शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

तीन महिन्यांत मालवाहतुकीतून साडेचार लाखांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:22 IST

हिंगोली : कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आल्याने एसटी महामंडळाला मोठे नुकसान सहन करावे लागले. मात्र मालवाहतुकीतून तीन ...

हिंगोली : कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आल्याने एसटी महामंडळाला मोठे नुकसान सहन करावे लागले. मात्र मालवाहतुकीतून तीन महिन्यांत ४ लाख २२ हजार ३९१ रुपयांचे उत्पन्न हाती आले आहे. सर्व बाजारपेठ ठप्प असताना, इतर आगाराच्या तुलनेत हिंगोली आगाराने चांगली कामगिरी केली आहे.

कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. याचा फटका ऑटोरिक्षा, खासगी बससेवा यासह एसटी महामंडळालाही बसला आहे. प्रवासी वाहतूकच ठप्प असल्याने महामंडळाच्या उत्पन्नाचे मार्ग बंद झाले. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारासह दैनंदिन खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न निर्माण होत आहेे. गतवर्षीपासून एसटी महामंडळाने मालवाहतूकही करण्याचा निर्णय घेतला. सध्या काही दिवसांपासून प्रवासी वाहतूक ठप्प असताना हिंगोली आगाराने पुन्हा मालवाहतूक करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मागील तीन महिन्यांत हिंगोली आगाराला ८७ भाडे मिळाले. यातून ४ लाख २२ हजार ३९१ रुपयांचे उत्पन्न मिळविले. यात फेब्रुवारी महिन्यात ४१ भाडे आले होते. यातून १ लाख ९५ हजार ८७० रुपयांचे उत्पन्न मिळाले. यासाठी २५०० किलोमीटरचे अंतर एसटीने कापले. मार्च महिन्यातही २० भाड्यातून १ लाख ८४९ रुपयांचे उत्पन्न हाती आले. यासाठी २ हजार १७६ किलोमीटर एसटी धावली. मे महिन्यात आतापर्यंत मिळालेल्या २६ भाड्यातून १ लाख २५ हजार ६७२ रुपयांचे उत्पन्न मिळाले. यासाठी २ हजार ६७८ किलोमीटर मालवाहतूक एसटी धावली. एकीकडे प्रवासी वाहतूक ठप्प असताना हिंगोली आगाराने मात्र मालवाहतुकीतून उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न केला. इतर आगारांपेक्षा हिंगोली आगाराने योग्य नियोजन करीत मालवाहतुकीतून चांगले उत्पन्न मिळविले आहे.

हिंगोली आगाराकडे मालवाहतुकीसाठी ८ वाहने

हिंगोली आगाराकडे मालवाहतूक करण्यासाठी ८ वाहने तयार केली आहेत. एका वाहनातून एकावेळी १० टन मालाची वाहतूक करता येते. माल सुरक्षित राहत असल्याने व्यापाऱ्याचा कलही एसटीच्या मालवाहतूक वाहन वापरण्याकडे वाढला आहे. १०० किलाेमीटर अंतरासाठी ४६ रुपये, १०० ते २५० किलोमीटर अंतरासाठी ४४ रुपये, तर २५० च्या पुढील अंतरासाठी ४३ रुपये प्रती किलोमीटरप्रमाणे दर आकारला जात असल्याची माहिती हिंगोली आगाराचे विजय खंदारे यांनी दिली.

मालाची आयात जास्त, निर्यात कमी

हिंगोली जिल्ह्यात मोठे उद्योग, व्यवसाय नसल्याने मालाची निर्यात अत्यंत कमी प्रमाणात होते. इतर मोठ्या जिल्ह्यांतूनच विविध वस्तू आयात कराव्या लागतात. जिल्ह्यातून केवळ शेतमाल तेवढा इतर जिल्ह्यात पाठविला जातो. त्यामुळे एसटी आगाराला भाडे मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. इतर जिल्ह्यांतील आगाराचे ८ ते १० वाहने माल घेऊन हिंगोली जिल्ह्यात येतात.