शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

प्रादेशिक योजनांच्या पुनरुज्जीवनाचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 00:17 IST

शासनाने प्रादेशिक योजनेतील गावांना पाणीपुरवठा होत नसल्याने विद्युत व तांत्रिक प्रस्ताव मागविले असून यापूर्वीच्या रखडलेल्या वीजदेयकांची अदायगी करण्याचा विचार करीत आहे. हिंगोली जि.प.ने सिद्धेश्वर, पुरजळ व मोरवाडी योजनेचे प्रस्ताव यात पाठविल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी.तुम्मोड यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शासनाने प्रादेशिक योजनेतील गावांना पाणीपुरवठा होत नसल्याने विद्युत व तांत्रिक प्रस्ताव मागविले असून यापूर्वीच्या रखडलेल्या वीजदेयकांची अदायगी करण्याचा विचार करीत आहे. हिंगोली जि.प.ने सिद्धेश्वर, पुरजळ व मोरवाडी योजनेचे प्रस्ताव यात पाठविल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी.तुम्मोड यांनी दिली.जिल्हा परिषदेत आज पाणीपुरवठा योजनांचा आढावा तुम्मोड यांनी घेतला. यावेळी त्यांनी प्रादेशिक योजनांतील गावांना पाणीपुरवठा होत नसल्याने या गावांतून वारंवार तक्रारी येत आहेत. त्यामुळे या योजनेतील गावांचा सर्व्हे करून विद्युत व तांत्रिक प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव दिला असला तरीही जेथे या योजनेचे पाणीच आतापर्यंत कधी गेले नाही, अशा गावांचा वेगळा प्रस्ताव पाठविण्यासाठी वस्तुनिष्ठ सर्व्हे करण्यास सांगितले आहे. अशा गावांसाठी शासन स्तरावरून वेगळे उपाय करण्यासाठी तरी प्रयत्न करता येतील, असे त्यांनी सांगितले.राष्ट्रीय पेयजल योजनेत एकूण ८७ गावांचा पाणीपुरवठा योजनांचा आराखडा मंजूर झाला आहे. यापैकी १३ गावांचे प्रस्ताव शासनाकडे पाठविले होते. मात्र शासनाने पुढील १५ वर्षांच्या लोकसंख्येचा विचार करून योजना तयार करण्यास सांगून ते परत पाठविले. त्यामुळे ते नव्याने तयार करण्यात येत आहेत. या कामाची व्याप्ती पाहता खाजगी यंत्रणेमार्फत सर्व्हे करून या योजनेचे प्रस्ताव तयार करण्यास आज सीईओ तुम्मोड यांनी सांगितले. या कामाला गती देऊन लवकर प्रस्ताव तयार होतील, याची काळजी घेण्यासही बजावले.टंचाईचा जानेवारी ते मार्च महिन्याचा आराखडा आधीच सादर केलेला आहे. मात्र सध्याची परिस्थिती लक्षात घेता ज्या तालुक्यांचा पुरवणी आराखडा देण्याची गरज आहे, तो तातडीने तयार करण्यास सांगितले. तर मंजूर आराखड्याची अंमलबजावणी करावी, असेही सांगितले.भौतिकदृष्ट्या पूर्ण मात्र आर्थिकदृष्ट्या अपूर्ण असलेल्या १0७ पैकी १0 योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. तर आणखी ३0 प्रकरणे जि.प.त दाखल झाली आहेत. उर्वरित ६७ योजनांची कामे प्राधान्याने पूर्ण करून संबंधितांची देयके अदा करण्यास सांगितले. अपूर्ण असलेल्या २५ योजनांमुळे ही गावे टंचाईतही येत आहेत अन् या योजनांवर झालेला खर्चही वाया जात आहे. त्यामुळे या योजनांवर आधी लक्ष केंद्रित करून त्या पूर्ण कशा होतील, याचे अभियंतानिहाय नियोजन करण्यास सांगितले. तर यापैकी ३ योजना पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले.अधिग्रहणाचे प्रस्ताव आता ज्या दिवशी पाणीपुरवठा सुरू झाला त्या दिवसापासूनच मंजूर होणार असल्याने तसे शेतकऱ्यांना सांगून अधिग्रहणास विलंब लागणार नाही, याची काळजी घेण्यासही तुम्मोड सांगितले.

टॅग्स :Waterपाणीgovernment schemeसरकारी योजना