शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

...तरच कारखानदारी टिकेल- दांडेगावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:01 IST

साखरेच्या उत्पादनावर आधारित दर मिळण्याची भूमिका शासनाने घेतली पाहिजे. साखरेला किमान ३५ रुपये दर मिळाला तरच साखर कारखानदारी टिकू शकेल अन्यथा साखर कारखान्यांचे भवितव्य अधांतरी आहे, असे प्रतिपादन पूर्णाचे चेअरमन जयप्रकाश दांडेगावकर यांनी केले. रविवारी पूर्णा साखर कारखान्यांच्या गव्हाण पूजन व मोळीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : साखरेच्या उत्पादनावर आधारित दर मिळण्याची भूमिका शासनाने घेतली पाहिजे. साखरेला किमान ३५ रुपये दर मिळाला तरच साखर कारखानदारी टिकू शकेल अन्यथा साखर कारखान्यांचे भवितव्य अधांतरी आहे, असे प्रतिपादन पूर्णाचे चेअरमन जयप्रकाश दांडेगावकर यांनी केले. रविवारी पूर्णा साखर कारखान्यांच्या गव्हाण पूजन व मोळीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.या कार्यक्रमास संचालक प्रल्हादराव काळे, दत्तराव चव्हाण, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष आंबादासराव भोसले, राजू पाटील नवघरे, देवीदास कºहाळे, चंद्रमुनी मस्के, कार्यकारी संचालक आर.बी. पाटील आदींची उपस्थिती होती. दांडेगावकर म्हणाले, यावर्षी पूर्णा व बाराशिव या दोन्ही कारखान्यांचे मिळून १० लाख मे.टन ऊस गाळप करणार आहे. दुष्काळाच्या तीव्र पार्श्वभूमीवर हा हंगाम सुरू आहे. पाण्याचाही दुष्काळ आहे. ऊस उताऱ्यावर परिणाम होणार आहे. ऊस उत्पादक शेतकरीही अडचणीत आहे. साखर उद्योग सध्या अडचणीत आहे. पेट्रोलच्या वाढणाºया किंमतीची शासनाला फिकीर नाही. त्यात सरकार हस्तक्षेप करत नाही. मात्र साखरेचे दर पाच रुपयांनी वाढले की, गोंधळ सुरू होतो. सर्वत्र हाहाकार उडाल्यासारखे वातावरण तयार होते. सरकार साखर कारखान्यांवर लक्ष ठेवून असते. साखरेचे दर वाढल्याचा लाभ उस उत्पादक शेतकºयांना होतो. उसाला वाढीव दर मिळू शकतो, हे सरकारला समजत नाही. साखर उत्पादनाचा खर्च पाहिला तर किमान ३५ रुपये दर उत्पादित साखरेला मिळाला पाहिजे अन्यथा साखर कारखाने डबघाईला येतील, असे त्यांनी सांगितले.पाण्याची टंचाई पाहता आगामी काळात ऊस उत्पादन घटणारे आहे. उसाला पर्याय शोधण्यासाठी आम्ही परदेशात पाहणी केली. माजी कृषिमंत्री शरद पवार, जयंत पाटील आदीसोबत झालेल्या दौºयात बिट रूटमधून साखर उत्पादन करण्याच्या तंत्राची पाहणी केली. बिट रूटमधून साखर उत्पादन करण्याचे तंत्र आता साखर कारखान्यांना वापरावे लागणार आहे. बिट रूटचे बियाणे मागवून प्रायोगिक लागवड करण्यात येणार आहे. उसाला पर्याय म्हणून बिटरूटची शेती करण्यावर भर द्यावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. साखर कारखानदारी टिकवण्यासाठी शासनाचे साखर उद्योगाकडे पाहण्याचे धोरण बदलण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेPoliticsराजकारण