शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

तोतया अतिरिक्त जिल्हाधिकऱ्याने व्यापाऱ्यालाही १४ लाखांनी फसविले

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Updated: February 18, 2023 13:05 IST

पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या सतर्कतेने तोतया अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याचा भांडाफोड झाला आहे.

हिंगोली : तोतया अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याने वन विभागात नोकरी लावतो म्हणून बेरोजगार युवकांना १ कोटी १६ लाखांचा गंडा घातल्याचे समोर आल्यानंतर आता एका व्यापाऱ्यालाही १४ लाखांनी फसविल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी तिघांविरूद्ध हिंगोली शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा नोंद झाला. 

पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या सतर्कतेने तोतया अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याचा भांडाफोड झाला होता. तसेच वन विभागात नोकरी लावतो म्हणून बेरोजगार युवकांकडून १ कोटी १६ लाख रूपये उकळल्याचे समोर आले होते. यापूर्वी तोतया अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यावर दोन गुन्हे दाखल झाले. त्यानंतर व्यापाऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी रात्री तिसरा गुन्हा दाखल झाला. अतिरिक्त जिल्हाधिकारी असल्याचे खोटे सांगितले. तसेच कोणत्याही प्रकारची रजिस्टर बँक नसताना अन्य दोघांच्या मदतीने फिक्स डिपॉझिट करण्यासाठी १४ लाख २७ हजार ७०० रूपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत व्यापाऱ्याने म्हटले आहे.

याप्रकरणी व्यापारी निलेश बजरंगलाल अग्रवाल (रा. रामकुटी अकोला रोड हिंगोली) यांच्या फिर्यादीवरून अमोल मराठे उर्फ पजई, अनंता कलोरे, अभय भरतीया यांच्याविरूद्ध हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. पोलिस उपनिरीक्षक अशोक कांबळे तपास करीत आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीCrime Newsगुन्हेगारी