शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जनांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर मधाच्या पोळ्यांची विक्री बनली तरुणांंचा रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:31 IST

रमेश कदम आखाडा बाळापूर : नदी, नाल्याच्या काठाकाठाने निसर्गाचा आस्वाद घेत थकेपर्यंत भटकंती करत दिवस घालणाऱ्या तरुणाला आपल्या आवडीपायी ...

रमेश कदम

आखाडा बाळापूर : नदी, नाल्याच्या काठाकाठाने निसर्गाचा आस्वाद घेत थकेपर्यंत भटकंती करत दिवस घालणाऱ्या तरुणाला आपल्या आवडीपायी रोजगाराची नवी संधी उपलब्ध झाली आहे. नदीकाठच्या झाडांवरील मधमाश्यांच्या पोळ्यांची विक्री करून रोजगाराची नवी पायवाट त्याने शोधली आहे. भटकंतीची आवड आणि रोजंदारीची किंमत या दोन्ही गोष्टी त्याला मिळत आहेत. नांदेड-हिंगोली रोडवरील त्याच्या हातातील मधमाश्यांच्या 'पोळ्यांचे झुंबर' प्रवास करणाऱ्या नागरिकांना आकर्षित करत आहे.

नांदेड-हिंगोली या राष्ट्रीय महामार्गावर आखाडा बाळापूर ते कुर्तडी पाटी यादरम्यान कुठेतरी एक तरुण मधमाश्यांच्या पोळ्यांचे झुंबर घेऊन रस्त्यावर उभा ठाकलेला दिसतो. सद्य:स्थितीत शुद्ध, गावरान वस्तू मिळणे दुर्मीळ झाले आहे. त्यात मधाचंं पोळं आणि मधाचा रस शुद्ध स्वरूपात मिळणे, हे तर अवघडंच. कारण, व्यापारपेठेत मिळणाऱ्या मधाच्या बाटल्यांमध्ये शुद्ध स्वरूपात मध मिळत नाही. या महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या तरुणाच्या मधमाश्यांच्या पोळ्यांचे झुंबर आकर्षित करते. प्रवासी थांबतात आणि त्यांच्याकडून मधाच्या पोळ्यांची खरेदी करतात. कुणी मधाचे पोळे जशास तसे खरेदी करून घेऊन जातो, तर काही जण त्यातला मध काढून घेऊन जातात. या रस्त्यावरील हा मध विकणारा तरुण प्रवाशांसाठी सवयीचा झालाय आणि आकर्षणाचा केंद्रही झाला आहे. कळमनुरी तालुक्यातील कुंभारवाडी येथील नरेंद्र रामजी बुरकुले हा तरुण या रस्त्यावर मधमाश्यांच्या पोळीविक्रीचा व्यवसाय करतो. प्रवाशांना शुद्ध स्वरूपातला गोड मध १०० ते ३०० रुपयांपर्यंत उपलब्ध करून देतो. मधाचे पोळं जमा करायचे आणि रस्त्यावर उभे ठाकले की, काही क्षणांतच त्याची विक्री होत असल्याने त्याच्या रोजगाराची नवी पायवाट त्याला सापडली आहे. आता तो दररोज कयाधू नदीच्या काठाने फिरतो. परिसरातील नाल्यांच्या काठावरील विविध झाडांवरील मधमाश्यांचे पोळे गोळा करतो आणि रस्त्यावर उभे राहून त्याची विक्री करतो.

मधमाश्यांचे पोळे काढण्यासाठी माशा मरू नयेत व निसर्गचक्र सुरळीत व्हावे, याचीही काळजी नरेंद्र घेत असतो. मधमाश्यांचे पोळे काढण्यासाठी धुराचा वापर केला जातो. त्यात नारळाच्या शेंड्या, वाळलेली पाने, कापूस, कडुनिंब असे पर्यावरणपूरक साहित्य जाळून मधमाश्यांना पोळ्यापासून दूर केले जाते. या धुराचा मधमाश्यांना त्रास होत नाही. पोळे काढतानाही अगदी हळुवारपणे काढले जाते. या माश्या जिवंत राहिल्याने इतरत्र जाऊन नवीन पोळे तयार करतात. एकंदरीत, निसर्गचक्र सुरळीत ठेवून आपला रोजगार शोधणाऱ्या या तरुणाला निसर्गातूनच सापडलेला हा "स्टार्टअप" इतरांनाही प्रेरणा देणारा आहे.