शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
2
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
3
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
4
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
5
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
6
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
7
नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
8
कर्ज, किडनी आणि गांजा : शेतकरी या मार्गाने का निघाले?
9
इस्त्रायलच्या सुंदर तरुणी सैनिक का बनतात? 
10
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
11
विनाशकारी विकासाला नकार! अरवलीचे संरक्षण म्हणजे विकासाला विरोध नव्हे...
12
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
13
राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना
14
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
15
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
16
येमेनच्या नागरिकाच्या अटकेचा भार सरकारी तिजोरीवर; खटला निकाली काढा, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
17
शिक्षक भरती : प्रमाणपत्र अटीमुळे मराठा उमेदवार होणार बेरोजगार? खुल्या प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांमध्ये तीव्र नाराजी
18
चारित्र्याच्या संशयातून पत्नी व चार वर्षीय मुलाचा निर्घृण खून
19
नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 
20
मोठी दुर्घटना टळली! डायलिसिस उपचार केंद्रात आग, काच फोडून आठ जणांना वाचविले; उमरखेड येथील रुग्णालयातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली जिल्ह्यातील १ हजार २३५ लोकांमागे एक पोलीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:51 IST

हिंगोली : अपुऱ्या पोलीस बळात व्हीआयपी बंदोबस्त, मिरवणुका, मोर्चे आदी सांभाळून जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्याची जबाबदारी पोलिसांना पार पाडावी लागत ...

हिंगोली : अपुऱ्या पोलीस बळात व्हीआयपी बंदोबस्त, मिरवणुका, मोर्चे आदी सांभाळून जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्याची जबाबदारी पोलिसांना पार पाडावी लागत आहे. पोलीस भरतीचा निर्णय गृहमंत्र्यांनी नुकताच घेतल्याने आता जिल्ह्यात पोलिसांची संख्या वाढून पोलिसांवरील ताण कमी होईल, असे वाटते.

राज्यामध्ये दोन टप्प्यांमध्ये १२ हजार ५०० पोलिसांची भरती करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केले आहे. सद्य:स्थितीत जगभरातील देशांचा विचार केल्यास भारत हा तळातील पाच देशांमध्ये आहे, तर देशात सर्वात चांगली स्थिती पंजाब राज्याची आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार हिंगोली जिल्ह्याची लोकसंख्या ११ लाख ७८ हजार ९७३ एवढी होती. आता त्यात १ लाख ७९ हजार एवढी वाढ झाली असल्याचे सांगण्यात येते. म्हणजे, आजमितीस जिल्ह्याची लोकसंख्या १३ लाख ५७ हजार ९७३ एवढी झाली आहे. सद्य:स्थितीत लोकसंख्येच्या मानाने १२३५ लोकांमागे १ पोलीस बंदोबस्तासाठी येत आहे. जिल्ह्यात १३ पोलीस ठाणी असून २० पोलीस चौकी आहेत. सद्य:स्थितीत पोलिसांची संख्या ११०० आहे. अपुऱ्या संख्येमुळे जास्तीचे तास पोलिसांना सेवा बजवावी लागत आहे.

क्राईम रेटमध्ये हिंगोली जिल्हा ८ व्या स्थानावर

नॅशनल क्राईम ब्युरोने २०१२ या वर्षातील गुन्ह्याची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार क्राईम रेटमध्ये हिंगोली जिल्हा हा कमी दाखविण्यात आला असून आठव्या स्थानावर राहिला आहे.

जिल्ह्यात पोलिसांची संख्या कमी असल्यामुळे आम्हाला दिवस-रात्र बंदोबस्तावर जावे लागते. लेकराबाळांची भेटही होत नाही. त्यामुळे प्रकृतीवर परिणाम होतो. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी नोकरी करावी लागत आहे. व्हीआयपी बंदोबस्त, मिरवणुका, मोर्चे, आंदोलने, उपोषणे हे सर्व सांभाळून सद्य: स्थितीत आम्ही सेवा बजावत आहोत. यात गुन्हेगारांना पकडण्याचे आव्हानही असते. त्यामुळे मोठी कसरत करावी लागत आहे. कधी-कधी बंदोबस्त पार पडल्यानंतर गस्तीवरही जावे लागते, असे पोलिसांनी सांगितले.

सद्य: स्थितीत जिल्ह्यात पोलिसांची संख्या अपुरीच आहे. राज्य शासनाने घेतलेला निर्णय चांगला आहे. भरती झाल्यानंतर पोलिसांवरील ताण कमी होण्यास मदतच होणार आहे.

उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा, हिंगोली