शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पिकविम्याचे पैसे तातडीने द्या; सेनगावात शेतकऱ्यांनी केले जलसमाधी आंदोलन

By यशवंत भीमराव परांडकर | Updated: January 19, 2023 14:16 IST

लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन मागे घेतले.

कडोळी (जि. हिंगोली) : पिकविम्याचे पैसे तातडीने देण्यात यावे व इतर मागण्यांसाठी सेनगाव तालुक्यातील भगवती व आजूबाजूच्या गावांतील शेतकऱ्यांनी पैनगंगा नदीमध्ये १९ जानेवारी रोजी जलसमाधी आंदोलन केले.

यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी पिकविमा काढला आहे. परंतु, पिकविम्याचे पैसे अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात पडले नाही. यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी कार्यालयावर २३ डिसेंबर २०२२ रोजी मोर्चा काढला होता. यावेळी अधिकाऱ्यांनी पिकविमा परताव्याची रक्कम देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. परंतु आश्वासनाची पूर्तता केली नाही. त्यामुळे १९ जानेवारीपासून भगवती जवळील पैनगंगा नदीमध्ये शेतकऱ्यांनी उतरुन जलसमाधी आंदोलन केले. या आंदोलनात भगवतीसह माझोड, गुगूळ पिंपरी, तपोवन, गारखेडा, कडोळी, गोरेगाव आदी दहा ते पंधरा गावांतील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.  

दरम्यान, तालुका कृषी अधिकारी संदीप वळकुंडे यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत कृषी व महसूल कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांना त्यांनी पिकविमा रकमेच्या संदर्भात पुढील कार्यवाही शासनस्तरावर केली जाईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात सरपंच वासुदेव जाधव, अर्जुन नाईक, बालाजी कोळसकर, नामदेव पतंगे, अमोल कोळसकर, बबन जाधव, साहेबराव जाधव, बबन कांबळे, शेख आयुब, सुरेश जाधव, शेख सोनू, शेख निजाम, भाऊराव कांबळे, रामजी जाधव, प्रल्हाद जाधव आदी दीडशे ते दोनशे शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा