शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
3
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
4
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
5
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
6
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
7
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
8
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
9
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
10
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
11
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
12
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
13
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
14
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."
15
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
16
चिकनच्या किमतीपेक्षा अंडी झाली महाग, भाज्यांचे दरही गगनाला; बांगलादेशात सगळाच गोंधळ
17
'दृश्यम'पद्धतीने हत्या! प्रेयसीच्या भावाचा मृतदेह पुरला; प्लॅनमध्ये पडला 'मिठा'चा खडा आणि...
18
Mumbai Local: मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
19
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
20
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल

...तरच कारखानदारी टिकेल- दांडेगावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:01 IST

साखरेच्या उत्पादनावर आधारित दर मिळण्याची भूमिका शासनाने घेतली पाहिजे. साखरेला किमान ३५ रुपये दर मिळाला तरच साखर कारखानदारी टिकू शकेल अन्यथा साखर कारखान्यांचे भवितव्य अधांतरी आहे, असे प्रतिपादन पूर्णाचे चेअरमन जयप्रकाश दांडेगावकर यांनी केले. रविवारी पूर्णा साखर कारखान्यांच्या गव्हाण पूजन व मोळीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : साखरेच्या उत्पादनावर आधारित दर मिळण्याची भूमिका शासनाने घेतली पाहिजे. साखरेला किमान ३५ रुपये दर मिळाला तरच साखर कारखानदारी टिकू शकेल अन्यथा साखर कारखान्यांचे भवितव्य अधांतरी आहे, असे प्रतिपादन पूर्णाचे चेअरमन जयप्रकाश दांडेगावकर यांनी केले. रविवारी पूर्णा साखर कारखान्यांच्या गव्हाण पूजन व मोळीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.या कार्यक्रमास संचालक प्रल्हादराव काळे, दत्तराव चव्हाण, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष आंबादासराव भोसले, राजू पाटील नवघरे, देवीदास कºहाळे, चंद्रमुनी मस्के, कार्यकारी संचालक आर.बी. पाटील आदींची उपस्थिती होती. दांडेगावकर म्हणाले, यावर्षी पूर्णा व बाराशिव या दोन्ही कारखान्यांचे मिळून १० लाख मे.टन ऊस गाळप करणार आहे. दुष्काळाच्या तीव्र पार्श्वभूमीवर हा हंगाम सुरू आहे. पाण्याचाही दुष्काळ आहे. ऊस उताऱ्यावर परिणाम होणार आहे. ऊस उत्पादक शेतकरीही अडचणीत आहे. साखर उद्योग सध्या अडचणीत आहे. पेट्रोलच्या वाढणाºया किंमतीची शासनाला फिकीर नाही. त्यात सरकार हस्तक्षेप करत नाही. मात्र साखरेचे दर पाच रुपयांनी वाढले की, गोंधळ सुरू होतो. सर्वत्र हाहाकार उडाल्यासारखे वातावरण तयार होते. सरकार साखर कारखान्यांवर लक्ष ठेवून असते. साखरेचे दर वाढल्याचा लाभ उस उत्पादक शेतकºयांना होतो. उसाला वाढीव दर मिळू शकतो, हे सरकारला समजत नाही. साखर उत्पादनाचा खर्च पाहिला तर किमान ३५ रुपये दर उत्पादित साखरेला मिळाला पाहिजे अन्यथा साखर कारखाने डबघाईला येतील, असे त्यांनी सांगितले.पाण्याची टंचाई पाहता आगामी काळात ऊस उत्पादन घटणारे आहे. उसाला पर्याय शोधण्यासाठी आम्ही परदेशात पाहणी केली. माजी कृषिमंत्री शरद पवार, जयंत पाटील आदीसोबत झालेल्या दौºयात बिट रूटमधून साखर उत्पादन करण्याच्या तंत्राची पाहणी केली. बिट रूटमधून साखर उत्पादन करण्याचे तंत्र आता साखर कारखान्यांना वापरावे लागणार आहे. बिट रूटचे बियाणे मागवून प्रायोगिक लागवड करण्यात येणार आहे. उसाला पर्याय म्हणून बिटरूटची शेती करण्यावर भर द्यावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. साखर कारखानदारी टिकवण्यासाठी शासनाचे साखर उद्योगाकडे पाहण्याचे धोरण बदलण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेPoliticsराजकारण