शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

उन्हाळी सुट्यांतही पोषण आहार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 23:57 IST

जिल्ह्यातील शाळांना २ मे पासून सुट्या लागल्या आहेत. उन्हाळी सुट्यांमध्येही पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याच्या सूचना आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागांतील शाळेत पोषण आहार दिला जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील शाळांना २ मे पासून सुट्या लागल्या आहेत. उन्हाळी सुट्यांमध्येही पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याच्या सूचना आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागांतील शाळेत पोषण आहार दिला जाणार आहे.हिंगोली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये उन्हाळी सुट्यांतही शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याच्या शासनाने सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील जि. प. प्राथमिक व माध्यमिक तसेच अनुदानित विना अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक, सैनिकी शाळांना २ मे पासून उन्हाळी सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. परंतु यंदा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आल्याने टंचाईग्रस्त भागातील शाळांमध्ये शालेय पोषण आहार शिजविला जाणार आहे. सकाळी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यात येत असून संबधित तालुक्याच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांना तसेच पत्रही पाठविण्यात आले आहे. दुष्काळग्रस्त भागात येणाºया सर्व शाळेत पोषण आहार वाटप करण्यात यावा, तसेच एकही बालक पोषक आहारपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी गट शिक्षणाधिकाºयांना दिल्या आहेत. शाळा सुरू होईर्यंत म्हणजेच १७ जून २०१९ पर्यंत शालेय पोषण आहार शिजविण्यात येणार आहे. संबधित शाळेतील मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागाने ठरवून दिलेल्या वेळेत शाळेत येणाºया विद्यार्थ्यांना पोषण आहार द्यावा, असेही कळविण्यात आले आहे. एकंदरीत सध्या तरी जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थी पोषण आहार योजनेचा लाभ घेत असल्याचे चित्र आहे. परंतु ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी सुट्यांमध्ये नातेवाईकांच्या गावी जातात. किंवा कुटुंबियांसोबत बाहेरगावी गेल्याचे चित्र दिसून येत आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रHealthआरोग्य