शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
3
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
4
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
5
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
6
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
7
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
8
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
9
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
10
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
11
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
12
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
13
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
14
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
15
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
16
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
17
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
18
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
19
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
20
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी

आत्मा उपलब्ध करणार भाजीपाला विक्रीची बाजारपेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 23:56 IST

शहरातील नागरिकांना सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला भाजीपाला थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करता यावा, त्यातून शेतकऱ्यांनाही चांगला भाव मिळावा या उद्देशाने आत्मा केंद्र शेतकºयांसाठी भाजीपाला विक्रीचा बाजार उभारणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील नागरिकांना सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला भाजीपाला थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करता यावा, त्यातून शेतकऱ्यांनाही चांगला भाव मिळावा या उद्देशाने आत्मा केंद्र शेतकºयांसाठी भाजीपाला विक्रीचा बाजार उभारणार आहे.शेतकºयांनी पिकविलेल्या शेतमालाला चांगली बाजारपेठ उपलब्ध होत नाही. त्यामुळे शेतकºयांना मोठा तोटा सहन करावा लागतो. तसेच शहरातील नागरिकांनाही ताजा व सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला भाजीपाला शोधूनही सापडत नाही. शहरातील ग्राहकांचा संबंध थेट शेतकºयाशी आला तर शेतकºयांच्या मालाला चांगला भाव मिळू शकतो. विक्रीसाठी मध्यस्थी व्यापाºयांचा संबंधच येणार नसल्याने ते पैसे शेतकºयांनाच मिळणार आहेत. या उद्देशाने कृषी अधीक्षक कार्यालयासमोर शेतकºयांना भाजीपाला विक्रीसाठी काही ओटे बनविण्यात येणार आहेत. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) तर्फे यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. लवकरच ही सुविधा शेतकºयांसाठी चालू करण्यात येणार असल्याचे आत्मा केंद्राचे प्रकल्प उपसंचालक युवराज शहारे यांनी सांगितले. शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी शेतकºयांना कसरत करावी लागते. त्यामध्ये वेळही अधिक जातो.शेतीचे इतर कामे सोडून शेतमाल विक्री करणे शेतकºयाला परवडत नाही. त्यामुळे शेतमाल चांगल्या किंमतीत विक्री करणे ही शेतकºयांसाठी डोकेदुखी ठरते आहे. शेतकºयांनी विक्रीसाठी आणलेला माल व्यापारी कवडीमोल दरात खरेदी करुन चढ्या दराने त्याची विक्री करतात. त्याचा भुर्दंड शेतकºयांसह ग्राहकांनाही सहन करावा लागतो. ही बाजारपेठ सुरु झाल्यास ग्राहक व शेतकरी या दोघांचाही फायदा होणार आहे.मार्चमध्ये सुरु होणार बाजारपेठजिल्ह्यात आत्मा केंद्राचे १२९७ शेतकरी गट आहेत. या गटांत जवळपास १३ ते १५ हजार शेतकºयांचा समावेश आहे. या शेतकºयांना सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला उत्पादन व विक्रीबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यानंतर मार्च महिन्याअखेर बाजारपेठ सुरु होणार असल्याचे आत्माचे युवराज शहारे यांनी सांगितले.केवळ शेतकºयांसाठीच असणार बाजारपेठकृषी अधीक्षक कार्यालयासमोर रस्त्यालगत २० बाय १५ आणि ३० बाय २० या आकाराचे दोन शेड व ओटे उभारण्यात येणार आहे. यासाठी किमान दोन लाखांचा खर्च अपेक्षित आहे. ही बाजारपेठ जिल्ह्यातील सर्व शेतकºयांसाठी असणार आहे. त्यामध्ये आत्मा गटांच्या शेतकºयांना प्राधान्य देण्यात येणार आहे. कृषी अधीक्षक कार्यालयासमोरील जागा दर्शनी भागात आहे. येथे शहरातील नागरिकांची मोठी वर्दळ असतो. त्याचा फायदा या बाजारपेठेला होणार आहे. शेतकºयांनी उत्पादित केलेला सर्वच माल येथे विक्री करता येणार आहे.

टॅग्स :vegetableभाज्याMarketबाजार