शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

सोयाबीन पोहोचले ७ हजारांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:31 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी आदेश लागू आहेत. काही व्यवहारांवर प्रतिबंध घालण्यात आले होते. आता कृषी क्षेत्राशी निगडित व्यवहार सुरू ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी आदेश लागू आहेत. काही व्यवहारांवर प्रतिबंध घालण्यात आले होते. आता कृषी क्षेत्राशी निगडित व्यवहार सुरू झाले असून शेतकरी शेतमाल विक्रीसाठी शहरात आणत आहेत. हिंगोली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोढ्यात तूर, हरभरा, बाजरी, हळद, ज्वारी आदी शेतमाल विक्रीसाठी येत आहे. मात्र, आवक वाढल्याने या शेतमालाचे दर घसरण्यास सुरुवात झाली. सध्या गहू २४०० ते १८०० रुपये प्रति क्विंटल, टाळकी १७०० ते २००० रुपये, हरभरा ४८०० ते ५२०० रुपये, हायब्रीड ९०० ते ११०० रुपये, तूर ६३५० ते ६७२५ रुपये तर हळदीला ६५०० ते ७४०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. शेतमालाची आवक होत असलेली दिसताच शेतमालाचे भावही घसरत आहेत. एकीकडे तूर, हळद, गहू, ज्वारी आदी शेतमालाचे दर घसरत असताना सोयाबीनच्या दरात मात्र वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी चांगल्या सोयाबीनला उच्चांकी ७ हजार रुपये भाव मिळत होता. खाद्य तेलाच्या किमती वाढत असल्याने सोयाबीनला मागणी वाढली असल्याचे व्यापारी साांगत आहेत. तसेच टाळेबंदीमुळे व्यवहारावर मर्यादा आली आहे. त्यामुळे पैसा खेळता राहत नसल्याने शेतमालाचे दर घसरत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, सोयाबीनचे दर वाढत असले तरी मोजक्याच शेतकऱ्यांकडे सोयाबीन शिल्लक राहिले आहे. काही शेतकरी तर पेरणीसाठी ठेवलेले सोयाबीन विक्रीसाठी काढत आहेत.