शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

हिंगोली जिल्ह्यात हत्ता, घोरदरी येथे उभा राहणार सौर कृषी वीज केंद्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 18:02 IST

हत्ता व घोरदरी येथे आगामी काळात प्रत्येकी २ मेगावॅटचे सौर कृषी वीज केंद्र उभे राहणार असून त्याला मंजुरी मिळाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिली.

हिंगोली : हत्ता व घोरदरी येथे आगामी काळात प्रत्येकी २ मेगावॅटचे सौर कृषी वीज केंद्र उभे राहणार असून त्याला मंजुरी मिळाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात २0१७ सिद्धी ते २0१८ संकल्प या विषयावरील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जि.प.सीईओ एच.पी.तुम्मोड, अति.जिल्हाधिकारी जगदीश मिनियार, अति.मुकाअ ए.एम. देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी लतीफ पठाण, उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी, कृषी अधीक्षक विजय लोखंडे, माहिती अधिकारी सूर्यवंशी आदीसह विविध विभागांच्या अधिकार्‍यांची उपस्थिती होती.

यापूर्वी झालेली वैशिष्ट्यपूर्ण कामे व आगामी काळातील संकल्पांविषयी यात माहिती देण्यात आली. यावेळी भंडारी म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही संकल्पना आहे. महानिर्मितीमार्फत हे काम केले जाणार आहे. या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी चार हेक्टर जागा लागणार आहे. लवकरच गायरान जमिनीचे हस्तांतरण केले जाणार आहे.यावेळी जिल्हा उपनिबंधक सुधीर म्हैत्रेवार म्हणाले, कर्जमाफीचे आॅनलाईन १.०९ लाख अर्ज प्राप्त झाले. ३५ हजार ६३७ शेतकर्‍यांना ११७.३४ कोटी मंजूर झाले. यापैकी २९ हजार ५६ शेतकर्‍यांचे ८५.९१ कोटी रुपये प्रत्यक्ष खात्यावर जमा झाले. तर पूर्वी तीन बाजार समितीत लिलाव व्हायचा. आता सर्वच बाजार समित्यांत लिलाव होत आहे. उपबाजारपेठांमध्येही ही सुविधा केली जाणार आहे. ८५ सेवा सोसायट्यांचे संगणकीकरण केले जाणार आहे. तर हिंगोली व सेनगाव बाजार समितीचा ई-नाममध्ये सहभाग होईल.वनविभागाचे केशव वाबळे म्हणाले, अंजनवाडा गावच्या वन समितीस राज्य स्तरावरील चौथा पुरस्कार मिळाला. तर तेंदूच्या ११ घटकांतून २.१६ कोटींचा महसूल मिळाला. बोनस ३८.३४ कोटी वाटप केला जात आहे. वन्य प्राण्यांनी केलेल्या नुकसानाबद्दल १५00  शेतकर्‍यांना १४.१५ लक्ष रुपये वितरित केले आहेत. अतिक्रमण निर्मूलनात ६0५ हेक्टर वनजमिनीवरील अतिक्रमणे काढली.कृषी अधीक्षक विजय लोखंडे म्हणाले, यांत्रिकीकरण योजनेत २७६ ट्रॅक्टर व २१६ अवजारे वितरित केले. ८0 सामूहिक शेततळे घेतले आहेत. तर ठिबक व तुषार सिंचनासाठी १0 कोटी मिळाले आहेत. नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजनेत दहा गावांची निवड झाली असून शेती सिंचन व जोडव्यवसायासाठी ही योजना आहे. सेनगाव तालुक्यातील लिंगदरी, जामदया, गोंडाळा, उमरदरी या गावांत पथदर्शी प्रकल्प राबविला जाणार आहे.

रेशीम लागवडीत जिल्हा दुसरा रेशीम अधिकार्‍यांनी हिंगोली जिल्हा रेशीम लागवडीत राज्यात दुसरा असल्याचे सांगितले. यात २00 एकरचे उद्दिष्ट असताना ७८८ एकरवर लागवड झाली. तर येत्या दोन वर्षांत २ हजार हेक्टरवर लागवड नेण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. तर जिल्हाधिकारी भंडारी यांनी आगामी काळात रेशीम उत्पादकांना गटशेतीचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. शिवाय ६८४ गावांचे आॅनलाईन सातबाराचे काम झाले असून १३ गावे शिल्लक राहिल्याचे सांगितले. तर हस्तलिखिताप्रमाणे सातबारा नसल्यास त्याची अजूनही दुरुस्ती करणे शक्य असल्याचेही ते म्हणाले.

दोन तालुके हागणदारीमुक्तसीईओ एच.पी. तुम्मोड म्हणाले, स्वच्छ भारत योजनेत १.८१ पैकी १.६१ लाख कुटुंबांनी शौचालय बांधकाम केले. हे काम ९१.१४ टक्के एवढे आहे. ५६३ पैकी ३९६ गावे हागणदारीमुक्त झाली आहेत. हिंगोली व औंढा हे दोन तालुके हागणदारीमुक्त झाले. २0 जानेवारीपर्यंत जिल्हा हागणदारीमुक्त होणार आहे. घरकुल योजनेत हिंगोली जिल्हा राज्यात दुसरा आहे. तर लोकवाट्यातून १00 टक्के शाळा डिजिटल झाल्या आहेत. या शाळांना १४ व्या वित्त आयोगातून सोलार पॅनल देता येणार आहे.

टॅग्स :WaterपाणीmahavitaranमहावितरणHingoliहिंगोली