शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
4
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
5
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
6
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
7
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
8
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
9
दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात
10
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
11
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
12
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
13
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
14
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
15
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
16
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
17
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
18
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
19
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
20
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश

शेतमालावरील निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा

By रमेश वाबळे | Updated: January 18, 2024 19:45 IST

शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्षाचे धरणे आंदोलन

हिंगोली : सर्व शेतमालावरील निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवावी व शेतमाल व्यापारातील सरकारचा हस्तक्षेप बंद करावा, तसेच शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने १८ जानेवारी रोजी  येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

नैसर्गिक संकटांमुळे शेती तोट्यात चालली आहे. अनेक वेळा लागवडही वसूल होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. तर, दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांच्या मागण्या, प्रश्न सोडविण्याकडे सरकार कानाडोळा करीत असून, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच शेतकरी कर्जबाजारी झाला असल्याचे शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याकरिता गुरुवारी राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले.

यात शेतकऱ्यांकडून सक्तीची कर्जवसुली थांबवावी, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्यात यावी, शेतीसाठी पूर्णवेळ व पूर्ण दाबाने वीजपुरवठा करावा, वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या शेतातील पिकांचे नुकसान टाळण्यासाठी सरकारने उपाय योजना कराव्यात, तसेच नुकसान भरपाई द्यावी, पीक विम्यात होणारी शेतकऱ्यांची फसवणूक बंद करून योग्य विमा देण्यात यावा यासह इतर मागण्या करण्यात आल्या. आंदोलनात जिल्हा प्रमुख उत्तमराव वाबळे, देवीप्रसाद ढोबळे, खंडबाराव पोले, प्रल्हाद राखुंडे, मुंजाराव बेंगाळ, महादराव चव्हाण, जनार्दन राखोंडे, खंडबाराव नाईक, शेषराव कदम, साहेबराव आसोले, डिगांबर आहेर, मुरलीधर कदम, कानबाराव पोले, बळीराम कागणे, रमेश गरड, परबतराव माने, नागोराव पडोळे, शेषराव राखोंडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दरम्यान, आंदोलकांची खा. हेमंत पाटील यांनी भेट घेऊन चर्चा केली.

टॅग्स :HingoliहिंगोलीFarmerशेतकरी