शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
3
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
4
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
5
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
6
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
7
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
8
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
9
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
10
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
11
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
12
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
13
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
14
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
15
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
16
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
17
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
18
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
19
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
20
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!

आत्मा उपलब्ध करणार भाजीपाला विक्रीची बाजारपेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 23:56 IST

शहरातील नागरिकांना सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला भाजीपाला थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करता यावा, त्यातून शेतकऱ्यांनाही चांगला भाव मिळावा या उद्देशाने आत्मा केंद्र शेतकºयांसाठी भाजीपाला विक्रीचा बाजार उभारणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील नागरिकांना सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला भाजीपाला थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करता यावा, त्यातून शेतकऱ्यांनाही चांगला भाव मिळावा या उद्देशाने आत्मा केंद्र शेतकºयांसाठी भाजीपाला विक्रीचा बाजार उभारणार आहे.शेतकºयांनी पिकविलेल्या शेतमालाला चांगली बाजारपेठ उपलब्ध होत नाही. त्यामुळे शेतकºयांना मोठा तोटा सहन करावा लागतो. तसेच शहरातील नागरिकांनाही ताजा व सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला भाजीपाला शोधूनही सापडत नाही. शहरातील ग्राहकांचा संबंध थेट शेतकºयाशी आला तर शेतकºयांच्या मालाला चांगला भाव मिळू शकतो. विक्रीसाठी मध्यस्थी व्यापाºयांचा संबंधच येणार नसल्याने ते पैसे शेतकºयांनाच मिळणार आहेत. या उद्देशाने कृषी अधीक्षक कार्यालयासमोर शेतकºयांना भाजीपाला विक्रीसाठी काही ओटे बनविण्यात येणार आहेत. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) तर्फे यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. लवकरच ही सुविधा शेतकºयांसाठी चालू करण्यात येणार असल्याचे आत्मा केंद्राचे प्रकल्प उपसंचालक युवराज शहारे यांनी सांगितले. शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी शेतकºयांना कसरत करावी लागते. त्यामध्ये वेळही अधिक जातो.शेतीचे इतर कामे सोडून शेतमाल विक्री करणे शेतकºयाला परवडत नाही. त्यामुळे शेतमाल चांगल्या किंमतीत विक्री करणे ही शेतकºयांसाठी डोकेदुखी ठरते आहे. शेतकºयांनी विक्रीसाठी आणलेला माल व्यापारी कवडीमोल दरात खरेदी करुन चढ्या दराने त्याची विक्री करतात. त्याचा भुर्दंड शेतकºयांसह ग्राहकांनाही सहन करावा लागतो. ही बाजारपेठ सुरु झाल्यास ग्राहक व शेतकरी या दोघांचाही फायदा होणार आहे.मार्चमध्ये सुरु होणार बाजारपेठजिल्ह्यात आत्मा केंद्राचे १२९७ शेतकरी गट आहेत. या गटांत जवळपास १३ ते १५ हजार शेतकºयांचा समावेश आहे. या शेतकºयांना सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला उत्पादन व विक्रीबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यानंतर मार्च महिन्याअखेर बाजारपेठ सुरु होणार असल्याचे आत्माचे युवराज शहारे यांनी सांगितले.केवळ शेतकºयांसाठीच असणार बाजारपेठकृषी अधीक्षक कार्यालयासमोर रस्त्यालगत २० बाय १५ आणि ३० बाय २० या आकाराचे दोन शेड व ओटे उभारण्यात येणार आहे. यासाठी किमान दोन लाखांचा खर्च अपेक्षित आहे. ही बाजारपेठ जिल्ह्यातील सर्व शेतकºयांसाठी असणार आहे. त्यामध्ये आत्मा गटांच्या शेतकºयांना प्राधान्य देण्यात येणार आहे. कृषी अधीक्षक कार्यालयासमोरील जागा दर्शनी भागात आहे. येथे शहरातील नागरिकांची मोठी वर्दळ असतो. त्याचा फायदा या बाजारपेठेला होणार आहे. शेतकºयांनी उत्पादित केलेला सर्वच माल येथे विक्री करता येणार आहे.

टॅग्स :vegetableभाज्याMarketबाजार