शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
4
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
5
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
6
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
7
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
8
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
9
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
10
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
11
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
12
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
13
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
14
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
15
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
16
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
17
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
18
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
19
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
20
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!

हिंगोली जिल्ह्यातील १ हजार २३५ लोकांमागे एक पोलीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:51 IST

हिंगोली : अपुऱ्या पोलीस बळात व्हीआयपी बंदोबस्त, मिरवणुका, मोर्चे आदी सांभाळून जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्याची जबाबदारी पोलिसांना पार पाडावी लागत ...

हिंगोली : अपुऱ्या पोलीस बळात व्हीआयपी बंदोबस्त, मिरवणुका, मोर्चे आदी सांभाळून जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्याची जबाबदारी पोलिसांना पार पाडावी लागत आहे. पोलीस भरतीचा निर्णय गृहमंत्र्यांनी नुकताच घेतल्याने आता जिल्ह्यात पोलिसांची संख्या वाढून पोलिसांवरील ताण कमी होईल, असे वाटते.

राज्यामध्ये दोन टप्प्यांमध्ये १२ हजार ५०० पोलिसांची भरती करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केले आहे. सद्य:स्थितीत जगभरातील देशांचा विचार केल्यास भारत हा तळातील पाच देशांमध्ये आहे, तर देशात सर्वात चांगली स्थिती पंजाब राज्याची आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार हिंगोली जिल्ह्याची लोकसंख्या ११ लाख ७८ हजार ९७३ एवढी होती. आता त्यात १ लाख ७९ हजार एवढी वाढ झाली असल्याचे सांगण्यात येते. म्हणजे, आजमितीस जिल्ह्याची लोकसंख्या १३ लाख ५७ हजार ९७३ एवढी झाली आहे. सद्य:स्थितीत लोकसंख्येच्या मानाने १२३५ लोकांमागे १ पोलीस बंदोबस्तासाठी येत आहे. जिल्ह्यात १३ पोलीस ठाणी असून २० पोलीस चौकी आहेत. सद्य:स्थितीत पोलिसांची संख्या ११०० आहे. अपुऱ्या संख्येमुळे जास्तीचे तास पोलिसांना सेवा बजवावी लागत आहे.

क्राईम रेटमध्ये हिंगोली जिल्हा ८ व्या स्थानावर

नॅशनल क्राईम ब्युरोने २०१२ या वर्षातील गुन्ह्याची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार क्राईम रेटमध्ये हिंगोली जिल्हा हा कमी दाखविण्यात आला असून आठव्या स्थानावर राहिला आहे.

जिल्ह्यात पोलिसांची संख्या कमी असल्यामुळे आम्हाला दिवस-रात्र बंदोबस्तावर जावे लागते. लेकराबाळांची भेटही होत नाही. त्यामुळे प्रकृतीवर परिणाम होतो. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी नोकरी करावी लागत आहे. व्हीआयपी बंदोबस्त, मिरवणुका, मोर्चे, आंदोलने, उपोषणे हे सर्व सांभाळून सद्य: स्थितीत आम्ही सेवा बजावत आहोत. यात गुन्हेगारांना पकडण्याचे आव्हानही असते. त्यामुळे मोठी कसरत करावी लागत आहे. कधी-कधी बंदोबस्त पार पडल्यानंतर गस्तीवरही जावे लागते, असे पोलिसांनी सांगितले.

सद्य: स्थितीत जिल्ह्यात पोलिसांची संख्या अपुरीच आहे. राज्य शासनाने घेतलेला निर्णय चांगला आहे. भरती झाल्यानंतर पोलिसांवरील ताण कमी होण्यास मदतच होणार आहे.

उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा, हिंगोली