शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

पुनर्वसू नक्षत्रामध्ये पाऊस पडेल; शेतकऱ्यांना आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:20 IST

हिंगोली : हवामानशास्त्र कितीही प्रगत झाले असले तरी पावसाचा अंदाज बांधताना अनेकवेळा त्यात तफावत आढळून येते. कित्येक वेळा हवामान ...

हिंगोली : हवामानशास्त्र कितीही प्रगत झाले असले तरी पावसाचा अंदाज बांधताना अनेकवेळा त्यात तफावत आढळून येते. कित्येक वेळा हवामान खात्याचा अंदाजही चुकताे. मात्र, शेतकऱ्यांना अवगत असलेेले प्राचीन ज्ञान सहसा चुकत नाही. शेतकऱ्यांच्या शास्त्राला लिखित स्वरुप नसले तरी पावसाचे तंतोतंत भाकीत करणारी मंडळी ग्रामीण भागात आजही आढळून येतात. एकंदर पुनर्वसू नक्षत्रात चांगला पाऊस पडेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

यावर्षी २५ मे रोजी रोहिणी नक्षत्राला प्रारंभ झाला. रोहिणी नक्षत्राचा पाऊस हा जमिनीतील धूप कमी करणारा असल्यामुळे या नक्षत्रात कोणताही शेतकरी पेरणी करत नाही. रोहिणी नक्षत्राच्या पावसापूर्वी शेतकरी शेतीची मशागत करून घेतो. मृग नक्षत्रात पाऊस पडल्यानंतर चार-पाच दिवसांनी खरिपातील पेरणीला सुरुवात केली जाते. यंदा मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाला. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मुगाची पेरणीही केली. परंतु, मृग नक्षत्रानंतर आलेल्या आर्द्रा नक्षत्रात पावसाने दडी मारली. त्यामुळे कोवळी पिके आता तग धरू लागली असून, कोरडवाहू शेतातील पिके कोमेजून जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे.

पुनर्वसू नक्षत्र ५ जुलैपासून सुरू झाले असून, याचे वाहन ‘उंदीर’ आहे. या नक्षत्रात चांगला पाऊस पडेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. गतवर्षी पुनर्वसू नक्षत्रात चांगला पाऊस पडल्यामुळे पिकेही बहरून आली होती. पुनर्वसूच्या पावसामुळे यावर्षीही पिके बहरतील, असे शेतकऱ्यांना वाटत आहे.

गत काही वर्षांपासून पावसाची नक्षत्रे अनियमित झाली आहेत. जंगलतोड, प्रदूषण, तापमानात वाढ आणि हवामानातील बदल या कारणांमुळे निसर्गाची व्यवस्था नष्ट होऊ पाहात आहे. मागील २५ वर्षांपासून पावसाची नक्षत्रे अनियमित झाली आहेत. एकूण २७ नक्षत्रांपैकी मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा, उतरा, हस्त ही पावसाची नक्षत्रे आहेत. या ९ नक्षत्रांमध्ये पिकांना पाहिजे तेवढा भरपूर पाऊस पडेल, अशी आशा शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.

नक्षत्र आणि वाहन

मृग-गाढव

आर्द्रा-कोल्हा

पुनर्वसू- उंदीर

पुष्य- घोडा

आश्लेषा - मोर

मघा - गाढव

पूर्वा - बेडूक

उतरा - म्हैस

हस्त - घोडा

शेतकरी काय म्हणतात...

गत कित्येक वर्षांपासून नक्षत्रांवर पेरणी करत आलो आहे. यावर्षीही मृग नक्षत्राच्या पावसावरच खरीप पेरणी केली आहे. पुनर्वसूत चांगला पाऊस पडेल, अशी आशा आजतरी आहे.

- बाबाराव सुरुशे, डिग्रस

हवामान खाते पावसाचा अंदाज बांधते. परंतु, पाऊस अंदाजाप्रमाणे काही पडत नाही. त्यामुळे नक्षत्रांवरच शेतकरी पेरणी उरकून घेतात. नक्षत्र हे शास्त्र लिखित नसले तरी पावसाची हमी मात्र आहे.

- राजेश सुरोशे, कुडाळा

मृग नक्षत्रावर कापूस, सोयाबीन, उडीद, मूग आदी खरीप पिकांची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. आर्द्रा नक्षत्रापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पिके कोमेजून जात आहेत. पुनर्वसू नक्षत्रात भरपूर पाऊस पडून पिकांना जीवदान मिळेल आणि शेतकरी आनंदी होईल.

- कैलास महाजन, टाकळी

फोटो