शहरं
Join us  
Trending Stories
1
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
2
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
3
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
4
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
5
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
6
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
7
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
8
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
9
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
10
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
11
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
12
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
13
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
14
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
15
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
16
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
17
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
18
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
19
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
20
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   

भगरीच्या प्रसादातून पुन्हा विषबाधा, हिंगोली जिल्हा रुग्णालयात दिडशे जणांवर उपचार सुरू

By विजय पाटील | Updated: February 21, 2024 12:43 IST

कळमनुरी तालुक्यातील रेणापूर येथील घटना

हिंगोली : अखंड हरिनाम सप्ताहात भगरीच्या प्रसादातून जवळपास दिडशे जणांना विषबाधा झाल्याची घटना कळमनुरी तालुक्यातील रेणापूर येथे २० फेब्रुवारी रोजी घडली. प्रसाद खाल्ल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास उलट्या, मळमळ होणे सुरू झाल्याने रूग्णांना हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

रेणापूर येथील मारोती मंदिरात मागील चार दिवसांपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. २० फेब्रुवारी रोजी जया एकादशीनिमित्त उपवास असणाऱ्या भाविकांसाठी सायंकाळी ६ वाजता जवळपास ४० किलो भगरीचा प्रसाद ठेवण्यात आला होता. हा प्रसाद गावातील ५०० लोकांनी खाल्ला. परंतु, मध्यरात्रीच्या सुमारास काहींना उलट्या, मळमळ, डोकेदुखी आदी लक्षणे जाणवू लागली. त्यानंतर मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास ३५ जणांना येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने उपचार सुरू केले. तर दुसऱ्या दिवशी २१ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास जवळपास आणखी ३० जणांना लक्षणे जाणवत असल्यामुळे जिल्हा रूग्णालयात आणण्यात आले. या सर्व जणांवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चांगली असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

भाऊराव पतंगे, पांडूरंग पतंगे, अनिल पतंगे, सोनाजी पतंगे, शेषराव वानखेडे, कासूबाई श्रृंगारे, श्याम श्रृंगारे, बाबाराव कुटे, शिवाजी पतंगे यांच्यासह जवळपास दिडशे जणांना भगरीतून विषबाधा झाली आहे. जिल्हा रूग्णालयात प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.दीपक मोरे, डाॅ.प्रसाद मस्के, डाॅ.नंदकिशोर करवा, डाॅ. देशमुख, डाॅ.दीपक मोरे, डाॅ.विशाल पवार, आशा क्षिरसागर, राठोडे आदींनी उपचार केले.दरम्यान, आरोग्य विभागाच्या वतीने गावात वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक पाठविण्यात आले असून, आरोग्य विभाग रेणापूरवर लक्ष ठेवून आहे.

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधाHingoliहिंगोली