शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

शेतमालावरील निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा

By रमेश वाबळे | Updated: January 18, 2024 19:45 IST

शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्षाचे धरणे आंदोलन

हिंगोली : सर्व शेतमालावरील निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवावी व शेतमाल व्यापारातील सरकारचा हस्तक्षेप बंद करावा, तसेच शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने १८ जानेवारी रोजी  येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

नैसर्गिक संकटांमुळे शेती तोट्यात चालली आहे. अनेक वेळा लागवडही वसूल होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. तर, दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांच्या मागण्या, प्रश्न सोडविण्याकडे सरकार कानाडोळा करीत असून, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच शेतकरी कर्जबाजारी झाला असल्याचे शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याकरिता गुरुवारी राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले.

यात शेतकऱ्यांकडून सक्तीची कर्जवसुली थांबवावी, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्यात यावी, शेतीसाठी पूर्णवेळ व पूर्ण दाबाने वीजपुरवठा करावा, वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या शेतातील पिकांचे नुकसान टाळण्यासाठी सरकारने उपाय योजना कराव्यात, तसेच नुकसान भरपाई द्यावी, पीक विम्यात होणारी शेतकऱ्यांची फसवणूक बंद करून योग्य विमा देण्यात यावा यासह इतर मागण्या करण्यात आल्या. आंदोलनात जिल्हा प्रमुख उत्तमराव वाबळे, देवीप्रसाद ढोबळे, खंडबाराव पोले, प्रल्हाद राखुंडे, मुंजाराव बेंगाळ, महादराव चव्हाण, जनार्दन राखोंडे, खंडबाराव नाईक, शेषराव कदम, साहेबराव आसोले, डिगांबर आहेर, मुरलीधर कदम, कानबाराव पोले, बळीराम कागणे, रमेश गरड, परबतराव माने, नागोराव पडोळे, शेषराव राखोंडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दरम्यान, आंदोलकांची खा. हेमंत पाटील यांनी भेट घेऊन चर्चा केली.

टॅग्स :HingoliहिंगोलीFarmerशेतकरी