शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

प्रवाशांची तीच ती कारणे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:22 IST

हिंगोली: अत्यावश्यक सेवेसाठी एस.टी. बसेस सुरू करता येतात. पण त्यासाठी जिल्हा प्रशासनाचा आदेश असायला हवा. ४० प्रवासी झाले तरी ...

हिंगोली: अत्यावश्यक सेवेसाठी एस.टी. बसेस सुरू करता येतात. पण त्यासाठी जिल्हा प्रशासनाचा आदेश असायला हवा. ४० प्रवासी झाले तरी स्वत: हून एस.टी. महामंडळाला निर्णय घेता येत नाही, अशी माहिती महामंडळाच्या वतीने देण्यात आली.

कोरोना महामारीचे रूग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत असल्यामुळे शासनाने २५ एप्रिल ते १ मे दरम्यान एस. टी महामंडळाच्या तिन्ही आगारांतील बसेस बंद केल्या आहेत. असे असतानाही काही प्रवासी तीचं ती ठेवणीतील कारणे सांगत कर्मचाऱ्यांचा वेळ वाया घालत आहेत. महामंडळाचे चालक, वाहक कधीही स्वत: हून प्रवाशांशी वाद घालत नाहीत. चालक, वाहकांना ड्यूटीवर जाते वेळेस प्रवाशांशी वाद घालू नका, अशा सूचना दिल्या जातात. प्रवाशी आपले मायबाप आहेत. त्यांच्याशी सन्मानाने वागा, त्यांची विचारपूस करा, असेही सांगितले जाते. पण काही प्रवासी असे असतात तेच ते प्रश्न विचारून चालक, वाहकांना बोलायला भाग पाडतात.

संचारबंदीमुळे सध्या बसेस बंद आहेत, हे माहिती असूनही एस.टी. का बंद आहे? केव्हा सुरू करणार? आम्हाला महत्त्वाचे काम आहे, अंत्यसंस्काराला जायचे आहे, आमचे नातेवाईक आजारी आहेत, शासनाने बसेस बंद करायला खरेच सांगितले आहेत का? असे बिनबुडाचे प्रश्न करून आपलेच हसे करून घेतात. नाईलाजाने आम्हाला तशीच उत्तरे देऊन त्यांची बोळवण करावी लागते.

तीचं ती कारणे

संचारबंदीत जिल्हा प्रशासनाचा आदेश असल्याशिवाय बस सोडता येत नाही, हे माहीत असतानाही काही जण तीच ती कारणे पुढे करतात. मग आम्हाला सांगावे लागते २५ प्रवासी असतील तर बस सोडता येतात. पण त्यासाठीही जिल्हा प्रशासनाची परवानगी लागते. आजतरी बसेस बंद आहेत. आता तुम्ही सुखरूप घरी चालते व्हा.

बसस्थानकात शांतता

कोरोनामुळे २५ एप्रिल ते १ मे पर्यत संचारबंदी लागू केलेली आहे. त्यामुळे महामंडळाच्या बसेस जागेवरच आहेत. एरव्ही प्रवाशांची गर्दी रहायची पण आज बसस्थानकात शांतता आहे.

वाद अंगवळणी पडलाय...

एस. टी. महामंडळ प्रवाशांसाठी आहे हे आम्ही आधी सांगत असतो. पण काही प्रवासी असे असतात की घरूनच वाद करायचा असे ठरवून येतात. एस.टी. महामंडळाचे कर्मचारी संयमी आहेत. समोरचा प्रवासी वाद करणार हे माहिती असते. त्यामुळे तो अंगवळणी पडला आहे, असे एस. टी. कर्मचाऱ्याने सांगितले.

कोरोना महामारीमुळे एस.टी. महामंडळाची एकही बस २५ एप्रिलपासून सोडलेली नाही अन्‌ सोडता येत नाही. जिल्हा प्रशासनाने सांगितले तरच एस.टी. बसेस महामंडळातून बाहेर काढता येतात.

संजयकुमार पुंडगे, स्थानक प्रमुख, हिंगोली