शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

प्रवाशांची तीच ती कारणे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:22 IST

हिंगोली: अत्यावश्यक सेवेसाठी एस.टी. बसेस सुरू करता येतात. पण त्यासाठी जिल्हा प्रशासनाचा आदेश असायला हवा. ४० प्रवासी झाले तरी ...

हिंगोली: अत्यावश्यक सेवेसाठी एस.टी. बसेस सुरू करता येतात. पण त्यासाठी जिल्हा प्रशासनाचा आदेश असायला हवा. ४० प्रवासी झाले तरी स्वत: हून एस.टी. महामंडळाला निर्णय घेता येत नाही, अशी माहिती महामंडळाच्या वतीने देण्यात आली.

कोरोना महामारीचे रूग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत असल्यामुळे शासनाने २५ एप्रिल ते १ मे दरम्यान एस. टी महामंडळाच्या तिन्ही आगारांतील बसेस बंद केल्या आहेत. असे असतानाही काही प्रवासी तीचं ती ठेवणीतील कारणे सांगत कर्मचाऱ्यांचा वेळ वाया घालत आहेत. महामंडळाचे चालक, वाहक कधीही स्वत: हून प्रवाशांशी वाद घालत नाहीत. चालक, वाहकांना ड्यूटीवर जाते वेळेस प्रवाशांशी वाद घालू नका, अशा सूचना दिल्या जातात. प्रवाशी आपले मायबाप आहेत. त्यांच्याशी सन्मानाने वागा, त्यांची विचारपूस करा, असेही सांगितले जाते. पण काही प्रवासी असे असतात तेच ते प्रश्न विचारून चालक, वाहकांना बोलायला भाग पाडतात.

संचारबंदीमुळे सध्या बसेस बंद आहेत, हे माहिती असूनही एस.टी. का बंद आहे? केव्हा सुरू करणार? आम्हाला महत्त्वाचे काम आहे, अंत्यसंस्काराला जायचे आहे, आमचे नातेवाईक आजारी आहेत, शासनाने बसेस बंद करायला खरेच सांगितले आहेत का? असे बिनबुडाचे प्रश्न करून आपलेच हसे करून घेतात. नाईलाजाने आम्हाला तशीच उत्तरे देऊन त्यांची बोळवण करावी लागते.

तीचं ती कारणे

संचारबंदीत जिल्हा प्रशासनाचा आदेश असल्याशिवाय बस सोडता येत नाही, हे माहीत असतानाही काही जण तीच ती कारणे पुढे करतात. मग आम्हाला सांगावे लागते २५ प्रवासी असतील तर बस सोडता येतात. पण त्यासाठीही जिल्हा प्रशासनाची परवानगी लागते. आजतरी बसेस बंद आहेत. आता तुम्ही सुखरूप घरी चालते व्हा.

बसस्थानकात शांतता

कोरोनामुळे २५ एप्रिल ते १ मे पर्यत संचारबंदी लागू केलेली आहे. त्यामुळे महामंडळाच्या बसेस जागेवरच आहेत. एरव्ही प्रवाशांची गर्दी रहायची पण आज बसस्थानकात शांतता आहे.

वाद अंगवळणी पडलाय...

एस. टी. महामंडळ प्रवाशांसाठी आहे हे आम्ही आधी सांगत असतो. पण काही प्रवासी असे असतात की घरूनच वाद करायचा असे ठरवून येतात. एस.टी. महामंडळाचे कर्मचारी संयमी आहेत. समोरचा प्रवासी वाद करणार हे माहिती असते. त्यामुळे तो अंगवळणी पडला आहे, असे एस. टी. कर्मचाऱ्याने सांगितले.

कोरोना महामारीमुळे एस.टी. महामंडळाची एकही बस २५ एप्रिलपासून सोडलेली नाही अन्‌ सोडता येत नाही. जिल्हा प्रशासनाने सांगितले तरच एस.टी. बसेस महामंडळातून बाहेर काढता येतात.

संजयकुमार पुंडगे, स्थानक प्रमुख, हिंगोली