शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

पीककर्जासाठी रांगा; टक्का वाढेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 12:22 AM

पहिल्याच पावसानंतर शेतकऱ्यांनी पीककर्जासाठी विविध बँकांमध्ये कर्जासाठी रांगा लावल्याचे चित्र आहे. मात्र दुसरीकडे पीककर्ज मंजूर करून शेतकºयांच्या खात्यावर टाकल्याची प्रकरणे अवघी २ टक्के आहेत. तीन हजार शेतकºयांना २१ कोटी रुपयांचेच पीककर्ज वाटप झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : पहिल्याच पावसानंतर शेतकऱ्यांनी पीककर्जासाठी विविध बँकांमध्ये कर्जासाठी रांगा लावल्याचे चित्र आहे. मात्र दुसरीकडे पीककर्ज मंजूर करून शेतकºयांच्या खात्यावर टाकल्याची प्रकरणे अवघी २ टक्के आहेत. तीन हजार शेतकºयांना २१ कोटी रुपयांचेच पीककर्ज वाटप झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.हिंगोली जिल्ह्यात कर्जमाफीचा अजूनही काही थांगपत्ता लागत नाही. शेतकºयांच्या खात्यावर प्रत्यक्षात २१६ कोटी रुपये जमा झाल्याची शासन आकडेवारी कितपत खरी, हे कळायला मार्ग नाही. अनेक शेतकºयांची नावे यादीत नावेच नाहीत. पहिल्या यादीत होती, आता नाहीत, अशा एका ना अनेक तक्रारी आहेत.त्यांचे निवारण करणारी कोणतीच यंत्रणा उपलब्ध नाही. गोपनियतेच्या नावाखाली अग्रणी बँक तर जणू देशाचा सुरक्षा विभाग सांभाळत असल्यागत वागत आहे. त्यामुळे कर्जमाफी व पीककर्ज या दोन्हीही विषयांवरून यंदा शेतकरी भविष्यात अधिक आक्रमक होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.पीककर्जासाठी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दर आठवड्याला बैठक घेत कर्जवाटप न करणाºया बँकांना धडा शिकविण्याचा इशारा दिला. मात्र त्यांच्यासमोर माना डोलवायचे काम करणारे अधिकारी प्रत्यक्षात पीककर्जाच्या संचिकांना हातही लावत नसल्याचे चित्र होते. आता पावसाचेच आगमन झाल्याने शेतकºयांना बँकेतून हाकलता येत नाही म्हणून अर्ज भरून घेतले जात आहेत. यापूर्वी तर अर्जच भरून घेतला जात नव्हता.सध्याच हजार कोटींपैकी अवघ्या २१ कोटी रुपयांचे उद्दिष्ट बँकांनी गाठले आहे. यावरून बँकांची मानसिकताच स्पष्ट होते. त्यातच अग्रणी बँकेचे कुचकामी धोरण या बँकांनाच पोषक ठरत असून बळीराजाला मात्र कोणी वालीच उरला नाही.

टॅग्स :FarmerशेतकरीBanking Sectorबँकिंग क्षेत्र