शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

महिलांच्या तक्रारींबाबत पोलीस संवेदनशून्य का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 01:02 IST

महिला व मुलींशी गैरवर्तन होण्याचे वाढते प्रमाण पाहता पोलिसांचा धाक वाढणे अपेक्षित असताना वसमतमध्ये पोलिसांत तक्रार दिल्यानंतरही पोलीस महिलांच्या बाजूने भक्कमपणे उभे राहण्याऐवजी तांत्रिक कारणांवरच बोट ठेवण्यात धन्यता मानत असल्याचे धक्कादायक चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : महिला व मुलींशी गैरवर्तन होण्याचे वाढते प्रमाण पाहता पोलिसांचा धाक वाढणे अपेक्षित असताना वसमतमध्ये पोलिसांत तक्रार दिल्यानंतरही पोलीस महिलांच्या बाजूने भक्कमपणे उभे राहण्याऐवजी तांत्रिक कारणांवरच बोट ठेवण्यात धन्यता मानत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. नवोदय विद्यालयात शिक्षकांनीच विद्यार्थिनींशी व बँक व्यवस्थापकाने महिलेशी गैरवर्तन केल्याच्या प्रकरणात हे प्रकर्षाने समोर आले आहे.वसमतच्या नवोदय विद्यालयातील दोन मुलींशी तेथीलच दोघा शिक्षकांनी गैरवर्तन केले. सदर घटना ६ मार्च रोजी घडली. प्रकरणाची तक्रार घेवून प्राचार्य वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात गेले. शाळकरी मुलीशी शाळेच्या आवारातच गैरवर्तन करणारे चक्क शिक्षकच असल्याने याप्रकरणी तातडीने कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याने प्राचार्यालाच उलट पावली परत पाठवले. ज्या मुलींची छेड काढल्या गेली त्यांनी पोलीस ठाण्यात येवून तक्रार देण्याचा हट्ट धरला. अल्पवयीन शाळकरी मुलीवर ओढवलेल्या या प्रसंगात पोलिसांनी खरे तर पालकांच्या भूमिकेत तातडीने शिक्षकांना धाक वाटेल, असे पाऊले उचलणे अपेक्षित होते. मात्र ग्रामीण पोलीस ठाण्याला या प्रकरणाचे गांभीर्र्यच समजले नाही. विशेष बाब अशी की, याच ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी १३ मार्च रोजी त्या दोन्ही शिक्षकांना ठाण्यात पाचारण केले. ‘सांगोपांग’ चर्चा केली, गुप्त चर्चेने पोलिसांचे काय ‘समाधान’ झाले त्यांना सन्मानाने परत पाठवले. त्यामुळे ते दोघे शिक्षक पुन्हा गावात आल्याचे पहावयास मिळाले.आता सदर प्रकरण ‘लोकमत’ ने उजेडात आणल्यानंतर ग्रामीण पोलीस स्वत:ची बाजू सावरण्याच्या प्रयत्नात आहेत. शनिवारी प्राचार्याशी पोलिसांनी चर्चा केली व आम्ही जर कारवाई केली तर परीक्षांवर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त केली. मुलीचे पालक तक्रार देण्यासाठी पुढे येण्यासाठी घाबरत आहेत. तर पोलीस मुलीच्या पालकांना धीर व हिंमत देण्याऐवजी तक्रार पीडित मुलीकडून देण्यात आली पाहिजे, असा हट्ट धरत आहेत.वसमत येथील युनियन बँंकेत शाखाधिकाºयाने केलेल्या असभ्य वर्तनाविषयी महिलेने धाडस करून पोलिसांत तक्रार दिली. अनेकींपैकी ही एक महिला होती. मात्र तिची तक्रार घेण्याअगोदर दोन दिवस वाटाघाटी व चर्चा झाल्याचेही आता समोर येत आहे. ज्याच्या विराधात तक्रार आहे, तो व्यवस्थापक गुन्हा नोंदवण्याच्या एक दिवस अगोदर पोलीस अधिकाºयांसोबत चर्चा करून आल्याचेही समोर येत आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तरी पोलीस अटक करतील, अशी अपेक्षा होती. मात्र पोलिसांना तो शाखाधिकारी म्हणे सापडलाच नाही. जर महिलेशी गैरवर्तनच्या प्रकरणातील बँकेचा अधिकारी जर पोलिसांचे पथक शोधू शकत नाहीत तर अट्टल गुन्हेगाराचा शोध कसा घेत असतील? हा प्रश्नच आहे.