शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन पोहोचले ७ हजारांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:31 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी आदेश लागू आहेत. काही व्यवहारांवर प्रतिबंध घालण्यात आले होते. आता कृषी क्षेत्राशी निगडित व्यवहार सुरू ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी आदेश लागू आहेत. काही व्यवहारांवर प्रतिबंध घालण्यात आले होते. आता कृषी क्षेत्राशी निगडित व्यवहार सुरू झाले असून शेतकरी शेतमाल विक्रीसाठी शहरात आणत आहेत. हिंगोली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोढ्यात तूर, हरभरा, बाजरी, हळद, ज्वारी आदी शेतमाल विक्रीसाठी येत आहे. मात्र, आवक वाढल्याने या शेतमालाचे दर घसरण्यास सुरुवात झाली. सध्या गहू २४०० ते १८०० रुपये प्रति क्विंटल, टाळकी १७०० ते २००० रुपये, हरभरा ४८०० ते ५२०० रुपये, हायब्रीड ९०० ते ११०० रुपये, तूर ६३५० ते ६७२५ रुपये तर हळदीला ६५०० ते ७४०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. शेतमालाची आवक होत असलेली दिसताच शेतमालाचे भावही घसरत आहेत. एकीकडे तूर, हळद, गहू, ज्वारी आदी शेतमालाचे दर घसरत असताना सोयाबीनच्या दरात मात्र वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी चांगल्या सोयाबीनला उच्चांकी ७ हजार रुपये भाव मिळत होता. खाद्य तेलाच्या किमती वाढत असल्याने सोयाबीनला मागणी वाढली असल्याचे व्यापारी साांगत आहेत. तसेच टाळेबंदीमुळे व्यवहारावर मर्यादा आली आहे. त्यामुळे पैसा खेळता राहत नसल्याने शेतमालाचे दर घसरत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, सोयाबीनचे दर वाढत असले तरी मोजक्याच शेतकऱ्यांकडे सोयाबीन शिल्लक राहिले आहे. काही शेतकरी तर पेरणीसाठी ठेवलेले सोयाबीन विक्रीसाठी काढत आहेत.