शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
7
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
8
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
9
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
10
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
11
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
12
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
13
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
15
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
16
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
17
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
18
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
19
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
20
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

कर्जमाफीचे १६२१७ अर्ज प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 00:21 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील १६१.८४ कोटींची कर्जमाफी झाली तरीही १६ हजार २१७ अर्ज अजूनही प्रलंबितच आहेत. आतापर्यंत ३५ हजार १८२ शेतकऱ्यांच्या खात्यावर ११३.२८ कोटी वर्ग झाल्याचे सांगितले जात असले तरीही प्रत्यक्ष लाभार्थ्यांना बँकांकडून त्याची माहितीच मिळत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील १६१.८४ कोटींची कर्जमाफी झाली तरीही १६ हजार २१७ अर्ज अजूनही प्रलंबितच आहेत. आतापर्यंत ३५ हजार १८२ शेतकऱ्यांच्या खात्यावर ११३.२८ कोटी वर्ग झाल्याचे सांगितले जात असले तरीही प्रत्यक्ष लाभार्थ्यांना बँकांकडून त्याची माहितीच मिळत नाही.२0१७ मध्ये कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर काही दिवसांनीच ११३ कोटी रुपयांचा निधी मिळाला व तो खात्यावर वर्ग होणार असल्याचे सांगण्यात येत होते. तो निधी पूर्णपणे लाभार्थी शेतकºयांच्या खात्यावर वर्ग झाल्याचे मे २0१८ मध्ये सांगितले जात आहे. मात्र या लाभार्थ्यांनाही खरेच त्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली व खाते बेबाकी झाले की नाही, याची माहिती मिळत नाही. त्यामुळे अनेक लाभार्थी अजूनही कर्जमाफीच्या नावाने बोंब ठोकत आहेत. ज्यांना माफी मिळाली नाही, त्यांची बोंब रास्त आहे. मात्र त्यांच्यासोबतच ज्यांना माफी मिळाली त्यांचेही यादीत नाव असताना बँकेत थकबाकी दिसत असल्याने त्यांचा तर दुप्पट आवेश आहे.ही योजनाच फसवी असल्याचे ही मंडळी सांगत सुटली आहेत. वारंवार योजनेत होणारा बदल, यासंदर्भात आलेले शेकडो निर्णय या योजनेला मारक ठरत आहेत.त्यामुळे खरेच याचा लाभ मिळाला की नाही, हेही कळायला मार्ग नाही. एकूण ४३५१२ खातेदारांना १६१.८४ कोटींची कर्जमाफी झाली. जि.म.स.च्या १७८२ खातेदारांचे २१.४९ कोटी, राष्ट्रीयीकृत बँकांचे १११२७ खातेदारांचे ५९.९८ कोटी तर ग्रामीण बँकेच्या ६२३३ खातेदवारांचे ३१.८0 कोटी रुपये खात्यावर वर्ग झाल्याचे सांगितले जात आहे. तर जि.म.स.च्या ३२१८ जणांचे ४.९७ कोटी, राष्ट्रीयीकृत बँकांचे २९७१ जणांचे २८.११ कोेटी तर ग्रामीण बँकेच्या २१४१ जणांचे १५.४७ कोटी अजूनही शिल्लक आहेत.आता नव्याने या योजनेची व्याप्ती वाढली आहे. तर २00१ पासूनच्या थकबाकीदारांनाही यात लाभ मिळणार आहे. याची माहिती संकलित करण्याचे काम नव्याने सुरू झाले आहे. त्यामुळे कर्जमाफीचे काम करतानाच या सरकारचा कार्यकाळ संपतो की काय, अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. प्रशासनही या सर्व प्रकारामुळे बुचकळ्यात पडत आहे. बँकांनाही अशी माहिती देताना नाकीनऊ येत असल्याचे चित्र आहे.पुरावाच नाहीकाही शेतकºयांना अज्ञानामुळे आपला अर्ज मंजूर झाला की नाही, हे कळायला तयार नाही. तर काहींचा अर्ज मंजूर झाल्यानंतरही कर्जमाफी झाल्याचा काही पुरावा आहे काय? असा उलट सवाल बँकेत ऐकावा लागत आहे. बँकेने संबंधितांना सांगण्याऐवजी त्यांच्याकडूनच ऐकावे लागत आहे.शेतकºयाच्या अज्ञानाचा गैरफायदा घेतला जात आहे. तर काही शेतकरी मात्र वाद घालून माहिती मिळवून निश्चिंत झाले आहेत.जिल्ह्यातील एकूण ९८ बँक शाखांमधून कर्जमाफीसाठी नव्याने १८४६९ अर्ज प्राप्त झाले आहेत. यात हिंगोली ८0८२, वसमत २९0२, औंढा ना-१0८४, कळमनुरी ३२३२ तर सेनगावातून ३१६९ एवढे अर्ज प्राप्त झाले आहेत. ते तालुका स्तरीय छाननी समितीकडे वर्ग करण्यात आले होते. या समितीने या अर्जांचीपडताळणी केली असून यापैकी १६२१७ अर्ज कर्जमाफीच्या पोर्टलवर अपलोड केले आहेत. यात हिंगोली ६९0२, वसमत २0९0, औंढा ना-९९७, कळमनुरी २८३९ तर सेनगावातून ३३८९ अशी तालुकानिहाय अर्जांची संख्या आहे.तालुकास्तरीय समितीच्या अधिकाºयांना आपली कामे सांभाळून हे काम करावे लागत आहे. वारंवार मिळणाºया मुदतवाढीत अर्ज येतच आहेत. त्यामुळे २२0४ अर्ज अजूनही पोर्टलवर अपलोड करणे बाकीच आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीFarmerशेतकरी