शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

१६ जिल्ह्यांत वाढले बालविवाहांचे प्रमाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 00:54 IST

राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने भारतातील बालविवाह घटनांसदंर्भात नुकताच अहवाल प्रसिद्ध केला आहे. बालविवाहाच्या सर्वांत जास्त घटना घडलेल्या देशातील ७० जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील तब्बल १६ जिल्हे असल्याची नामुष्की ओढवली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने भारतातील बालविवाह घटनांसदंर्भात नुकताच अहवाल प्रसिद्ध केला आहे. बालविवाहाच्या सर्वांत जास्त घटना घडलेल्या देशातील ७० जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील तब्बल १६ जिल्हे असल्याची नामुष्की ओढवली आहे.यासंदर्भात शासनाने राज्यातील बाल विवाहास प्रतिबंध करण्याकरिता ग्राम पातळीवर ग्रामसेवक यांना आणि शहर पातळीवर बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) यांना बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. परंतु एकंदरीत राज्याच्या परिस्थितीचा विचार करता परिस्थिती गंभीर आहे.बालविवाह प्रतिबंधासाठी उपाययोजनेसाठी हिंगोलीत जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. तसेच २९ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित या बैठकीस उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, तहसीलदार गजानन शिंदे, बाल विकास प्रकल्प अधिकारी डॉ.मोहन आ.कौसडीकर, महिला सहायक कक्ष उज्ज्वला वगेवार, सुनीता शिंदे, जि.प.शिक्षण विभागाचे मोहन जोशी, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयातील मुख्यसेविका आर. पी.पडोळे, बाल कल्याण समिती सदस्या जया करडेकर, प्रा.विक्रम जावळे, अ‍ॅड. संभाजी माने, प्रा.यू.एच.बलखंडे, मुलींचे निरीक्षणगृह अधीक्षक चंपती घ्यार व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व्ही. जी.शिंदे आदी उपस्थित होते.सदर बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी जयवंशी म्हणाले, सर्व धर्मांच्या विवाहस्थळांच्या प्रमुखांनी विवाहास जागा उपलब्ध करुन देण्यापूर्वी मुला-मुलींच्या वयाचे दाखले पाहणे हे बालविवाह प्रतिबंधासाठी आवश्यक आहेत. बालविवाह रोखण्याकरिता मदत व्हावी यासाठी सर्व विभागप्रमुखांना बालविवाह प्रतिबंधाबाबतचा शासन निर्णय पुरविण्यात यावा. तसेच सर्व कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या अधिनस्त कार्यालयीन बैठकीत शासन निर्णय परिपत्रकाचे वाचन करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले.बालविवाह प्रतिबंधसाठी पोलीस विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून त्याकरिता पोलीस विभागातंर्गत यासंदर्भात बैठका घ्याव्यात. तसेच ग्रामपातळीवर प्रत्येक ग्रामसभेच्या बैठकीमध्ये शासन परिपत्रक वाचन व शिक्षेचे स्वरुप याबाबत चर्चा करावी. गावातील महत्त्वाचा घटक म्हणून ग्रामसेवक व पोलीस पाटील यांनी गावात बालविवाह होणार नाही याकरिता विशेष लक्ष द्यावे. तसेच बालविवाह प्रतिबंधाकरिता सार्वजनिक उपक्रमात याविषयी प्रचार, प्रसिद्धी व जाणीवजागृतीचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. बालविवाह प्रतिबंधाच्या दृष्टिकोनातून समितीतील सदस्यांची भूमिका महत्त्वाची आहे. तसेच जनतेनेदेखील बालविवाह प्रतिबंधाबाबत जागृत असणे महत्त्वाचे असल्याचे जयवंशी म्हणाले.

टॅग्स :marriageलग्नSocialसामाजिक