शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
9
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
10
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
11
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
12
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
13
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
14
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
15
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
16
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
17
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
18
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
19
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
20
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई

फक्त ४ यंत्रांनी डास आटोक्यात येतील का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 00:22 IST

जिल्ह्यातील मागील काही वर्षात डेग्ंयू आजाराने डोके वर काढले आहे. डासोत्पत्तीवर प्रतिबंध हाच साथीच्या गावात उपाय असून यासाठी हिवताप विभागाकडे केवळ ४ फवारणी यंत्रे आहेत. यावर्षी आतापर्यंत या विभागाने ८ गावांत फवारणी केली. जुलै आखेतपर्यत एकूण १६ हजार ९१३ रक्तनमुने घेण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील मागील काही वर्षात डेग्ंयू आजाराने डोके वर काढले आहे. डासोत्पत्तीवर प्रतिबंध हाच साथीच्या गावात उपाय असून यासाठी हिवताप विभागाकडे केवळ ४ फवारणी यंत्रे आहेत. यावर्षी आतापर्यंत या विभागाने ८ गावांत फवारणी केली. जुलै आखेतपर्यत एकूण १६ हजार ९१३ रक्तनमुने घेण्यात आले आहे.हिंगोली जिल्ह्यात यंदा चांगले पर्जन्यमान असल्याने विविध ठिकाणी डबके साचून त्यावर डासांची उत्पत्ती होत आहे. शिवाय गाजर गवताचे स्तोम वाढल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे अनेक गावांत तापासह इतर आजारांचे रुग्ण वाढत आहेत. काही ठिकाणी डेंग्यसदृश्य आजाराचे रुग्ण आढळत आहेत. अशावेळी उपाय योजना म्हणून डासांच्या निर्मूलनासाठी करावयाच्या पायराथ्रम औषध फवारणीच्या केवळ चारच मशिन हिवताप विभागाकडे उपलब्ध आहेत. दिवसेंदिवस या मशिनची संख्या कमीच होत चालली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मागणी करूनही या मशिनने फवारणी करण्यास वावच मिळत नाही. यंदा साथसदृश्य स्थिती असलेल्या आठ गावांमध्ये हिवताप विभागाने पायराथ्रम औषधाची फवारणी केली. यामध्ये औंढा नागनाथ तालुक्यात कुंरजंळ, सूर्यवाडी, धारखेडा, सेनगाव तालुक्यात वाघजाळी, वसतम तालुक्यात महमंदपूरवाडीत दोनदा तर वीरेगाव, कोर्टा मिळून ८ गावांत ग्रा.पं.च्या मागणीनुसार फवारणी केली. जिल्हा हिवताप कार्यालयाकडून केवळ ४ मशिनवरच कसे भागते, यासंदर्भात विचारणा केली असता कर्मचाऱ्यांनी सांगितले की, प्रत्येक ग्रामपंचायतीने त्यांच्या खर्चातून मशिन घेतल्यामुळे कमी पडत नाहीत. मागणीनुसार फवारणी केली जाते. त्यामध्ये मशिनच्या इंधनाचा खर्च त्या- त्या ग्रा.पं.ला द्यावा लागतो. ही फवारणी करण्याआगोदर आमच्या कार्यालयाकडूनकिटकसमरक म्हणून एक पथक असते. ते सर्व्हे करून डासांची घनता व तपासणी करून त्यावर उपाययोजना म्हणून फवारणी करणे, जळालेले आॅईल नालीत टाकणे, असे डास निर्मूलनाचे उपाय सुचविते.डेग्ंयू हा डासांमुळे पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. डेग्ंयूची लक्षणे तीव्र ताप येणे, डोकेदुखी, उलटी, अंगदुखी, डोळयात दुखणे, अंगावर लालसर येणे, तीव्र पोट दुखणे, रक्तस्त्राव होणे इत्यादीचे लक्षणे आहेत.४डेग्ंयूवर उपचार म्हणून तापासाठी पॅरासिटामोल घेणे, भरपूर पाणी पिणे, विश्रांती घेणे आवश्यक असते. या रोगांवर नियंत्रणासाठी डास निर्मूलन करणे व सामान्य जनतेपर्र्यंत आरोग्य शिक्षणाचे धडे देणे महत्त्वाचे आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीHealthआरोग्य