शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांची तीच ती कारणे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:22 IST

हिंगोली: अत्यावश्यक सेवेसाठी एस.टी. बसेस सुरू करता येतात. पण त्यासाठी जिल्हा प्रशासनाचा आदेश असायला हवा. ४० प्रवासी झाले तरी ...

हिंगोली: अत्यावश्यक सेवेसाठी एस.टी. बसेस सुरू करता येतात. पण त्यासाठी जिल्हा प्रशासनाचा आदेश असायला हवा. ४० प्रवासी झाले तरी स्वत: हून एस.टी. महामंडळाला निर्णय घेता येत नाही, अशी माहिती महामंडळाच्या वतीने देण्यात आली.

कोरोना महामारीचे रूग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत असल्यामुळे शासनाने २५ एप्रिल ते १ मे दरम्यान एस. टी महामंडळाच्या तिन्ही आगारांतील बसेस बंद केल्या आहेत. असे असतानाही काही प्रवासी तीचं ती ठेवणीतील कारणे सांगत कर्मचाऱ्यांचा वेळ वाया घालत आहेत. महामंडळाचे चालक, वाहक कधीही स्वत: हून प्रवाशांशी वाद घालत नाहीत. चालक, वाहकांना ड्यूटीवर जाते वेळेस प्रवाशांशी वाद घालू नका, अशा सूचना दिल्या जातात. प्रवाशी आपले मायबाप आहेत. त्यांच्याशी सन्मानाने वागा, त्यांची विचारपूस करा, असेही सांगितले जाते. पण काही प्रवासी असे असतात तेच ते प्रश्न विचारून चालक, वाहकांना बोलायला भाग पाडतात.

संचारबंदीमुळे सध्या बसेस बंद आहेत, हे माहिती असूनही एस.टी. का बंद आहे? केव्हा सुरू करणार? आम्हाला महत्त्वाचे काम आहे, अंत्यसंस्काराला जायचे आहे, आमचे नातेवाईक आजारी आहेत, शासनाने बसेस बंद करायला खरेच सांगितले आहेत का? असे बिनबुडाचे प्रश्न करून आपलेच हसे करून घेतात. नाईलाजाने आम्हाला तशीच उत्तरे देऊन त्यांची बोळवण करावी लागते.

तीचं ती कारणे

संचारबंदीत जिल्हा प्रशासनाचा आदेश असल्याशिवाय बस सोडता येत नाही, हे माहीत असतानाही काही जण तीच ती कारणे पुढे करतात. मग आम्हाला सांगावे लागते २५ प्रवासी असतील तर बस सोडता येतात. पण त्यासाठीही जिल्हा प्रशासनाची परवानगी लागते. आजतरी बसेस बंद आहेत. आता तुम्ही सुखरूप घरी चालते व्हा.

बसस्थानकात शांतता

कोरोनामुळे २५ एप्रिल ते १ मे पर्यत संचारबंदी लागू केलेली आहे. त्यामुळे महामंडळाच्या बसेस जागेवरच आहेत. एरव्ही प्रवाशांची गर्दी रहायची पण आज बसस्थानकात शांतता आहे.

वाद अंगवळणी पडलाय...

एस. टी. महामंडळ प्रवाशांसाठी आहे हे आम्ही आधी सांगत असतो. पण काही प्रवासी असे असतात की घरूनच वाद करायचा असे ठरवून येतात. एस.टी. महामंडळाचे कर्मचारी संयमी आहेत. समोरचा प्रवासी वाद करणार हे माहिती असते. त्यामुळे तो अंगवळणी पडला आहे, असे एस. टी. कर्मचाऱ्याने सांगितले.

कोरोना महामारीमुळे एस.टी. महामंडळाची एकही बस २५ एप्रिलपासून सोडलेली नाही अन्‌ सोडता येत नाही. जिल्हा प्रशासनाने सांगितले तरच एस.टी. बसेस महामंडळातून बाहेर काढता येतात.

संजयकुमार पुंडगे, स्थानक प्रमुख, हिंगोली