शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

...तर बारावी परीक्षा काळात प्राध्यापकांचा असहकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 23:52 IST

मागील दहा ते अकरा महिन्यांपासून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्या मान्य न झाल्यास बारावीच्या वार्षिक परीक्षा काळात असहकार आंदोलनाचा इशारा जुक्टाचे जिल्हाध्यक्ष प्रा. गजानन असोलेकर यांनी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : मागील दहा ते अकरा महिन्यांपासून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्या मान्य न झाल्यास बारावीच्या वार्षिक परीक्षा काळात असहकार आंदोलनाचा इशारा जुक्टाचे जिल्हाध्यक्ष प्रा. गजानन असोलेकर यांनी दिला.राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत टप्पा आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ११ जानेवारी रोजी मागण्याचे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांना देण्यात आले. प्रत्येक तालुकास्तरावर हे आंदोलन पार पडले. १८ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे तर ३० रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालयावर मुक मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर बारावीच्या वार्षिक परीक्षा काळात असहकार आंदोलन करण्यात येणार आहे. प्रलंबित मागण्यांसाठी संघटनेतर्फे मागील ४ ते ५ वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी, मूल्यांकनास पात्र कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान द्यावे, माहिती तंत्रज्ञान विषय अनिवार्य करून अनुदानित करावा, २४ वर्षे सेवा झालेल्या सर्व शिक्षकांना विनाअट निवडश्रेणी द्यावी, वाढीव पदांना मंजूरी द्यावी २०१२-१३ पासून नियुक्त शिक्षकांना नियुक्ती दिनांकापासून मान्यता व वेतन द्यावे, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करावे, शिक्षकांनाही १०, २०, ३० वर्षाच्या सेवेनंतर आश्वासित प्रगती योजना लागू करून न्याय द्यावा, वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीसाठी कॅशलेस प्रणाली सुरू करावी. विज्ञान व गणिताचे पुर्वीप्रमाणे भाग १ व भाग २ असे स्वतंत्र्य पेपर काढावेत आदी मागण्या आहेत.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रTeacherशिक्षक