शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

‘माझे गाव, सुंदर गाव’ उपक्रमाला जिल्ह्यात प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:30 IST

हिंगोली : ‘माझे गाव, सुंदर गाव’ हा उपक्रम जिल्ह्यातील ५६३ ग्रामपंचायतींमध्ये राबविला जात असून, अधिकाऱ्यांसह सरपंच, उपसरपंचांसह गावकरीही या ...

हिंगोली : ‘माझे गाव, सुंदर गाव’ हा उपक्रम जिल्ह्यातील ५६३ ग्रामपंचायतींमध्ये राबविला जात असून, अधिकाऱ्यांसह सरपंच, उपसरपंचांसह गावकरीही या उपक्रमात सहभाग घेत असल्याची माहिती सहायक गटविकास अधिकारी जी.पी. बोथीकर यांनी दिली.

‘माझे गाव, सुंदर गाव’ हा उपक्रम २२ जानेवारी ते २० मार्चदरम्यान राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समितीस्तरावरून हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून, गावकरीही यात हिरीरीने सहभाग घेऊन गाव कसे सुंदर करता येईल, यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत. या उपक्रमातून तालुकापातळीवर प्रथम, द्वितीय व तृतीय याप्रमाणे ग्रामपंचायतींची निवड कशी करता येईल, यासाठीचा अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयास कळवावा, असेही उपायुक्त सुरेश बेथमुथा यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.

‘माझे गाव, सुंदर गाव’ या उपक्रमांतर्गत ग्रामीण भागाची संपूर्ण स्वच्छता करणे, सर्व उकिरडे गावाबाहेर काढणे, जनावरांचे गोठे स्वच्छ व आकर्षक करणे, रस्त्यावर जनावरे न बांधणे, गावातील सर्व कचरा घंटागाडीने जमा करून त्यावर प्रक्रिया करणे, कंपोस्ट खत तयार करणे, सर्व घरांमध्ये ओला, सुका कचरा विलगीकरण करून त्यावर प्रक्रिया करणे व प्रत्येक घरामध्ये दोन वेगळ्या ओल्या व सुक्या कचऱ्यासाठी स्वतंत्र पेट्या ठेवणे, गावातील सर्व शौचालये वापरात आणून, रस्त्यावर व उघड्यावर शौचास जाणे बंद करावे, गॅस पाइपच्या झडपेवर जाळी बसविणे, सांडपाणी गावाच्या बाहेर काढणे, शोष खड्ड्यांचा वापर शंभर टक्के करणे, गावातील पाणी उघड्यावर येऊ न देणे, या उपक्रमांतर्गत सर्वांना सूचना दिल्या असून, सर्व जण यासाठी पुढाकार घेत आहेत.

बॉक्स

‘माझे गाव, सुंदर गाव’ या उपक्रमाचे मूल्यांकन २० मार्चनंतर केले जाणार आहे. २२ जानेवारीपासून हा उपक्रम सुरू झाला आहे. आजमितीस मुख्य कार्यकारी अधिकारी आर.बी. शर्मा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिलिंद पोहरे व पाचही तालुक्यांतील सर्व गटविकास अधिकारी, सर्व सहायक गटविकास, सरपंच, सर्व अंगणवाडीताई, सर्व आशा वर्कर, सर्व मदतनीस, उपसरपंच, ग्रामसेवक, गावकरी हे स्वच्छतेसाठी प्रयत्न करीत आहेत.

फोटो नं. १