शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला
2
Corona Virus : टेन्शन वाढलं! देशात कोरोनाचे नवे व्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 ची एन्ट्री; कुठे आढळले रुग्ण?
3
देशात पहिली...! ओलाची रोडस्टर मोटरसायकल पुण्यात आली; कुठे पहायला मिळणार?
4
भयंकर! २५ हजारांच्या कर्जासाठी मुलगा ठेवला गहाण, मिळाला मृतदेह; काळजात चर्र करणारी घटना
5
VIDEO: थोडक्यात वाचली जिनिलिया, कारमध्ये बसत असताना ड्रायव्हरकडून नकळत झाली चूक अन्...
6
कोर्टातून पळून गेलेला आरोपी मनसेच्या कार्यालयात पोहोचला! नेत्याला दिली धमकी, मुंबईत घडली धक्कादायक घटना 
7
साप्ताहिक राशीभविष्य: राहु-केतु-शुक्र गोचर, शनि जयंती; ६ राशींना लाभ, ६ राशींना तापदायक काळ!
8
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
9
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
10
खासदार असलेली ही अभिनेत्री घेणार घटस्फोट? Ex गर्लफ्रेंडसोबत पतीच्या वाढत्या संबंधामुळे नात्यात दुरावा
11
ऐकावं ते नवलच! 'या' देशात शरीराच्या वजनाइतकं मिळत कर्ज, लठ्ठपणा ठरतं श्रीमंतीच लक्षण
12
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत
13
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
14
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
15
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
16
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
18
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
19
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
20
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा

दहा दिवसांच्या खंडानंतर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:33 IST

हिंगोली : दहा दिवसांच्या खंडानंतर जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह सर्वदूर पाऊस पडला आहे. या दमदार पावसामुळे ...

हिंगोली : दहा दिवसांच्या खंडानंतर जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह सर्वदूर पाऊस पडला आहे. या दमदार पावसामुळे शेतकरीवर्ग सुखावला आहे.

गत दहा दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे महागामोलाची उगविलेली पिके हाताला लागतील की नाही, अशी भीती वाटत होती. ४ सप्टेंबर रोजी म्हणजे पोळा सणाच्या दोन दिवस अगोदर पावसाने चांगली साथ दिल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. या दमदार पावसामुळे हळद, सोयाबीन, कापूस, तूर या खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. खरीप हंगामात लाखो रुपयांची विविध कंपन्यांची बियाणे, खते वाया जातात की काय?, या चिंतेत शेतकरीवर्ग होता. याअगोदर जिल्ह्यात पाऊस झाला, पण तो म्हणावा तसा नव्हता, अशी प्रतिक्रियाही शेतकऱ्यांनी दिली आहे.

जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मुगाची काढणी आटोक्यात आहे. परंतु, उडदाची काढणी मात्र बहुतांश ठिकाणी सुरूच आहे. शनिवारी पडलेल्या पावसामुळे उडदाच्या काढणीत व्यत्यय आला. अचानक पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी उडीद पिकाची काढणी थांबविली आहे. दुसरीकडे काढणी चालू असताना पाऊस आल्याने त्याचा फटका उडदाला बसला आहे. जिल्ह्यातील जवळाबाजार, औंढा नागनाथ, नांदापूर, डोंगरकडा, कुरुंदा, पोत्रा, दांडेगाव, कळमनुरी, नर्सी नामदेव, डिग्रस कऱ्हाळे, डिग्रस कोंढूर, बाळापूर आदी गावांत पाऊस जोरदार पडला.

फुलोत्पादक शेतकरी सुखावला

गत दहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे फुलोत्पादक शेतकरी चिंताग्रस्त बनले होते. रोज ढगाळ वातावरण असायचे. परंतु, अचानक ढग गायब होऊन कडक ऊन पडत होते. दसरा, दिवाळी सणानिमित्त झेंडूच्या फुलांना मागणी असते. म्हणून अनेक शेतकऱ्यांनी झेंडू फुलाची लागवड केली आहे. दसरा, दिवाळीपर्यंत पाऊस पडतोय की नाही, याची चिंता शेतकऱ्यांना लागली होती. शनिवारी पडलेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे.