शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

'शक्तिपीठ’ महामार्गास विरोध कायम; वसमतमध्ये बाभुळगावातील शेतकऱ्यांनीही मोजणी रोखली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 15:22 IST

‘शक्तीपीठ’ महामार्ग वसमत तालुक्यातील १४ गावांतून जातो

वसमत (जि. हिंगोली) : तालुक्यात शक्तिपीठ महामार्गाला पिंपळाचौरे गावातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला नसला तरी रुंज,आसेगावसह १० गावांतील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. १६ जुलै रोजी बाभुळगावातील शेतकऱ्यांनी ‘शक्तिपीठ’ महामार्गास विरोध दर्शवित उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले. राज्याचे मुख्यमंत्री यांनी शक्तिपीठ महामार्ग बाधीत शेतकऱ्यांशी चर्चा करावी, अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली.

‘शक्तीपीठ’ महामार्ग वसमत तालुक्यातील १४ गावांतून जात असून त्यात गुंज, रुंज, सावरगाव, लोण ,आसेगाव, पिंपळाचौरे, माळवटा, गिरगाव, जोडजवळा यासह आदी १४ गावांचा समावेश आहे. ७ जुलै रोजी पिंपळाचौरे येथील शेताची मोजणी प्रशासनाच्या वतीने करण्यात आली. येथील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्ग मोजणीस विरोध केला नाही. परंतु तालुक्यातील रुंज, आसेगाव, सावरगाव, गुंज, लोण, पळसगाव, जोडजवळा येथील शेतकऱ्यांनी या महामार्गास विरोध दर्शवित ‘आमची जमीन कदापीही रस्त्यासाठी देणार नाही. जर यासाठी शासनाने तगादा लावला तर आम्ही आत्मदहन करु’ असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.

दरम्यान, १६ जुलै रोजी उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्या मार्गदर्शनाखाली बाभुळगाव येथे शेत जमीन मोजणीस अधिकारी व कर्मचारी गेले असता मोजणीस शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला. मोजणी करण्यात येऊ नये अशी भुमिका शेतकऱ्यांनी घेताच प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी परतले. शेतकऱ्यांनी त्यानंतर उपविभागीय अधिकारी विकास माने यांना निवेदन दिले. शक्तिपीठ महामार्गास कदापीही जमीन देणार नाही असे निवेदनात नमूद आहे. यावेळी सपोनि गजानन बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करावी...शक्तिपीठ महामार्गास शेतकरी एक इंचही शेत जमीन देणार नाही. हा मार्ग शासनाने रद्द करावा, शेतकऱ्यांशी मुख्यमंत्री यांनी चर्चा करुन त्यांचे ऐकावे. महामार्गास शेतकऱ्यांचा विरोध कायम राहणार आहे.- बाबूराव ढोरे, शेतकरी बाभुळगाव

टॅग्स :Shaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गHingoliहिंगोली