शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

हिंगोलीत वारंगा फाटा परिसरात जोरदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 15:22 IST

या पावसाने दुष्काळात शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा दिला आहे. 

वारंगा फाटा ( हिंगोली ) : कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा, आखाडा बाळापूर परिसरात आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास सुमारे अर्धा तास पाऊस धो-धो बरसला. दुष्काळात पावसाने काही अंशी दिलासा दिला आहे. 

वारंगा फाटा परिसरातील वारंगा, कुर्तडी, कुंभारवाडी, चुंचा, तोंडापूर व परिसरात मुसळधार पाऊस पडला. आॅगस्ट महिन्यांपासून पावसाने दडी मारली होती. परिसरातील विहिरी, ओढे-नाले, तलाव आटले होते. जलस्तरही कमालीचा खालावला होता. परिणामी, कोरडवाहू तसेच बागायती पिके माना टाकू लागले होते.  

सिंचनासाठी पाणीच उपलब्ध नसल्याने हरभरा पेरणी करावी की नाही, या विवंचनेत शेतकरी होते. तर ऊस, हळद, केळी या पिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सदरील पिके सोडून दिली होती. जवळपास अडीच ते तीन महिन्यानंतर १९ नोव्हेंबर रोजी दुपारी तब्बल अर्धा तास मुसळधार पाऊस झाला. परिणामी, सर्वत्र पाणीच पाणी झाले असून हरभरा पिकाला तूर्तास पाणी देण्याची गरज नसून हळद, केळी या बागायती पिकांसह गहू, तूर या पिकांना देखील या पाण्यामुळे दिलासा मिळाला आहे. 

तर दुसरीकडे नुकतीच पेरणी केलेल्या गहू, हरभरा यांचे अंकुर जमिनीतून वर निघण्याच्या मार्गावर असल्याने कोमे दबून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. तर तुरीचा फुलोरा गळून जाण्याची भीती शेतकरी वगार्तून व्यक्त होत आहे. दरम्यान या पावसामुळे कही खुशी कही गम अशी परिस्थिती असली तरी पाऊस पडल्याने बळीराजा सुखावला आहे.

टॅग्स :RainपाऊसHingoliहिंगोलीNatureनिसर्गFarmerशेतकरी