शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
2
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
3
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
4
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न
5
कामावरून घरी परतला अन् पत्नीचा मृतदेह पाहून हादरला; विक्रोळीतील खळबळजनक घटना
6
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
7
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?
8
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
9
Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी कायम गुपित ठेवा, नाहीतर अडचणीत याल!- आचार्य चाणक्य!
10
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
11
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
12
"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी
13
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्यधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
14
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
15
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
16
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
17
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा
18
मुंबईविरुद्ध सामन्यात चेन्नईचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात का उतरले? जाणून घ्या कारण
19
लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला, दरीत कोसळली गाडी; ६ जणांचा मृत्यू, वधू-वर गंभीर जखमी
20
Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टींचे दिसणे म्हणजे वर्षाखेरीपर्यंत संसाराला लागणार याची चिन्हं!

२० गुंठ्याच्या शेडनेट शेतीतून मिळतेय दररोज २ क्विंटल शिमला मिरचीचे उत्पादन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 11:55 IST

यशकथा : ढोबळी मिरचीनंतर या ठिकाणी गुलाबाची  शेती ते करणार आहेत.

- अरुण चव्हाण  (हिंगोली) 

पारंपरिक शेतीला कंटाळून वसमत तालुक्यातील आडगाव रंजे येथील एका तरुण शेतकऱ्याने कृषी विभागाकडून ग्रीन शेड नेट हाऊस घेऊन २० गुंठे जमिनीमध्ये शिमला मिरचीची लागवड केली आहे. या माध्यमातून दररोज दोन क्विंटल शिमला मिरचीचे उत्पादन होत आहे.

वसमत तालुक्यातील आडगाव रंजे येथील तरुण शेतकरी सुरेश सुदामराव चव्हाण यांना चार एकर शेती आहे. शिक्षण जेमतेम बारावीपर्यंत असल्याने नोकरी लागत नव्हती. त्यामुळे ते शेतीकडे वळले. बोअरला पाणी अल्प प्रमाणात होते. त्यांना या शेतीत पाण्याअभावी उत्पन्न खूपच कमी होत होते. गत दोन-तीन वर्षांपासून पावसाचे पाणी कमी व अनियमितता त्यामुळे खर्च जास्त उत्पन्न कमी होत होते. निसर्गाच्या लहरीपणाच्या शेतीवर काही तरी नवीन प्रयोग करून शेती करावी, असा विचार केला. अल्प प्रमाणात बोअरला पाणी असल्यामुळे ऊस, हळद, यासारखी नगदी पिके घेता येत नव्हती. त्यांनी कृषी विभाग वसमत यांच्याशी संपर्क साधून २० गुंठे जमिनीवर ग्रीन शेडनेट हाऊस उभे केले.

हा खर्च स्वत: केला. त्यानंतर ५० टक्के सबसिडी कृषी विभागाकडून मिळाली. या शेड हाऊसमध्ये ५ आॅगस्ट २०१८ रोजी रोपे आणून लावली गत महिन्यापासून दररोज २ क्विंटल म्हणजे अंदाजे तीन टन माल निघाला असून बाजारपेठेत १८०० ते २ हजार रुपये टन दराने विक्री होत आहे. त्यामुळे त्यांना महिन्याकाठी एक लाख रुपये मिळाले आहेत. हा माल परभणी, नांदेड, हिंगोलीच्या बाजारपेठेत विक्री करीत असून, आगामी काळात ३० ते ३५ टन शिमला मिरचीचे उत्पादन होईल. त्यामुळे या शेतकऱ्याला २० गुंठे जमिनीमध्ये ६ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. या मिरचीला त्यांनी जैविक खते दिली आहेत. या ठिकाणी ग्रीन शेड हाऊससाठी वसमतचे कृषी अधिकारी गजानन पवार, कृषी पर्यवेक्षक माने, कृषी सहायक योगिता अंभोरे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. 

या बरोबरच जैविक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ढोबळी मिरचीसह झेंडूचे फुले, मेथी याचे उत्पादन घेतले असून, यासाठी गोमूत्र, शेणखत, लिंबोळी अर्क यांचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे कमी जमिनीत अधिक उत्पन्न मिळत आहे.  मिरची संगोपनासाठी स्वत: सुरेश चव्हाण यांनी पत्नी आणि एका मजुराच्या साहाय्याने शेतीचे नियोजन केले.

ढोबळी मिरचीनंतर या ठिकाणी गुलाबाची  शेती ते करणार आहेत. बाजारपेठेत गुलाबाला चांगली मागणी असून, ‘व्हॅलेंटाईन डे’ला सर्वाधिक गुलाब फुलांची विक्री होते. याअनुषंगाने सुरेश चव्हाण यांनी आतापासूनच गुलाब शेतीचे नियोजन सुरू केले आहे. या तरुण शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक पद्धतीने शेती करणे सुरू केले आहे. दुष्काळाची तमा न बाळगता, उपलब्ध असलेल्या कमी पाण्याचे त्यांनी व्यवस्थित नियोजन करून हे सर्व यश मिळविले आहे. त्यांची शेतीमधील ही भरारी पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी या ठिकाणी शेती पाहण्यासाठी भेटी देत आहेत. अनेक शेतकरी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत असल्याचे सुरेश चव्हाण यांनी सांगितले. 

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी