शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

शासकीय सेवेत असणाऱ्यांनीच बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा घोळ केला: बच्चू कडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 13:42 IST

बोगस प्रमाणपत्र काढून दिव्यांगांचा लाभ घेणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची आ. बच्चू कडू यांची मागणी

कळमनुरी (जि. हिंगोली) : दिव्यांगांचे बोगस प्रमाणपत्र काढून त्याचा लाभ घेणाऱ्यांविरुद्ध कारवाई करा, असे मत दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष आ. बच्चू कडू यांनी आपले येथे व्यक्त केले.

प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने ५ ऑगस्ट रोजी येथील तोष्णीवाल मंगल कार्यालयात शेतकरी व कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ. संजय लोंढे, लातूरचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चौगुले, विठ्ठल देशमुख, जिल्हाध्यक्ष रॉबर्ट बांगर, बाळू खिल्लारे, बंटी पाटील, शिवलिंग बोधने, आनंद कदम आदींची उपस्थिती होती.

आ. बच्चू कडू म्हणाले, पूजा खेडकर प्रकरणानंतर राज्यातून १५० दिव्यांग प्रमाणपत्र बोगस असल्याची यादी आपल्याकडे आली आहे. यावर कार्यवाही करण्यासाठी ही यादी शासनाकडे पाठविण्यात आली आहे. शासकीय सेवेत असणाऱ्यांनीच बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा घोळ केला आहे. आपल्या पक्षाकडून लाडका मुख्यमंत्री, लाडका खासदार, लाडका आमदार ही योजना जाहीर करणार असून त्यांना प्रहारकडून दीड हजार रुपये महिना दिला जाईल, असेही ते म्हणाले, आगामी विधानसभेत आम्ही शेतकरी, कष्टकऱ्यांच्या मुद्यावर लढणार आहोत. राजकीय पक्षांनी धर्माचे झेंडे हाती घेतल्यामुळे त्यांचे खाली लक्ष नाही, आर्थिक विषमता दूर झाली पाहिजे.

जातीयवादी मानसिकता संपवा व काम करणाऱ्यांना साथ द्या, आपली नाळ ही जातीशी न जोडता दुःखासोबत जोडा. भाजपा धर्म व हिंदुत्व म्हणतेय, काँग्रेस जातीचे बोलतेय, आम्ही मात्र शेतकरी व कष्टकऱ्यांचे बोलतोय, सामान्य लोकांच्या दु:खाबाबत आम्ही बोलतोय. काम करणाऱ्यांना साथ द्या. शेवटच्या माणसाला आपल्याबद्दल जिव्हाळा निर्माण झाला पाहिजे, जातीयतेमध्ये घरं पेटल्या जात आहेत, असे सांगून मानवतेचे बीज पेरल्या गेले पाहिजे. दिव्यांगांसाठी मी पंधरा वर्षांपासून लढत आहे. जाती, धर्माच्या नावावर पेटू नका. सध्या सोयाबीनला हमीभाव नाही, शेतकरी जगला पाहिजे, असे आ. बच्चू कडू म्हणाले.

प्रहारचे १५ ते २० आमदार आले तर व्यवस्था बदलून टाकू. ग्रामीण भागात घरकुलासाठी कमी तर शहरी भागात जास्त निधी दिला जातो, हा दुजाभाव संपला पाहिजे, असेही ते म्हणाले. ९ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केेले.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूHingoliहिंगोलीDivyangदिव्यांग