शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

अपंग, मागासवर्गीयांचा एक कोटीचा अनुशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 23:50 IST

ग्रामपंचायतींनी आपल्या अर्थसंकल्पातील २0 टक्के निधी मागासवर्गीयांच्या तर ३ टक्के अपंगांच्या योजना, सुविधांवर खर्च करणे अनिवार्य आहे. मात्र त्याकडे पाठ फिरविणाऱ्या ग्रामपंचायतींमुळे निर्माण होणारा अनुशेष दूर करण्यासाठी दरवर्षी कवायत करावी लागते. अजूनही एक कोटीचा अनुशेष शिल्लक असल्याचे चित्र दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : ग्रामपंचायतींनी आपल्या अर्थसंकल्पातील २0 टक्के निधी मागासवर्गीयांच्या तर ३ टक्के अपंगांच्या योजना, सुविधांवर खर्च करणे अनिवार्य आहे. मात्र त्याकडे पाठ फिरविणाऱ्या ग्रामपंचायतींमुळे निर्माण होणारा अनुशेष दूर करण्यासाठी दरवर्षी कवायत करावी लागते. अजूनही एक कोटीचा अनुशेष शिल्लक असल्याचे चित्र दिसून येत आहे.हिंगोली जिल्ह्यात ५६३ ग्रामपंचायती आहेत. यात २0 टक्के निधी मागासवर्गीयांना सार्वजनिक किंवा वैयक्तिक लाभासाठी देण्याची तरतूद आहे. यासाठी वित्त आयोगाचे तर यापूर्वीच आराखडे तयार केलेले आहेत. त्यातील कामे यातून करायची आहेत. जिल्ह्यात ग्रामपंचायतींना १.३0 कोटी रुपयांची तरतूद मागच्या आर्थिक वर्षात करणे क्रमप्राप्त होते. यात हिंगोली १९.५ लाख, कळमनुरी -७५.६३ लाख, वसमत-११.६१ लाख, औंढा ना-४.६४ लाख तर सेनगाव १९.३५ लाख अशी तरतूद होती. एवढा खर्चही होणे अपेक्षित होते. मात्र मार्च २0१८ अखेरच्या खर्चाच्या तपशिलानुसार ९१.७७ लाखांचा अनुशेष आहे. तालुकानिहाय हिंगोली- १४.२0 लाख, कळमनुरी-७३.१८ लाख, वसमत-१.२७ लाख, औंढा ४१ हजार, सेनगाव-२.६९ लाख अशी स्थिती आहे. केवळ ३८.९७ लाखांचाच खर्च मागच्या आर्थिक वर्षात झाला आहे. त्यामुळे या खर्चाबाबत ग्रामपंचायतींची उदासीनता दिसून येत आहे. परिणामी, पुन्हा अनुशेष वाढण्याची भीती आहे.कळमनुरीत मागासवर्गीयांसाठी तरतूद खर्च न झाल्याचा आकडा सर्वाधिक आहे. या तालुक्यात मागासवर्गीयांची संख्याही मोठी आहे. तरीही यात शिल्लक असलेल्या अनुशेषाबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.या योजनेत काम करणाºया ग्रामपंचायतींनी खरेच ही कामे केली की कसे? याबाबतही शंकाच दिसून येत आहे.अपंगांसाठी ३ टक्के खर्चाच्या तरतुदीत हिंगोली ३.९0 लाख, कळमनुरी १४.१0 लाख, वसमत-२.९४ लाख, औंढा २.७९ लाख, सेनगाव ३.८७ लाख अशी २७.६१ लाखांची तरतूद होती. मात्र त्यापैकी अवघा १२.२८ लाखांचा खर्च झाला आहे. तर १५.३३ लाखांचा अनुशेष शिल्लक आहे. यात हिंगोली ८0 हजार,कळमनुरी १३.५९ लाख, वसमत-२९ हजार, औंढा २५हजार, सेनगाव ४0 हजार असे चित्र आहे. येथेही कळमनुरी तालुक्याची उदासीनताच असल्याचे दिसून येत आहे. यातही अपंगांना त्या तुलनेत काहीच सुविधा मिळत नसल्याचे सांगितले जाते.अनेक ग्रामपंचायतींकडून तर विविध योजनांत मागासवर्गीयांना निधी मिळतो, असे कारण सांगून कागदी कारभार करण्याचा प्रयत्न होतो. तरीही अनुशेष मात्र कायमच आहे.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदfundsनिधी