शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

साहेब, टँकर नको; पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवा; खैरखेडा ग्रामस्थांचा झेडपीत ठिय्या

By रमेश वाबळे | Updated: April 5, 2024 17:12 IST

पाण्यासाठी २ कि.मी.ची पायपीट; खैरखेडा ग्रामस्थांचा जिल्हा परिषद सीईओंच्या दालनासमोर ठिय्या

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील खैरखेडा येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. परंतु, या योजनेंतर्गत पाणी मिळणे दूरच, वर्षभराचा कालावधी उलटूनही योजनेचे काम सुरू झाले नाही. परिणामी, ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, संतप्त ग्रामस्थांनी ५ एप्रिल रोजी रिकामे हंडे घेऊन थेट जि.प.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे दालन गाठत ठिय्या आंदोलन केले.

खैरखेडा येथे जल जीवन मिशन अंतर्गत ८५ लाख रूपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. या योजनेंतर्गत गावाला पाणीपुरवठा होईल आणि गावची पाणीटंचाई दूर होईल, अशी आशा होती. मात्र, योजना मंजूर होऊन वर्षभराचा कालावधी उलटला तरी काम सुरू झालेले नाही. परिणामी, ग्रामस्थांना प्रखर उन्हात पाण्यासाठी २ कि.मी.ची पायपीट करावी लागत आहे. एकीकडे शासनाची योजना मंजूर झाली असतानाही पाण्यासाठी पायपीट थांबत नसल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी जि. प. कार्यालय गाठून हा प्रश्न थेट मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मांडला. गावचा पाणीप्रश्न तत्काळ सोडवावा, संबंधित कंत्राटदाराविरुद्ध कारवाई करावी व पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली. मागणीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले.

यावेळी अमोल मोरे, दीपक खराटे, प्रवीण मोरे, रामेश्वर जाधव, विठ्ठल गव्हाणे, दत्तराव गव्हाणे, केशव शिंदे, देवीदास मोरे, डिगांबर खराटे, साहेबराव मोरे, गणेश मोरे, माणिक गरड, झनक जाधव, निर्मला फड, सत्यभामा मोरे, प्रमिला इंगळे, लताबाई जाधव, शेवंताबाई कुऱ्हे, भागुबाई मोरे, नंदाबाई जाधव, संगीता गरड यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

साहेब, टँकर नको; पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवा...खैरखेडा ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांच्याकडे पाणीप्रश्न मांडताच त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात टँकरची व्यवस्था करण्यात येईल, असे सांगितले. परंतु, पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अशी मागणी ग्रामस्थांनी करीत रिकामे हंडे घेऊन शेंगुलवार यांच्या दालनासमोरच ठिय्या मांडला. जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत जि.प. कार्यालयातच बसून राहणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दुपारी ४ वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच होते.

टॅग्स :HingoliहिंगोलीWaterपाणी