६ ऑगस्ट रोजी सहकार विभागातील पदासाठी लेखी परीक्षा झाली. या परीक्षेसाठी हिंगोली जिल्ह्यातून अनेक परीक्षार्थी अमरावतीला गेले होते. या दिवशी अनेकांना अमरावती गाठण्यासाठी धावपळ करावी लागली. बस, रेल्वे, तसेच मिळेल त्या खासगी वाहनाने परीक्षा केंद्र गाठावे लागले. येणाऱ्या दिवसात तलाठी पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. उमेदवारांना परीक्षा केंद्रावर पोहोचणे सोयीचे व्हावे यासाठी नोकर भरती लेखी परीक्षेदरम्यान हिंगोली आगारातून अमरावतीसाठी विशेष बस सुरू करण्याची मागणी पुढे येत होती. त्यानुसार एसटी आगाराच्या वतीने पहाटे ५:३० वाजता अमरावतीसाठी बस सोडण्यात येत आहे. १७ ऑगस्टपासून ही बस सुरू करण्यात आली असून, जवळपास पंधरा ते वीस दिवस ही बस सोडण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक निरीक्षक एफ.एम. शेख यांनी दिली.

सकाळच्या सत्रातील परीक्षार्थींनी कशी गाठायची अमरावती?...तलाठी पदासाठी तीन सत्रात लेखी परीक्षा होणार आहे. सकाळी ७ वाजता पहिल्या सत्रात, त्यानंतर ११ वाजता दुसरे सत्र ते तिसऱ्या सत्रातील लेखी परीक्षा दुपारी ३ वाजता सुरू होणार आहे. हिंगोली आगाराच्या वतीने सकाळी ११ आणि दुपारी ३ वाजता लेखी परीक्षेसाठी जाणाऱ्या उमेदवारांकरीता बस उपयोगी पडणार आहे. परंतु, ज्यांची परीक्षा सकाळी ७ वाजता आहे, त्यांना परीक्षेच्या आदल्या दिवशीच अमरावती गाठावी लागणार आहे. त्यासाठी सकाळी ६:३० वाजता अमरावती येथे पोहोचेल अशी बस सुरू करण्याची मागणी परीक्षार्थींतून होत आहे.

उमेदवारांच्या सोयीसाठी बससेवा...सध्या नोकर भरती सुरू असून अमरावती, अकोला येथे लेखी परीक्षा देण्यासाठी जाणाऱ्या परीक्षार्थींची संख्या वाढली आहे. वेळेत बस किंवा इतर वाहन उपलब्ध झाले नाही तर उमेदवारांवर धावपळ करण्याची वेळ येते. परीक्षार्थींना केंद्र गाठणे सोयीचे व्हावे यासाठी हिंगोली आगाराच्या वतीने विशेष बस सोडण्यात येत आहे. दररोज पहाटे ५ वाजता हिंगोली ते अमरावती ही बस सोडण्यात येत आहे. या बससेवेचा उमेदवारांनी लाभ घ्यावा.- सूर्यकांत थोरबोले, आगार प्रमुख, हिंगोली

टॅग्स :Hingoliहिंगोलीstate transportएसटी