शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या तक्रारींबाबत पोलीस संवेदनशून्य का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 01:02 IST

महिला व मुलींशी गैरवर्तन होण्याचे वाढते प्रमाण पाहता पोलिसांचा धाक वाढणे अपेक्षित असताना वसमतमध्ये पोलिसांत तक्रार दिल्यानंतरही पोलीस महिलांच्या बाजूने भक्कमपणे उभे राहण्याऐवजी तांत्रिक कारणांवरच बोट ठेवण्यात धन्यता मानत असल्याचे धक्कादायक चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : महिला व मुलींशी गैरवर्तन होण्याचे वाढते प्रमाण पाहता पोलिसांचा धाक वाढणे अपेक्षित असताना वसमतमध्ये पोलिसांत तक्रार दिल्यानंतरही पोलीस महिलांच्या बाजूने भक्कमपणे उभे राहण्याऐवजी तांत्रिक कारणांवरच बोट ठेवण्यात धन्यता मानत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. नवोदय विद्यालयात शिक्षकांनीच विद्यार्थिनींशी व बँक व्यवस्थापकाने महिलेशी गैरवर्तन केल्याच्या प्रकरणात हे प्रकर्षाने समोर आले आहे.वसमतच्या नवोदय विद्यालयातील दोन मुलींशी तेथीलच दोघा शिक्षकांनी गैरवर्तन केले. सदर घटना ६ मार्च रोजी घडली. प्रकरणाची तक्रार घेवून प्राचार्य वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात गेले. शाळकरी मुलीशी शाळेच्या आवारातच गैरवर्तन करणारे चक्क शिक्षकच असल्याने याप्रकरणी तातडीने कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याने प्राचार्यालाच उलट पावली परत पाठवले. ज्या मुलींची छेड काढल्या गेली त्यांनी पोलीस ठाण्यात येवून तक्रार देण्याचा हट्ट धरला. अल्पवयीन शाळकरी मुलीवर ओढवलेल्या या प्रसंगात पोलिसांनी खरे तर पालकांच्या भूमिकेत तातडीने शिक्षकांना धाक वाटेल, असे पाऊले उचलणे अपेक्षित होते. मात्र ग्रामीण पोलीस ठाण्याला या प्रकरणाचे गांभीर्र्यच समजले नाही. विशेष बाब अशी की, याच ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी १३ मार्च रोजी त्या दोन्ही शिक्षकांना ठाण्यात पाचारण केले. ‘सांगोपांग’ चर्चा केली, गुप्त चर्चेने पोलिसांचे काय ‘समाधान’ झाले त्यांना सन्मानाने परत पाठवले. त्यामुळे ते दोघे शिक्षक पुन्हा गावात आल्याचे पहावयास मिळाले.आता सदर प्रकरण ‘लोकमत’ ने उजेडात आणल्यानंतर ग्रामीण पोलीस स्वत:ची बाजू सावरण्याच्या प्रयत्नात आहेत. शनिवारी प्राचार्याशी पोलिसांनी चर्चा केली व आम्ही जर कारवाई केली तर परीक्षांवर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त केली. मुलीचे पालक तक्रार देण्यासाठी पुढे येण्यासाठी घाबरत आहेत. तर पोलीस मुलीच्या पालकांना धीर व हिंमत देण्याऐवजी तक्रार पीडित मुलीकडून देण्यात आली पाहिजे, असा हट्ट धरत आहेत.वसमत येथील युनियन बँंकेत शाखाधिकाºयाने केलेल्या असभ्य वर्तनाविषयी महिलेने धाडस करून पोलिसांत तक्रार दिली. अनेकींपैकी ही एक महिला होती. मात्र तिची तक्रार घेण्याअगोदर दोन दिवस वाटाघाटी व चर्चा झाल्याचेही आता समोर येत आहे. ज्याच्या विराधात तक्रार आहे, तो व्यवस्थापक गुन्हा नोंदवण्याच्या एक दिवस अगोदर पोलीस अधिकाºयांसोबत चर्चा करून आल्याचेही समोर येत आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तरी पोलीस अटक करतील, अशी अपेक्षा होती. मात्र पोलिसांना तो शाखाधिकारी म्हणे सापडलाच नाही. जर महिलेशी गैरवर्तनच्या प्रकरणातील बँकेचा अधिकारी जर पोलिसांचे पथक शोधू शकत नाहीत तर अट्टल गुन्हेगाराचा शोध कसा घेत असतील? हा प्रश्नच आहे.