शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

धक्कादायक ! 'या' गावात सलग तीन दिवसांत तीन तरुणांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 13:22 IST

In Hingoli District three youths commit suicide in three days in a row हिंगोली जिल्ह्यातील बोराळा येथे आत्महत्या सत्र सुरूच

ठळक मुद्देतिसऱ्या दिवशीही गळफास लावून तरुणाची आत्महत्यातीनही घटना या वेगवेगळ्या कारणांनी घडल्या.

कौठा ( हिंगोली ) : वसमत तालुक्यातील बोराळा येथील आत्महत्येचे सत्र सुरूच असून, सलग तिसऱ्या दिवशीही एका तरुणाच्या आत्महत्येची घटना घडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. तीनही घटना या वेगवेगळ्या कारणांनी घडल्या. यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.

बोराळा येथे  ९ , १०, व  ११ आॅक्टोबर रोजी सलग तिघांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याने हे गाव चर्चेत आले आहे. ९ आॅक्टोबर रोजी प्रभाकर जाधव यांनी आत्महत्या केली. तर १० आॅक्टोबर रोजी येथील संतोष खराटे या युवकाने आत्महत्या केली. या दोन्ही घटना ताज्या असतानाच सलग तिसऱ्या दिवशी ११ आॅक्टोबर रोजीही रात्रीला येथील राजू बाबुराव गंगतिरे वय २४ वर्षे या युवकाने गळफास घेऊनच आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री ९ :३० च्या पूर्वी रोड लगतच्या शेतातील बोरीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. प्रकाश गंगतिरे यांच्या खबरी वरून वसमत ग्रामीण ठाण्यात या  घटनेची नोंद करण्यात आली. 

अतिपावसांमुळे शेताचे अतोनात नुकसान झाल्याने या विवंचनेतून आत्महत्या केल्याची नोंद करण्यात आलेली आहे. घटनास्थळी वसमत ग्रामीण पोलिसांनी भेट देऊन पंचनामा करण्यात आला. पुढील तपास सपोनि बी.आर. बंदखडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत. सलग तीन दिवसांत तीन जणांनी विशेषत: तिन्ही युवकांनी आपले जीवन संपवल्याने बोराळा गावावर दु:खाचे सावट निर्माण झाले आहे.

शुक्रवार, शनिवार आणि रविवारी आत्महत्या बोराळा येथील प्रभाकर जाधव (३२) यांनी अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने व बँकेचे कर्ज कसे फेडावे या विवंचनेतून राहत्या घरी ९ आॅक्टोबर रोजी सांयकाळी ६ वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली तर दुसऱ्या घटनेत बोराळा येथील संतोष बालाजी खराटे (२२) याने १० आॅक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, धमक्यांच्या त्रासाला कंटाळूनच संतोषने आत्महत्या केली, असा आरोप मयताची आई कांताबाई यांनी केला आहे. या घटनेबाबत मयताची आई कांताबाई खराटे यांनी वसमत ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, बोराळा येथील बाजीराव जाधव,अण्णा जाधव, शिवाजी जाधव, तातेराव जाधव (सर्व रा. बोराळा) यांनी संगनमत करून मयताच्या आई कांताबाई यांनी शेतावर दावा का केला, म्हणून फिर्यादीच्या मुलास धमक्या दिल्या. त्यामुळे नेहमीच्या त्रासाला कंटाळूनच संतोषने आत्महत्या केली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक बळीराम बंदखडके, भुजंग कोकरे, बालाजी मिरासे, भुरके यांनी भेट देऊन पंचनामा केला.

टॅग्स :Suicideआत्महत्याCrime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोलीFarmerशेतकरी