शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

अपंग, मागासवर्गीयांचा एक कोटीचा अनुशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 23:50 IST

ग्रामपंचायतींनी आपल्या अर्थसंकल्पातील २0 टक्के निधी मागासवर्गीयांच्या तर ३ टक्के अपंगांच्या योजना, सुविधांवर खर्च करणे अनिवार्य आहे. मात्र त्याकडे पाठ फिरविणाऱ्या ग्रामपंचायतींमुळे निर्माण होणारा अनुशेष दूर करण्यासाठी दरवर्षी कवायत करावी लागते. अजूनही एक कोटीचा अनुशेष शिल्लक असल्याचे चित्र दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : ग्रामपंचायतींनी आपल्या अर्थसंकल्पातील २0 टक्के निधी मागासवर्गीयांच्या तर ३ टक्के अपंगांच्या योजना, सुविधांवर खर्च करणे अनिवार्य आहे. मात्र त्याकडे पाठ फिरविणाऱ्या ग्रामपंचायतींमुळे निर्माण होणारा अनुशेष दूर करण्यासाठी दरवर्षी कवायत करावी लागते. अजूनही एक कोटीचा अनुशेष शिल्लक असल्याचे चित्र दिसून येत आहे.हिंगोली जिल्ह्यात ५६३ ग्रामपंचायती आहेत. यात २0 टक्के निधी मागासवर्गीयांना सार्वजनिक किंवा वैयक्तिक लाभासाठी देण्याची तरतूद आहे. यासाठी वित्त आयोगाचे तर यापूर्वीच आराखडे तयार केलेले आहेत. त्यातील कामे यातून करायची आहेत. जिल्ह्यात ग्रामपंचायतींना १.३0 कोटी रुपयांची तरतूद मागच्या आर्थिक वर्षात करणे क्रमप्राप्त होते. यात हिंगोली १९.५ लाख, कळमनुरी -७५.६३ लाख, वसमत-११.६१ लाख, औंढा ना-४.६४ लाख तर सेनगाव १९.३५ लाख अशी तरतूद होती. एवढा खर्चही होणे अपेक्षित होते. मात्र मार्च २0१८ अखेरच्या खर्चाच्या तपशिलानुसार ९१.७७ लाखांचा अनुशेष आहे. तालुकानिहाय हिंगोली- १४.२0 लाख, कळमनुरी-७३.१८ लाख, वसमत-१.२७ लाख, औंढा ४१ हजार, सेनगाव-२.६९ लाख अशी स्थिती आहे. केवळ ३८.९७ लाखांचाच खर्च मागच्या आर्थिक वर्षात झाला आहे. त्यामुळे या खर्चाबाबत ग्रामपंचायतींची उदासीनता दिसून येत आहे. परिणामी, पुन्हा अनुशेष वाढण्याची भीती आहे.कळमनुरीत मागासवर्गीयांसाठी तरतूद खर्च न झाल्याचा आकडा सर्वाधिक आहे. या तालुक्यात मागासवर्गीयांची संख्याही मोठी आहे. तरीही यात शिल्लक असलेल्या अनुशेषाबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.या योजनेत काम करणाºया ग्रामपंचायतींनी खरेच ही कामे केली की कसे? याबाबतही शंकाच दिसून येत आहे.अपंगांसाठी ३ टक्के खर्चाच्या तरतुदीत हिंगोली ३.९0 लाख, कळमनुरी १४.१0 लाख, वसमत-२.९४ लाख, औंढा २.७९ लाख, सेनगाव ३.८७ लाख अशी २७.६१ लाखांची तरतूद होती. मात्र त्यापैकी अवघा १२.२८ लाखांचा खर्च झाला आहे. तर १५.३३ लाखांचा अनुशेष शिल्लक आहे. यात हिंगोली ८0 हजार,कळमनुरी १३.५९ लाख, वसमत-२९ हजार, औंढा २५हजार, सेनगाव ४0 हजार असे चित्र आहे. येथेही कळमनुरी तालुक्याची उदासीनताच असल्याचे दिसून येत आहे. यातही अपंगांना त्या तुलनेत काहीच सुविधा मिळत नसल्याचे सांगितले जाते.अनेक ग्रामपंचायतींकडून तर विविध योजनांत मागासवर्गीयांना निधी मिळतो, असे कारण सांगून कागदी कारभार करण्याचा प्रयत्न होतो. तरीही अनुशेष मात्र कायमच आहे.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदfundsनिधी