शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शेतीसाठी यापुढे फक्त ‘सौर कृषीपंपच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 00:06 IST

यापुढे महावितरणकडून कृषीपंपासाठी नवीन वीजजोडणी देणे बंदच होणार आहे. जोडणी हवी असलेल्यांनी थेट सौरकृषीपंपासाठी आॅनलाईन अर्ज करण्याचे आवाहन अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी केले. राज्यात एक लाख सौरकृषीपंप देण्याचे महावितरणचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : यापुढे महावितरणकडून कृषीपंपासाठी नवीन वीजजोडणी देणे बंदच होणार आहे. जोडणी हवी असलेल्यांनी थेट सौरकृषीपंपासाठी आॅनलाईन अर्ज करण्याचे आवाहन अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी केले. राज्यात एक लाख सौरकृषीपंप देण्याचे महावितरणचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.महावितरणला नवीन वीज जोडणी देण्यासाठी दुर्गम भागात येणाऱ्या अडचणी व त्यावरील खर्च परवडत नसल्याने हा उपाय केला आहे. ३१ मार्च २0१८ पर्यंत कोटेशन भरूनही कृषी जोडणी न मिळालेल्यांना यातच लाभ दिला जाणार आहे. नुकतेच एव्हीडीएस योजनेत ५१0२ कृषीपंपांना वीजजोडणीस मंजुरी मिळाली होती. यातीलही ६00 मीटरच्या आतील कामांची जोडणी दिली जाईल. उर्वरितांना सौरकृषीपंप देणार आहोत.या योजनेत नव्याने अर्ज करण्यासाठी ५ एकरापर्यंतच्या शेतकºयास ३ एचपी तर त्यापेक्षा जास्त शेती असल्यास ५ एचपीचा सौरपंप दिला जाणार आहे. यासाठी शेतकºयाकडे शाश्वत जलस्त्रोत असावा, अर्ज आॅनलाईन करावा लागेल, त्यात सातबारा, आधार, जवळच्या ग्राहकाचा क्रमांक आदी बाबी भराव्या लागणार आहेत. त्यामुळे कृषी वीजजोडणीसाठीही नवीन अर्ज करण्याचा विचार करणाºयांनी थेट याच योजनेत अर्ज करावा. यात सर्वसाधारण ग्राहकांना अडीच लाखांच्या युनिटसाठी दहा टक्के म्हणजे २५ हजार पाचशे रुपये तर अनुसूचित जाती व जमातीच्या ग्राहकांना पाच टक्के म्हणजे १२ हजार ५00 रुपयांची रक्कम भरावी लागणार आहे. ही रक्कम अनेकांना जास्त वाटत असली तरीही यात कृषीपंप मिळणार असल्याने तो खर्च वाचणार आहे. शिवाय यापुढे वीजबिलाचे झंझट राहणार नाही.दिवसा वीज मिळेल. कंपनी पाच वर्षांचा इन्शुरन्स काढणार आहे. शिवाय चोरी झाल्यास पोलिसांत तक्रार दिली की, विमा कंपनीकडून साहित्य मिळेल. त्याचबरोबर बिघाड झाल्यास महावितरणकडे तक्रार केल्यावर तीन दिवसांत दुरुस्ती करून मिळेल.हा पंप २५ वर्षांपर्यंत चालू शकतो, असा दावाही महावितरणकडून काढण्यात आलेल्या माहितीपुस्तिकेत केला आहे. तर आॅनलाईन अर्ज करण्यास काही अडचण आल्यास १९१२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही केले.

टॅग्स :Farmerशेतकरीmahavitaranमहावितरण