शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
2
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
3
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
4
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
5
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
6
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
7
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
8
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
9
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
10
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
11
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
12
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर
13
संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
14
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
15
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
16
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
18
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
19
बेडग-कर्नाटक मार्गावर हत्याराचा धाक दाखवून सात लाख लूटले, गाडीची केली तोडफोड
20
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह

शेतमालावरील निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा

By रमेश वाबळे | Updated: January 18, 2024 19:45 IST

शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्षाचे धरणे आंदोलन

हिंगोली : सर्व शेतमालावरील निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवावी व शेतमाल व्यापारातील सरकारचा हस्तक्षेप बंद करावा, तसेच शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने १८ जानेवारी रोजी  येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

नैसर्गिक संकटांमुळे शेती तोट्यात चालली आहे. अनेक वेळा लागवडही वसूल होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. तर, दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांच्या मागण्या, प्रश्न सोडविण्याकडे सरकार कानाडोळा करीत असून, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच शेतकरी कर्जबाजारी झाला असल्याचे शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याकरिता गुरुवारी राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले.

यात शेतकऱ्यांकडून सक्तीची कर्जवसुली थांबवावी, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्यात यावी, शेतीसाठी पूर्णवेळ व पूर्ण दाबाने वीजपुरवठा करावा, वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या शेतातील पिकांचे नुकसान टाळण्यासाठी सरकारने उपाय योजना कराव्यात, तसेच नुकसान भरपाई द्यावी, पीक विम्यात होणारी शेतकऱ्यांची फसवणूक बंद करून योग्य विमा देण्यात यावा यासह इतर मागण्या करण्यात आल्या. आंदोलनात जिल्हा प्रमुख उत्तमराव वाबळे, देवीप्रसाद ढोबळे, खंडबाराव पोले, प्रल्हाद राखुंडे, मुंजाराव बेंगाळ, महादराव चव्हाण, जनार्दन राखोंडे, खंडबाराव नाईक, शेषराव कदम, साहेबराव आसोले, डिगांबर आहेर, मुरलीधर कदम, कानबाराव पोले, बळीराम कागणे, रमेश गरड, परबतराव माने, नागोराव पडोळे, शेषराव राखोंडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दरम्यान, आंदोलकांची खा. हेमंत पाटील यांनी भेट घेऊन चर्चा केली.

टॅग्स :HingoliहिंगोलीFarmerशेतकरी