शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

१६ जिल्ह्यांत वाढले बालविवाहांचे प्रमाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 00:54 IST

राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने भारतातील बालविवाह घटनांसदंर्भात नुकताच अहवाल प्रसिद्ध केला आहे. बालविवाहाच्या सर्वांत जास्त घटना घडलेल्या देशातील ७० जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील तब्बल १६ जिल्हे असल्याची नामुष्की ओढवली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने भारतातील बालविवाह घटनांसदंर्भात नुकताच अहवाल प्रसिद्ध केला आहे. बालविवाहाच्या सर्वांत जास्त घटना घडलेल्या देशातील ७० जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील तब्बल १६ जिल्हे असल्याची नामुष्की ओढवली आहे.यासंदर्भात शासनाने राज्यातील बाल विवाहास प्रतिबंध करण्याकरिता ग्राम पातळीवर ग्रामसेवक यांना आणि शहर पातळीवर बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) यांना बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. परंतु एकंदरीत राज्याच्या परिस्थितीचा विचार करता परिस्थिती गंभीर आहे.बालविवाह प्रतिबंधासाठी उपाययोजनेसाठी हिंगोलीत जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. तसेच २९ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित या बैठकीस उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, तहसीलदार गजानन शिंदे, बाल विकास प्रकल्प अधिकारी डॉ.मोहन आ.कौसडीकर, महिला सहायक कक्ष उज्ज्वला वगेवार, सुनीता शिंदे, जि.प.शिक्षण विभागाचे मोहन जोशी, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयातील मुख्यसेविका आर. पी.पडोळे, बाल कल्याण समिती सदस्या जया करडेकर, प्रा.विक्रम जावळे, अ‍ॅड. संभाजी माने, प्रा.यू.एच.बलखंडे, मुलींचे निरीक्षणगृह अधीक्षक चंपती घ्यार व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व्ही. जी.शिंदे आदी उपस्थित होते.सदर बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी जयवंशी म्हणाले, सर्व धर्मांच्या विवाहस्थळांच्या प्रमुखांनी विवाहास जागा उपलब्ध करुन देण्यापूर्वी मुला-मुलींच्या वयाचे दाखले पाहणे हे बालविवाह प्रतिबंधासाठी आवश्यक आहेत. बालविवाह रोखण्याकरिता मदत व्हावी यासाठी सर्व विभागप्रमुखांना बालविवाह प्रतिबंधाबाबतचा शासन निर्णय पुरविण्यात यावा. तसेच सर्व कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या अधिनस्त कार्यालयीन बैठकीत शासन निर्णय परिपत्रकाचे वाचन करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले.बालविवाह प्रतिबंधसाठी पोलीस विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून त्याकरिता पोलीस विभागातंर्गत यासंदर्भात बैठका घ्याव्यात. तसेच ग्रामपातळीवर प्रत्येक ग्रामसभेच्या बैठकीमध्ये शासन परिपत्रक वाचन व शिक्षेचे स्वरुप याबाबत चर्चा करावी. गावातील महत्त्वाचा घटक म्हणून ग्रामसेवक व पोलीस पाटील यांनी गावात बालविवाह होणार नाही याकरिता विशेष लक्ष द्यावे. तसेच बालविवाह प्रतिबंधाकरिता सार्वजनिक उपक्रमात याविषयी प्रचार, प्रसिद्धी व जाणीवजागृतीचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. बालविवाह प्रतिबंधाच्या दृष्टिकोनातून समितीतील सदस्यांची भूमिका महत्त्वाची आहे. तसेच जनतेनेदेखील बालविवाह प्रतिबंधाबाबत जागृत असणे महत्त्वाचे असल्याचे जयवंशी म्हणाले.

टॅग्स :marriageलग्नSocialसामाजिक