हिंगोली : शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी सिग्नल चार ते पाच ठिकाणी सिग्नल बसविण्यात आले, परंतु सद्य:स्थितीत सिग्नल बंद असल्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांवर ताण येत आहे. सिग्नल बसविले, त्यानंतर काही वर्षे सुरू होते, परंतु नंतर सिग्नल का बंद पडले, हा आता संशोधनाचा विषय बनला आहे.
१ मे, १९९९ रोजी झाला आहे. अनेक नवनवीन कार्यरत जिल्ह्यात झाली आहेत. त्यामुळे वाहतूक व्यवस्था वाढू लागली आहे. २००९ मध्ये शहरातील अग्रसेन चौक, इंदिरा चौक, गांधी चौक, नगर पालिका, रेल्वे उड्डाण पूल आदी ठिकाणी सिग्नल बसविण्यात आले, परंतु हे सिग्नल कोणत्या कारणामुळे बंद करण्यात आले आहेत, ते का सुरू करण्यात येते नाहीत, असे एक ना अनेक प्रश्न नागरिकांसमोर आहेत. सिग्नल सुरू केल्यास वाहतूक व्यवस्था सुरळीत होऊन पोलिसांवरील ताण कमी होऊ शकतो. तेव्हा नगरपालिकेने बंद पथदिवे सुरू करणे आता गरजेचे होऊन बसले आहे. काही वाहनचालक तर पोलिसांसमोर विरुद्ध दिशेने वाहन चालविण्याचे धाडस करतात. अशा वेळी मात्र त्या वाहनचालकांना पोलिसांचा दंडुका खावा लागतो.
वाहनचालक काय म्हणतात?
शहरात महावीर चौक ते गांधी चौक हा एकच रस्ता मोठा आहे. बाकी सर्व रस्ते अरुंदच आहेत. विरुद्ध दिशेने आल्यास वाहतूक शाखेकडून दंडाचा मॅसेज लगेच येतो. अशा वेळी खूप विचार करणे भाग पडते.
-गजानन मगर, वाहनचालक
शहरातील सिग्नल सुरू करणे गरजेचे आहे. सिग्नल सुरू केल्यास वाहतुकीचे नियम कळू लागतात. हिंगोली हे मोठे शहर नसले, तरी नियम तर चोहीकडे सारखेच आहेत. वाहतूक नियम माहिती नसल्यामुळे एखादे वेळी चुकून वाहन विरुद्ध दिशेने जाते. यावेळी मात्र पोलिसांची पावती फाडावी लागते. कधी-कधी मोबाइलवर फोटो काढून त्याची पावती व दंड मॅसेजद्वारे येत असतो.
- मंगेश महाजन, वाहनचालक
सिग्नल बंद असल्यामुळे पोलिसांवर वाढला ताण
सिग्नल बंद असल्यामुळे काही वाहनचालक नियमांचे उल्लंघन करून विरुद्ध दिशेने वाहने चालवितात. अशा वेळी वाहन चालकावर दंडाची कार्यवाही करावी लागते. कधी-कधी मोर्चा जर मुख्य रस्त्याने जात असेल, तर मोठी कसरत पोलिसांना करावी लागते. परिणामी, पोलिसांवर ताण येऊन पडतो.