शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

भगरीच्या प्रसादातून पुन्हा विषबाधा, हिंगोली जिल्हा रुग्णालयात दिडशे जणांवर उपचार सुरू

By विजय पाटील | Updated: February 21, 2024 12:43 IST

कळमनुरी तालुक्यातील रेणापूर येथील घटना

हिंगोली : अखंड हरिनाम सप्ताहात भगरीच्या प्रसादातून जवळपास दिडशे जणांना विषबाधा झाल्याची घटना कळमनुरी तालुक्यातील रेणापूर येथे २० फेब्रुवारी रोजी घडली. प्रसाद खाल्ल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास उलट्या, मळमळ होणे सुरू झाल्याने रूग्णांना हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

रेणापूर येथील मारोती मंदिरात मागील चार दिवसांपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. २० फेब्रुवारी रोजी जया एकादशीनिमित्त उपवास असणाऱ्या भाविकांसाठी सायंकाळी ६ वाजता जवळपास ४० किलो भगरीचा प्रसाद ठेवण्यात आला होता. हा प्रसाद गावातील ५०० लोकांनी खाल्ला. परंतु, मध्यरात्रीच्या सुमारास काहींना उलट्या, मळमळ, डोकेदुखी आदी लक्षणे जाणवू लागली. त्यानंतर मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास ३५ जणांना येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने उपचार सुरू केले. तर दुसऱ्या दिवशी २१ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास जवळपास आणखी ३० जणांना लक्षणे जाणवत असल्यामुळे जिल्हा रूग्णालयात आणण्यात आले. या सर्व जणांवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चांगली असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

भाऊराव पतंगे, पांडूरंग पतंगे, अनिल पतंगे, सोनाजी पतंगे, शेषराव वानखेडे, कासूबाई श्रृंगारे, श्याम श्रृंगारे, बाबाराव कुटे, शिवाजी पतंगे यांच्यासह जवळपास दिडशे जणांना भगरीतून विषबाधा झाली आहे. जिल्हा रूग्णालयात प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.दीपक मोरे, डाॅ.प्रसाद मस्के, डाॅ.नंदकिशोर करवा, डाॅ. देशमुख, डाॅ.दीपक मोरे, डाॅ.विशाल पवार, आशा क्षिरसागर, राठोडे आदींनी उपचार केले.दरम्यान, आरोग्य विभागाच्या वतीने गावात वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक पाठविण्यात आले असून, आरोग्य विभाग रेणापूरवर लक्ष ठेवून आहे.

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधाHingoliहिंगोली