शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
6
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
7
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
8
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
11
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
12
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
13
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
14
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
15
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
16
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
17
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
18
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
19
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
20
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

दगडफेक प्रकरणातील दीडशे जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 19:35 IST

हिंगोलीत शांतता राखण्याचे प्रशासनातर्फे आवाहन

ठळक मुद्देशहरात १२ आॅगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास दोन गटांत वाद झाला होता.

हिंगोली : शहरात १२ आॅगस्ट रोजी दोन गटांत वाद झाल्याने तणाव निर्माण झाला होता. शहरात दंगलसदृश स्थिती निर्माण करून काहींनी तुफान दगडफेक केली. वाहनांची तोडफोड करून लाखोंचे नुकसान केले. त्यामुळे शहरात अशांतता निर्माण करणाºयांविरूद्ध पोलिसांनी १३ आॅगस्ट रोजी जवळपास १५० जणांवर विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले असून काहींना ताब्यात घेतले आहे. 

हिंगोलीत शहरात १२ आॅगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास दोन गटांत वाद झाला होता. यावेळी शहरात काही समाजकंटकांनी तुफान दगडफेक करत वाहनांचे नुकसान केले. त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. १३ आॅगस्ट रोजी नेहमीप्रमाणे शहरात शांततामय वातावरण निर्माण झाले होते. शहरात अशांतता पसरविल्याप्रकरणी जवळपास दीडशे जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे घटनेच्या दुसºया दिवशी शहरात सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासनातर्फे जागो-जागी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

शहरात दंगल घडविणाऱ्या आरोपींची धरपकड मोहीम सकाळपासूनच सुरू झाली होती. यावेळी सात ते आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. सायंकाळी उशिरापर्यंत  आरोपींना पकडण्याची मोहीम सुरूच होती. विशेष म्हणजे राखी पौर्णिमा व मंगळवार बाजाराच्या दिवशीही नेहमी गर्दीने गजबजणाºया हिंगोली शहरात शुकशुकाट दिसून आला. तर मंगळवार बाजारातही गर्दी दिसून आली नाही. त्यामुळे घटनेच्या दुसºया दिवशीही काही प्रमाणात शहरात तणावपूर्ण स्थिती होती. परंतु सोमवारी झालेल्या दोन गटांतील वादामुळे मात्र सामान्य जनतेचे हाल झाले. वाहनांची तोडफोड केल्याने लाखोंचे नुकसान झाले. त्यात बसेस बंद असल्याने अनेकांची गैरसोय झाली. बसेस फोडल्याने हिंगोली आगाराचे नुकसान झाले. शाळकरी विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. तर दुकाने बंद असल्याने बाजारपेठेवर परिणाम झाला. विशेष म्हणजे शहरात कालच्या घटनेचे पडसाद उमटणार नाहीत, याबाबत पोलीस प्रशासना कडून खबरदारी घेण्यात येत आहे. त्यामुळे १३ आॅगस्ट रोजी शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, याची प्रशासनातर्फे खबरदारी घेत शहरात जागो-जागी तगडा पोलीस बंदोबस्त लावला होता. शहरात पोलिसांची गस्त सुरूच आहे.मार्गदर्शन शहर ठाण्यात शांतता समितीची बैठक

१२ आॅगस्ट रोजी दोन गटांत वाद झाल्याने शहरात तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे शहरात शांततामय वातावरण निर्माण करण्यासाठी प्रशासनातर्फे १३ आॅगस्ट रोजी हिंगोली येथील शहर ठाण्यात शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली.४शांतता कमिटीच्या बैठकीस जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, मुख्याधिकारी रामदास पाटील, डीवायएसपी सुधाकर रेड्डी, पोनि अशोक घोरबांड यांच्यासह विविध सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.४हिंगोली शहरात सोमवारी दोन गटांतील वादामुळे तणाव निर्माण झाल्याने शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली होती. यावेळी शहरात शांतता राखण्याचे व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी मान्यवरांची भाषणे झाली. जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी व पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी शहरात शांतता राखण्याचे आवाहन केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोलीPoliceपोलिस