शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

वीजचोरांना देणार ‘जोरका झटका’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 00:45 IST

महावितरणने थकबाकी वसुलीसह वीजचोरी रोखण्यासाठीही मोहीम आखली आहे. ज्या भागात वीजचोरीचे प्रमाण जास्त आहे, अशा ठिकाणी छापे मारण्याची कारवाई लवकरच हाती घेतली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महावितरणने थकबाकी वसुलीसह वीजचोरी रोखण्यासाठीही मोहीम आखली आहे. ज्या भागात वीजचोरीचे प्रमाण जास्त आहे, अशा ठिकाणी छापे मारण्याची कारवाई लवकरच हाती घेतली जाणार आहे.हिंगोली जिल्ह्यात विविध भागात अतिरिक्त भारामुळे रोहीत्र जळण्याचे प्रमाण वाढत आहे. डीपीवरून वीजचोरी होत असल्याने भाव वाढण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे अशा डीपीवर नियमित जोडणी घेवून देयके भरणाऱ्या शेतकरी व घरगुती ग्राहकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकारावर आळा घालण्यासाठी नागरिकांनी आपल्या भागातील वीजचोरीला आळा घालण्याचे आवाहन अधीक्षक अभियंता एस.बी. जाधव यांनी केले. तर संबंधित ऐकतच नसल्यास याची माहिती महावितरणलाही द्यावी, असेही त्यांनी सांगितले.जिल्ह्यात फिडरनिहाय थकबाकी व वीजचोरीच्या प्रकाराची माहिती गोळा करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. वीजचोरीविरुद्ध यापूर्वीही मोहीम राबविण्यात आली होती. यंदा पुन्हा अशी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. राज्यातील इतर भागाच्या तुलनेत या भागात वीजचोरीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे नागरिकांनीही अशा प्रकारांना अटकाव करणे गरजेचे आहे. शिवाय महावितरणच्या अधिकाºयांनाही कृषी व घरगुती अनधिकृत वीजजोडण्या असल्यास संबंधितांवर कारवाईचे आदेश देण्यात येतील, असेही जाधव म्हणाले. हिंगोली जिल्ह्यातील थकबाकीचा आकडाही वाढत चालला आहे. घरगुती असो वा कृषीपंप. ही थकबाकी भरल्याशिवाय यापुढे रोहीत्र देणे शक्य नाही. महावितरणच्या वरिष्ठांचेच तसे आदेश आहेत. त्यामुळे शेतकºयांना वेठीस धरण्यासाठी नव्हे, तर महावितरणचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी हे अपरिहार्य आहे. शेतकºयांनी अधिकृतरीत्या देयके भरल्यास अशांची अडवणूक करण्याचे कोणतेच कारण नाही. देयक भरल्यानंतर संबंधित शेतकºयांना रोहीत्र वेळेत बदलून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले.कृषीपंपधारक शेतकरी पूर्ण देयक वेळेवर भरत नसल्याने थकबाकी वाढली आहे. वर्षाचे देयक मोठ्या प्रमाणात होते. मात्र त्यातही प्रति हॉर्सपॉवर हजार रुपये याप्रमाणे देयकाची रक्कम भरल्यास नादुरुस्त डीपी दुरुस्त करून दिला जाईल. ही रक्कम पूर्ण देयकाच्या तीस टक्क्यांच्या आसपासच होते.त्यामुळे एक एचपीच्या पंपास हजार रुपये, तीन एचपीसाठी तीन हजार रुपये, पाच एचपीसाठी पाच हजार रुपये भरावे लागतील. त्या रोहित्रावरील प्रत्येक शेतकºयाने एवढी रक्कम भरल्यास रोहित्र वितरित करण्यात येणार असल्याचेही जाधव म्हणाले.गावठाण रोहित्रावर मात्र किमान ७५ टक्के थकबाकी वसूल झाल्याशिवाय रोहीत्र वितरित केले जाणार नाही. त्यामुळे ग्राहकांनी थकबाकी भरण्याचे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :Hingoliहिंगोलीmahavitaranमहावितरण